शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
4
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
5
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
6
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
7
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
8
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
9
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
10
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
11
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
12
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
13
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
14
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
15
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
16
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
17
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
18
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
19
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
20
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत

सकारात्मक विचार सुखाचा ठेवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 10:55 IST

सकारात्मक विचार, चांगला विचार येणं हा विचारांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे.

ठळक मुद्देफिनिक्स पक्ष्याप्रमाणे आकाशाला गवसणी घालणारी महत्त्वाकांक्षा जीवनाला एक वेगळीच उत्तेजना देतेजगाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. ‘सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणतजर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते

पूर्वी माणसाच्या गरजा या मर्यादित होत्या. माणूस सुखी व समाधानी होता. तो एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होत असायचा. आनंदाचा क्षण असो वा दु:खाचा तो आपल्या भावना इतरांसोबत व्यक्त करत असे. नुकताच ‘उबुंटु’ हा मराठी सिनेमा पाहिला. शालेय जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. मनाला तो फारच भावला. ‘उबुंटु’ या शब्दाचा अर्थ ‘मी आहे कारण आम्ही आहोत’ असा आहे.

हरवत चाललेली आम्हीपणाची भावना यातून दर्शवली आहे. ही आम्हीपणाची भावना वृद्धिंगत व्हायला हवी, असे मला वाटते. निसर्गाने माणसाला विचारशक्ती अगदी मुक्त हस्ताने बहाल केलेली आहे. सकारात्मक विचार, चांगला विचार येणं हा विचारांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आकाशाला गवसणी घालणारी महत्त्वाकांक्षा जीवनाला एक वेगळीच उत्तेजना देते, प्रेरणा देते. जगाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. ‘सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत, हे तुम्हीच ठरवायचं!’ मंगेश पाडगावकर यांची ही कविता तुम्हाला माहीत असेल. पाण्यात अर्ध्या भरलेल्या पेल्याकडे पाहून काही जण म्हणाले ‘पेला अर्धा भरला आहे.’ काही जण म्हणाले ‘पेला अर्धा सरला आहे!’ पहिल्या प्रकारच्या लोकांचा दृष्टिकोन सकारात्मक होता. दुसºया प्रकाराच्या लोकांचा दृष्टिकोन नकारात्मक होता.

जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते. माणूस काही काम करत नसला तरी त्याच्या मनात सतत विचारचक्र चालूच असते. सकाळी उठल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत माणूस सतत विचार करत असतो. सकारात्मक विचार आपल्यामध्ये असणाºया क्षमता, कौशल्य यांना विविध कसोट्यांवर पारखून पाहतो. नवनिर्मिती करण्याची उमेद जागवून आनंद देऊन जातो. खरं म्हणजे प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो. आशावाद हे सकारात्मक दृष्टिकोनाचे पुढचे पाऊल आहे. एखादी गोष्ट होईल, असे म्हटल्यामुळे होतेच असे नाही, पण ती गोष्ट घडण्याच्या शक्यता तरी वाढतात. आपल्या इच्छेसाठी कठोर परिश्रम करून संघर्ष केल्याशिवाय आपण काहीही साध्य करू शकत नाही. आपण दृढ आणि शांत असले पाहिजे. जर कोणी तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करीत असेल किंवा तुमचे लक्ष विचलित केले असेल तर आपण स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे की, आपण जे करीत आहोत ते बरोबर आहे. बºयाच वेळा आपण काही लोकांच्या सहवासात अडकतो, जे नेहमी दुसºयाच्या आनंदात आनंद मानत नाहीत. सतत तक्रारी, वेदना उगाळत असतात. अशा व्यक्तींपासून आपण दूर राहायला हवे. कधी कधी एखाद्या व्यक्तीचे कार्य इतके तणावपूर्ण असते की, त्याला राग येतो आणि त्याच्या मनात नकारात्मक विचार येतात. जर आपणातही असे घडत असेल तर स्वत: असे काम करा की, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. आपण इच्छित असल्यास, गोड संगीत, मजेदार, चांगले साहित्य इत्यादी माध्यमातून आपण आपला ताण कमी करू शकतो. बºयाच वेळा आपण काही लोकांच्या सहवासात अडकतो, जे नेहमीच त्यांच्या दु:खाच्या आरोळ्यांबरोबर बसतात. आयुष्यात कसे आनंदी राहायचे हे त्याला माहीत नाही. अशा लोकांपासून दूर राहणे आपल्यासाठी चांगले होईल. जेव्हा जेव्हा आपण निराश होता तेव्हा आपण आपल्या समूहातील काही लोकांशी मैत्री केली पाहिजे, जे आनंदी आणि उत्साही आहेत. त्यांच्या संपर्कात राहिल्यास तुम्हाला एक नवीन प्रेरणा मिळेल आणि निराशा आपल्या आयुष्यात हरवेल. आपल्या स्वभावाशी एकनिष्ठ राहणे हा सर्वात मोठा धर्म आहे. स्वत:वर विश्वास ठेवा. हजारो अडचणी असूनही एक आनंदी मन आणि शक्तिशाली मन आपला मार्ग मोकळा करतो.सतत प्रयत्नपूर्वक पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यश मिळवू शकता. मात्र त्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग अथवा सकारात्मक विचार कसे करायचे हे तुम्हाला माहीत असायला हवे. चला तर मग आपण सकारात्मक विचाराने आपल्या दिवसाची सुरुवात करूयात.- राहुल सुरवसे (लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक