शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

सकारात्मक विचार सुखाचा ठेवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 10:55 IST

सकारात्मक विचार, चांगला विचार येणं हा विचारांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे.

ठळक मुद्देफिनिक्स पक्ष्याप्रमाणे आकाशाला गवसणी घालणारी महत्त्वाकांक्षा जीवनाला एक वेगळीच उत्तेजना देतेजगाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. ‘सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणतजर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते

पूर्वी माणसाच्या गरजा या मर्यादित होत्या. माणूस सुखी व समाधानी होता. तो एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होत असायचा. आनंदाचा क्षण असो वा दु:खाचा तो आपल्या भावना इतरांसोबत व्यक्त करत असे. नुकताच ‘उबुंटु’ हा मराठी सिनेमा पाहिला. शालेय जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. मनाला तो फारच भावला. ‘उबुंटु’ या शब्दाचा अर्थ ‘मी आहे कारण आम्ही आहोत’ असा आहे.

हरवत चाललेली आम्हीपणाची भावना यातून दर्शवली आहे. ही आम्हीपणाची भावना वृद्धिंगत व्हायला हवी, असे मला वाटते. निसर्गाने माणसाला विचारशक्ती अगदी मुक्त हस्ताने बहाल केलेली आहे. सकारात्मक विचार, चांगला विचार येणं हा विचारांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आकाशाला गवसणी घालणारी महत्त्वाकांक्षा जीवनाला एक वेगळीच उत्तेजना देते, प्रेरणा देते. जगाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. ‘सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत, हे तुम्हीच ठरवायचं!’ मंगेश पाडगावकर यांची ही कविता तुम्हाला माहीत असेल. पाण्यात अर्ध्या भरलेल्या पेल्याकडे पाहून काही जण म्हणाले ‘पेला अर्धा भरला आहे.’ काही जण म्हणाले ‘पेला अर्धा सरला आहे!’ पहिल्या प्रकारच्या लोकांचा दृष्टिकोन सकारात्मक होता. दुसºया प्रकाराच्या लोकांचा दृष्टिकोन नकारात्मक होता.

जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते. माणूस काही काम करत नसला तरी त्याच्या मनात सतत विचारचक्र चालूच असते. सकाळी उठल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत माणूस सतत विचार करत असतो. सकारात्मक विचार आपल्यामध्ये असणाºया क्षमता, कौशल्य यांना विविध कसोट्यांवर पारखून पाहतो. नवनिर्मिती करण्याची उमेद जागवून आनंद देऊन जातो. खरं म्हणजे प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो. आशावाद हे सकारात्मक दृष्टिकोनाचे पुढचे पाऊल आहे. एखादी गोष्ट होईल, असे म्हटल्यामुळे होतेच असे नाही, पण ती गोष्ट घडण्याच्या शक्यता तरी वाढतात. आपल्या इच्छेसाठी कठोर परिश्रम करून संघर्ष केल्याशिवाय आपण काहीही साध्य करू शकत नाही. आपण दृढ आणि शांत असले पाहिजे. जर कोणी तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करीत असेल किंवा तुमचे लक्ष विचलित केले असेल तर आपण स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे की, आपण जे करीत आहोत ते बरोबर आहे. बºयाच वेळा आपण काही लोकांच्या सहवासात अडकतो, जे नेहमी दुसºयाच्या आनंदात आनंद मानत नाहीत. सतत तक्रारी, वेदना उगाळत असतात. अशा व्यक्तींपासून आपण दूर राहायला हवे. कधी कधी एखाद्या व्यक्तीचे कार्य इतके तणावपूर्ण असते की, त्याला राग येतो आणि त्याच्या मनात नकारात्मक विचार येतात. जर आपणातही असे घडत असेल तर स्वत: असे काम करा की, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. आपण इच्छित असल्यास, गोड संगीत, मजेदार, चांगले साहित्य इत्यादी माध्यमातून आपण आपला ताण कमी करू शकतो. बºयाच वेळा आपण काही लोकांच्या सहवासात अडकतो, जे नेहमीच त्यांच्या दु:खाच्या आरोळ्यांबरोबर बसतात. आयुष्यात कसे आनंदी राहायचे हे त्याला माहीत नाही. अशा लोकांपासून दूर राहणे आपल्यासाठी चांगले होईल. जेव्हा जेव्हा आपण निराश होता तेव्हा आपण आपल्या समूहातील काही लोकांशी मैत्री केली पाहिजे, जे आनंदी आणि उत्साही आहेत. त्यांच्या संपर्कात राहिल्यास तुम्हाला एक नवीन प्रेरणा मिळेल आणि निराशा आपल्या आयुष्यात हरवेल. आपल्या स्वभावाशी एकनिष्ठ राहणे हा सर्वात मोठा धर्म आहे. स्वत:वर विश्वास ठेवा. हजारो अडचणी असूनही एक आनंदी मन आणि शक्तिशाली मन आपला मार्ग मोकळा करतो.सतत प्रयत्नपूर्वक पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यश मिळवू शकता. मात्र त्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग अथवा सकारात्मक विचार कसे करायचे हे तुम्हाला माहीत असायला हवे. चला तर मग आपण सकारात्मक विचाराने आपल्या दिवसाची सुरुवात करूयात.- राहुल सुरवसे (लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक