शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

मन शुद्ध ठेवा, मग आपोआप सर्वसिद्ध होईल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 13:03 IST

मन हे इंद्रिय सर्वात चंचल आणि चपळ आहे; पण एकदा का ह्या मनाला स्थिर केले की आत्मानंदाची प्राप्ती होते. मन स्थिर करण्यासाठी विविध प्रकारच्या उपासना सांगितल्या आहेत.

- डॉ. तुळशीदास गुट्टे

मन हे इंद्रिय सर्वात चंचल आणि चपळ आहे; पण एकदा का ह्या मनाला स्थिर केले की आत्मानंदाची प्राप्ती होते. मन स्थिर करण्यासाठी विविध प्रकारच्या उपासना सांगितल्या आहेत. त्यात ध्यान, योग, आराधना या सर्व उपाययोजना मनाला शांत करण्यासाठी आहेत. मनात अनेक वेळेला अनेक विचारांचा गुंता असतो. तो गुंता काही वेळेला वाढतच जातो. त्या गुंतलेल्या मनाला स्थिरावण्याची गरज भासते. कारण, मनाची शक्ती अफाट आहे. मनाची सूक्ष्मशक्ती मनासोबत सतत भ्रमंती करीत असते. प्रत्यक्ष व्यवहारात या शक्तीची जाणीव आपल्याला व इतरांनाही होते. कारण, आपल्या आतील एक मन आणि बाहेरचं एक मन हे वेगळे नसतात. ते एकच आहेत. तरीपण आपल्या आतल्या मनासोबतच शांतपणे, सहजपणे असतो. बाहेरील मन सतत अविचार करीत असते. अविचारी मन हिंसेला जन्म देते. हिंसा ही मानवी प्रवृत्तीला घातक ठरते. मानवी मनाला सुंदर करण्यासाठी योग्य त्या गोष्टींचा स्वीकार करणे महत्त्वाचे ठरते. आपले जीवन परिचित, नियमबद्ध करावे. त्यातून आत्मानंदाची प्राप्ती होते. व्यक्तीने प्रयत्नपूर्वक ‘योग्य’ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मन-बुद्धी आणि शरीर यांचा संयोग साधून मानवी जीवनाचे कल्याण करून घ्यावे. निरामय आनंद उपभोगताना मग आकाशात आकाश मिसळल्याप्रमाणे येणारा अनुभव शब्दांत व्यक्त करता येत नाही. आत्मचैतन्यासाठी विश्वचैतन्याशी जी समरसता साधता येते तो अनुभव सर्वश्रेष्ठ असतो. त्यातूनच उत्तम प्रकारची सिद्धता प्राप्त करता येते. म्हणूनच आत्मानुभव प्राप्तीचे कर्म, भक्ती आणि ज्ञान अशा तीनही मार्गांचा अवलंब श्रीमद्भगवतगीतेत आला आहे. ज्ञानेश्वरांनी तर आपल्या भावार्थ दीपिकेत ज्ञानी, पंडित, आत्मानुभवी, संत-महंत, मुमुक्षू आणि सामान्यजन ह्यांना गीतेतील गुह्यगौप्य अर्थाचे स्पष्टीकरण दिले. या सर्व गोष्टींना कारणीभूत ‘मन’ आणि मनावर सर्वस्वी अवलंबून आहे. मनाला शुद्ध ठेवा, मग आपोआप सर्वसिद्ध होईल.

(लेखक हे श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक