शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

मन शुद्ध ठेवा, मग आपोआप सर्वसिद्ध होईल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 13:03 IST

मन हे इंद्रिय सर्वात चंचल आणि चपळ आहे; पण एकदा का ह्या मनाला स्थिर केले की आत्मानंदाची प्राप्ती होते. मन स्थिर करण्यासाठी विविध प्रकारच्या उपासना सांगितल्या आहेत.

- डॉ. तुळशीदास गुट्टे

मन हे इंद्रिय सर्वात चंचल आणि चपळ आहे; पण एकदा का ह्या मनाला स्थिर केले की आत्मानंदाची प्राप्ती होते. मन स्थिर करण्यासाठी विविध प्रकारच्या उपासना सांगितल्या आहेत. त्यात ध्यान, योग, आराधना या सर्व उपाययोजना मनाला शांत करण्यासाठी आहेत. मनात अनेक वेळेला अनेक विचारांचा गुंता असतो. तो गुंता काही वेळेला वाढतच जातो. त्या गुंतलेल्या मनाला स्थिरावण्याची गरज भासते. कारण, मनाची शक्ती अफाट आहे. मनाची सूक्ष्मशक्ती मनासोबत सतत भ्रमंती करीत असते. प्रत्यक्ष व्यवहारात या शक्तीची जाणीव आपल्याला व इतरांनाही होते. कारण, आपल्या आतील एक मन आणि बाहेरचं एक मन हे वेगळे नसतात. ते एकच आहेत. तरीपण आपल्या आतल्या मनासोबतच शांतपणे, सहजपणे असतो. बाहेरील मन सतत अविचार करीत असते. अविचारी मन हिंसेला जन्म देते. हिंसा ही मानवी प्रवृत्तीला घातक ठरते. मानवी मनाला सुंदर करण्यासाठी योग्य त्या गोष्टींचा स्वीकार करणे महत्त्वाचे ठरते. आपले जीवन परिचित, नियमबद्ध करावे. त्यातून आत्मानंदाची प्राप्ती होते. व्यक्तीने प्रयत्नपूर्वक ‘योग्य’ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मन-बुद्धी आणि शरीर यांचा संयोग साधून मानवी जीवनाचे कल्याण करून घ्यावे. निरामय आनंद उपभोगताना मग आकाशात आकाश मिसळल्याप्रमाणे येणारा अनुभव शब्दांत व्यक्त करता येत नाही. आत्मचैतन्यासाठी विश्वचैतन्याशी जी समरसता साधता येते तो अनुभव सर्वश्रेष्ठ असतो. त्यातूनच उत्तम प्रकारची सिद्धता प्राप्त करता येते. म्हणूनच आत्मानुभव प्राप्तीचे कर्म, भक्ती आणि ज्ञान अशा तीनही मार्गांचा अवलंब श्रीमद्भगवतगीतेत आला आहे. ज्ञानेश्वरांनी तर आपल्या भावार्थ दीपिकेत ज्ञानी, पंडित, आत्मानुभवी, संत-महंत, मुमुक्षू आणि सामान्यजन ह्यांना गीतेतील गुह्यगौप्य अर्थाचे स्पष्टीकरण दिले. या सर्व गोष्टींना कारणीभूत ‘मन’ आणि मनावर सर्वस्वी अवलंबून आहे. मनाला शुद्ध ठेवा, मग आपोआप सर्वसिद्ध होईल.

(लेखक हे श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक