शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मन शुद्ध ठेवा, मग आपोआप सर्वसिद्ध होईल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 13:03 IST

मन हे इंद्रिय सर्वात चंचल आणि चपळ आहे; पण एकदा का ह्या मनाला स्थिर केले की आत्मानंदाची प्राप्ती होते. मन स्थिर करण्यासाठी विविध प्रकारच्या उपासना सांगितल्या आहेत.

- डॉ. तुळशीदास गुट्टे

मन हे इंद्रिय सर्वात चंचल आणि चपळ आहे; पण एकदा का ह्या मनाला स्थिर केले की आत्मानंदाची प्राप्ती होते. मन स्थिर करण्यासाठी विविध प्रकारच्या उपासना सांगितल्या आहेत. त्यात ध्यान, योग, आराधना या सर्व उपाययोजना मनाला शांत करण्यासाठी आहेत. मनात अनेक वेळेला अनेक विचारांचा गुंता असतो. तो गुंता काही वेळेला वाढतच जातो. त्या गुंतलेल्या मनाला स्थिरावण्याची गरज भासते. कारण, मनाची शक्ती अफाट आहे. मनाची सूक्ष्मशक्ती मनासोबत सतत भ्रमंती करीत असते. प्रत्यक्ष व्यवहारात या शक्तीची जाणीव आपल्याला व इतरांनाही होते. कारण, आपल्या आतील एक मन आणि बाहेरचं एक मन हे वेगळे नसतात. ते एकच आहेत. तरीपण आपल्या आतल्या मनासोबतच शांतपणे, सहजपणे असतो. बाहेरील मन सतत अविचार करीत असते. अविचारी मन हिंसेला जन्म देते. हिंसा ही मानवी प्रवृत्तीला घातक ठरते. मानवी मनाला सुंदर करण्यासाठी योग्य त्या गोष्टींचा स्वीकार करणे महत्त्वाचे ठरते. आपले जीवन परिचित, नियमबद्ध करावे. त्यातून आत्मानंदाची प्राप्ती होते. व्यक्तीने प्रयत्नपूर्वक ‘योग्य’ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मन-बुद्धी आणि शरीर यांचा संयोग साधून मानवी जीवनाचे कल्याण करून घ्यावे. निरामय आनंद उपभोगताना मग आकाशात आकाश मिसळल्याप्रमाणे येणारा अनुभव शब्दांत व्यक्त करता येत नाही. आत्मचैतन्यासाठी विश्वचैतन्याशी जी समरसता साधता येते तो अनुभव सर्वश्रेष्ठ असतो. त्यातूनच उत्तम प्रकारची सिद्धता प्राप्त करता येते. म्हणूनच आत्मानुभव प्राप्तीचे कर्म, भक्ती आणि ज्ञान अशा तीनही मार्गांचा अवलंब श्रीमद्भगवतगीतेत आला आहे. ज्ञानेश्वरांनी तर आपल्या भावार्थ दीपिकेत ज्ञानी, पंडित, आत्मानुभवी, संत-महंत, मुमुक्षू आणि सामान्यजन ह्यांना गीतेतील गुह्यगौप्य अर्थाचे स्पष्टीकरण दिले. या सर्व गोष्टींना कारणीभूत ‘मन’ आणि मनावर सर्वस्वी अवलंबून आहे. मनाला शुद्ध ठेवा, मग आपोआप सर्वसिद्ध होईल.

(लेखक हे श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक