शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मन शुद्ध ठेवा, मग आपोआप सर्वसिद्ध होईल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 13:03 IST

मन हे इंद्रिय सर्वात चंचल आणि चपळ आहे; पण एकदा का ह्या मनाला स्थिर केले की आत्मानंदाची प्राप्ती होते. मन स्थिर करण्यासाठी विविध प्रकारच्या उपासना सांगितल्या आहेत.

- डॉ. तुळशीदास गुट्टे

मन हे इंद्रिय सर्वात चंचल आणि चपळ आहे; पण एकदा का ह्या मनाला स्थिर केले की आत्मानंदाची प्राप्ती होते. मन स्थिर करण्यासाठी विविध प्रकारच्या उपासना सांगितल्या आहेत. त्यात ध्यान, योग, आराधना या सर्व उपाययोजना मनाला शांत करण्यासाठी आहेत. मनात अनेक वेळेला अनेक विचारांचा गुंता असतो. तो गुंता काही वेळेला वाढतच जातो. त्या गुंतलेल्या मनाला स्थिरावण्याची गरज भासते. कारण, मनाची शक्ती अफाट आहे. मनाची सूक्ष्मशक्ती मनासोबत सतत भ्रमंती करीत असते. प्रत्यक्ष व्यवहारात या शक्तीची जाणीव आपल्याला व इतरांनाही होते. कारण, आपल्या आतील एक मन आणि बाहेरचं एक मन हे वेगळे नसतात. ते एकच आहेत. तरीपण आपल्या आतल्या मनासोबतच शांतपणे, सहजपणे असतो. बाहेरील मन सतत अविचार करीत असते. अविचारी मन हिंसेला जन्म देते. हिंसा ही मानवी प्रवृत्तीला घातक ठरते. मानवी मनाला सुंदर करण्यासाठी योग्य त्या गोष्टींचा स्वीकार करणे महत्त्वाचे ठरते. आपले जीवन परिचित, नियमबद्ध करावे. त्यातून आत्मानंदाची प्राप्ती होते. व्यक्तीने प्रयत्नपूर्वक ‘योग्य’ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मन-बुद्धी आणि शरीर यांचा संयोग साधून मानवी जीवनाचे कल्याण करून घ्यावे. निरामय आनंद उपभोगताना मग आकाशात आकाश मिसळल्याप्रमाणे येणारा अनुभव शब्दांत व्यक्त करता येत नाही. आत्मचैतन्यासाठी विश्वचैतन्याशी जी समरसता साधता येते तो अनुभव सर्वश्रेष्ठ असतो. त्यातूनच उत्तम प्रकारची सिद्धता प्राप्त करता येते. म्हणूनच आत्मानुभव प्राप्तीचे कर्म, भक्ती आणि ज्ञान अशा तीनही मार्गांचा अवलंब श्रीमद्भगवतगीतेत आला आहे. ज्ञानेश्वरांनी तर आपल्या भावार्थ दीपिकेत ज्ञानी, पंडित, आत्मानुभवी, संत-महंत, मुमुक्षू आणि सामान्यजन ह्यांना गीतेतील गुह्यगौप्य अर्थाचे स्पष्टीकरण दिले. या सर्व गोष्टींना कारणीभूत ‘मन’ आणि मनावर सर्वस्वी अवलंबून आहे. मनाला शुद्ध ठेवा, मग आपोआप सर्वसिद्ध होईल.

(लेखक हे श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक