शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

कर्मवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 06:17 IST

भारतीय संस्कृती पलायनवादाचा विरोध करते. कर्मापासून पळणे किंवा त्यास टाळणे भारतीय संस्कृतीमध्ये प्रतिबंधित आहे.

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायकर्म हे मानवाच्या जीवनाचे मूळ आहे. याच कर्मामुळे हे जग संचालित होत असते. आपले व्यक्तिगत जीवन जे काही आहे, ते या कर्माच्या कारणास्तव आहे. हे सारे व्यक्तिगत कर्म मिळून सामूहिक कर्म बनले गेले आहे. म्हणजेच शास्त्रांमध्ये या जगास कर्मप्रधान म्हटले गेले आहे. रामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी म्हटले आहे -‘कर्मप्रधान विश्व रची राखा’व्यक्ती आणि समाजाचे भाग्य हे कर्मावरच अवलंबून आहे. सत्कर्मामुळे भरभराट आणि दुष्कर्मामुळे अधोगती अथवा पतन हे कारण आहे. जेव्हा आपण व्यक्ती, समाज अथवा देशाच्या संरचनेवर दृष्टिक्षेप टाकतो, तेव्हा आपणास त्या संरचनेमध्ये त्या व्यक्ती, समाज आणि देशाचे कर्म दिसून येते.हेच कारण आहे की, भारतीय संस्कृती पलायनवादाचा विरोध करते. कर्मापासून पळणे किंवा त्यास टाळणे भारतीय संस्कृतीमध्ये प्रतिबंधित आहे. कर्म कितीही वेदनादायक असले तरी त्याचे संपादन करणे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. जेव्हा आम्ही कर्माचा त्याग करतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये एक पोकळी निर्माण होते, तसेच ती पोकळी आमच्या जीवनात वेदनादायक समस्यांना जन्म देते. आम्ही समस्यांना दूर करण्याकरिता ज्या कर्मांचा त्याग करतो त्यामुळे समस्या वाढतच जातात आणि त्यानंतर त्या समस्यांचा सामना करणे आणखी कठीण होत जाते.श्रीमद्भगवद्गीता ही कर्मवादाच्या सिद्धांताचे उत्तम उदाहरण आहे. भगवान श्रीकृष्णाचा अर्जुनासोबतचा संवाद ही एक अद्भुत घटना आहे. कर्मवादापासून दूर पळणाऱ्या अर्जुनास निश्चित कार्यास लावणे हा या संवादाचा उद्देश होता. मानसिकरीत्या पूर्णत: खचलेल्या व्यक्तीस भगवान श्रीकृष्णाने अनेक उदाहरणे आणि प्रसंगांच्या माध्यमातून कर्माकरिता प्रेरित केलेले आहे.श्रीमद्भगवद्गीतेमधील तत्त्वज्ञानासोबत भगवान श्रीकृष्णाने कर्माच्या बाबतीत जे एक उदाहरण दिलेले आहे, ते उपयुक्त आणि प्रशंसनीय आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास म्हटले की, मी पूर्ण आहे, मला कुठल्याच गोष्टींची आवश्यकता नाही, तरीही मी कर्म करतो कारण जर मी कर्म करणार नाही तर मला बघून लोकसुद्धा कर्म करणार नाही आणि समाजव्यवस्था विस्कळीत होईल. म्हणजेच कर्म हे मानवाच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. हेच कारण आहे की संसारातून मुक्त झाल्यानंतरसुद्धा भगवान बुद्धांनी कर्म करणे सोडले नाही.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक