शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

कर्म म्हणजे शरीर, तर धर्म म्हणजे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 13:18 IST

शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये जो व्यवहार होतो त्याला काही लोक धर्म समजतात.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजज्या तत्त्वाच्या अभावामुळे जीवन छिन्न-विछिन्न होते असे मूलभूत तत्त्व म्हणजे धर्म असे आपण समजतो. धर्माचे मुख्य स्वरूप सूक्ष्म आहे. त्यामध्ये कर्म शरीर व धर्म म्हणजे प्राण हीच आपली भावना असते. शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये जो व्यवहार होतो त्याला काही लोक धर्म समजतात. खरं म्हणजे समाजाला त्याच्या आजच्या स्थितीतून आदर्शाकडे घेऊन जाणारा जो विचार आहे तोच धर्मविचार होय. ज्याप्रमाणे कान, डोळे, नाक इत्यादी इंद्रियांच्याद्वारे ‘मन’च निरनिराळ्या रीतीने प्रकट होते त्याप्रमाणे मनुष्याच्या प्रकृतीनुसार त्याचा धर्म दिसून येतो. आपण व्यवहाराच्या सर्व शाखांशी धर्माचा संबंध जोडतो. त्यामुळे धर्म आणि व्यवहार यांचा संबंध अमोघ राहिला पाहिजे. खरं म्हणजे माझा धर्म कोणता हे कोण्या शास्त्राकाराची किंवा धर्मग्रंथात शोधायची गरज नाही. मनुष्याला स्वयंभूरीत्या समजून येणारी ती गोष्ट आहे.सहजत्स्फूर्त मानवधर्म विकसित झाला पाहिजे. मनुष्याने मानवधर्माला सोडले नाही पाहिजे. एका विशिष्ट चौकटीत धर्माला स्थान नको. ते विश्वव्यापक स्वरूपाने समाजासमोर मांडले पाहिजे. श्रद्धा, प्रेम-सत्य व त्याग असा रीतीने धर्म समजून घेतला जावा. माणसा-माणसांत विखुरलेल्या समाजाला एकसंघ बनविण्यात धर्माची मदत झाली पाहिजे. मनुष्याला अध्यात्माकडे घेऊन जाणारा धर्म आहे. धर्म आणि अध्यात्म एकाच वस्तूकडे जातात. धर्माचे स्वरूप वेगवेगळे असू शकते; परंतु अध्यात्म एकच असते. अध्यात्माशिवाय शांती नाही. ते एकतत्त्वाला धरत असते. ईश्वरतत्त्वाला जाणायचे असेल तर अध्यात्माशी एकरूप व्हा. कुठल्याही परिस्थितीत न डगमगता आपण आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहून, अध्यात्म जगले पाहिजे. अध्यात्म जगणारा माणूस गौण-मुख्य यापासून निराळा असतो. तो विवेकाला धरून आपले कार्य करीत असतो. अध्यात्म जगताना ज्या अनुभूती येतात त्या पवित्र असतात. त्या अध्यात्म जगणाऱ्याच्या जीवनात प्रकटतात. तो अनुभव प्रकट करण्याचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत असते. त्यातूनच त्याचा खरा धर्म कळतो. धर्मानुसारच मग त्याला त्याचे फळ मिळते. मन समाधानात रमून जाते.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आणि सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक