शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग : आनंदी आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 03:14 IST

‘भाव ज्याचे गाठी। त्यासी लाभ उठाउठी।।’ अशी अनुभूती घेता येत असते

इंद्रजीत देशमुख

तुकोबाराय आम्हाला उच्च दर्जाची पारमार्थिक अनुभूती घेण्यासाठी भावयुक्त अंत:करणाने त्याची आराधना करायला सांगतात. वास्तविक संसार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी योग्य रीतीने साधण्यासाठी भाव असावाच लागतो. जीवनातील प्रत्येक गोष्ट भावाच्या आधारावरच साधावी लागते. हाच भाव आपल्या दिवसभराच्या प्रत्येक व्यवहारात रूप बदलून आपल्याला वर्तवत असतो. त्यामुळेच आपला एखाद्याशी खूप जिवलग स्नेह तर एखाद्याशी अतिआकसी भांडण असे वर्तन आपल्या हातून होत असते. पारमार्थिकाबाबत ज्याच्या अंत:करणात सात्त्विक भावाचं भरतं आलेलं असतं तो या जगातील प्रत्येक जीवाला, ‘अवघे जन मज झाले लोकपाळ। सोयरे सकळ प्राणसखे’ या न्यायाने आपलंसं मानत असतो आणि त्यांच्याप्रति आपलं वर्तन ठेवत असतो. ज्यांची जीवनचर्या या भूमिकेने बहरलेली असते त्यांच्या जीवनात,

‘भाव ज्याचे गाठी। त्यासी लाभ उठाउठी।।’ अशी अनुभूती घेता येत असते. म्हणूनच प्रभुचिंतन करत असताना ‘आमच्या अंतरी कंठी प्रेम दाटे नयनी निर लोटे। हृदयी प्रगटे रामरूप।।' अशी सार्द्रता निर्माण व्हायला हवी. अशी भाविकता आम्ही जोपासली की आमच्या अंतरी कोणतंच वैषम्यमंडित मळभ उरत नाही आणि मग आम्ही आमचं आणि इतरांचं असं अवघ्यांचं आयुष्य आनंदी करू शकतो. भाविकतेत आपल्या मनात कमी-जास्तपणाचा भेद उरत नाही म्हणूनच सुदामा नावाचा गरीब मित्र आपल्या फाटक्या कणवटीत बांधून आणलेले मूठभर पोहे द्वारकाधीश श्रीकृष्णाला देतो तेव्हा राज्यपदी विराजमान असलेला हा परमात्मा ते पोहे मिटक्या मारत मारत आवडीने खातो. हा सगळा भावाचा परिणाम आणि प्रभाव आहे. जीवनातील प्रत्येक कृती जर भाव भरून केली तर ती प्रत्येक कृती आपल्या आराध्याला आवडणारी पूजाच असेल. अगदी माउलींच्याच भाषेत सांगायचं तर ‘मग तीही जे जे करावे। ते मजची पडले आघवे।।’ 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक