शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

आनंद तरंग : आनंदी आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 03:14 IST

‘भाव ज्याचे गाठी। त्यासी लाभ उठाउठी।।’ अशी अनुभूती घेता येत असते

इंद्रजीत देशमुख

तुकोबाराय आम्हाला उच्च दर्जाची पारमार्थिक अनुभूती घेण्यासाठी भावयुक्त अंत:करणाने त्याची आराधना करायला सांगतात. वास्तविक संसार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी योग्य रीतीने साधण्यासाठी भाव असावाच लागतो. जीवनातील प्रत्येक गोष्ट भावाच्या आधारावरच साधावी लागते. हाच भाव आपल्या दिवसभराच्या प्रत्येक व्यवहारात रूप बदलून आपल्याला वर्तवत असतो. त्यामुळेच आपला एखाद्याशी खूप जिवलग स्नेह तर एखाद्याशी अतिआकसी भांडण असे वर्तन आपल्या हातून होत असते. पारमार्थिकाबाबत ज्याच्या अंत:करणात सात्त्विक भावाचं भरतं आलेलं असतं तो या जगातील प्रत्येक जीवाला, ‘अवघे जन मज झाले लोकपाळ। सोयरे सकळ प्राणसखे’ या न्यायाने आपलंसं मानत असतो आणि त्यांच्याप्रति आपलं वर्तन ठेवत असतो. ज्यांची जीवनचर्या या भूमिकेने बहरलेली असते त्यांच्या जीवनात,

‘भाव ज्याचे गाठी। त्यासी लाभ उठाउठी।।’ अशी अनुभूती घेता येत असते. म्हणूनच प्रभुचिंतन करत असताना ‘आमच्या अंतरी कंठी प्रेम दाटे नयनी निर लोटे। हृदयी प्रगटे रामरूप।।' अशी सार्द्रता निर्माण व्हायला हवी. अशी भाविकता आम्ही जोपासली की आमच्या अंतरी कोणतंच वैषम्यमंडित मळभ उरत नाही आणि मग आम्ही आमचं आणि इतरांचं असं अवघ्यांचं आयुष्य आनंदी करू शकतो. भाविकतेत आपल्या मनात कमी-जास्तपणाचा भेद उरत नाही म्हणूनच सुदामा नावाचा गरीब मित्र आपल्या फाटक्या कणवटीत बांधून आणलेले मूठभर पोहे द्वारकाधीश श्रीकृष्णाला देतो तेव्हा राज्यपदी विराजमान असलेला हा परमात्मा ते पोहे मिटक्या मारत मारत आवडीने खातो. हा सगळा भावाचा परिणाम आणि प्रभाव आहे. जीवनातील प्रत्येक कृती जर भाव भरून केली तर ती प्रत्येक कृती आपल्या आराध्याला आवडणारी पूजाच असेल. अगदी माउलींच्याच भाषेत सांगायचं तर ‘मग तीही जे जे करावे। ते मजची पडले आघवे।।’ 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक