शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

आनंद तरंग : आनंदी आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 03:14 IST

‘भाव ज्याचे गाठी। त्यासी लाभ उठाउठी।।’ अशी अनुभूती घेता येत असते

इंद्रजीत देशमुख

तुकोबाराय आम्हाला उच्च दर्जाची पारमार्थिक अनुभूती घेण्यासाठी भावयुक्त अंत:करणाने त्याची आराधना करायला सांगतात. वास्तविक संसार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी योग्य रीतीने साधण्यासाठी भाव असावाच लागतो. जीवनातील प्रत्येक गोष्ट भावाच्या आधारावरच साधावी लागते. हाच भाव आपल्या दिवसभराच्या प्रत्येक व्यवहारात रूप बदलून आपल्याला वर्तवत असतो. त्यामुळेच आपला एखाद्याशी खूप जिवलग स्नेह तर एखाद्याशी अतिआकसी भांडण असे वर्तन आपल्या हातून होत असते. पारमार्थिकाबाबत ज्याच्या अंत:करणात सात्त्विक भावाचं भरतं आलेलं असतं तो या जगातील प्रत्येक जीवाला, ‘अवघे जन मज झाले लोकपाळ। सोयरे सकळ प्राणसखे’ या न्यायाने आपलंसं मानत असतो आणि त्यांच्याप्रति आपलं वर्तन ठेवत असतो. ज्यांची जीवनचर्या या भूमिकेने बहरलेली असते त्यांच्या जीवनात,

‘भाव ज्याचे गाठी। त्यासी लाभ उठाउठी।।’ अशी अनुभूती घेता येत असते. म्हणूनच प्रभुचिंतन करत असताना ‘आमच्या अंतरी कंठी प्रेम दाटे नयनी निर लोटे। हृदयी प्रगटे रामरूप।।' अशी सार्द्रता निर्माण व्हायला हवी. अशी भाविकता आम्ही जोपासली की आमच्या अंतरी कोणतंच वैषम्यमंडित मळभ उरत नाही आणि मग आम्ही आमचं आणि इतरांचं असं अवघ्यांचं आयुष्य आनंदी करू शकतो. भाविकतेत आपल्या मनात कमी-जास्तपणाचा भेद उरत नाही म्हणूनच सुदामा नावाचा गरीब मित्र आपल्या फाटक्या कणवटीत बांधून आणलेले मूठभर पोहे द्वारकाधीश श्रीकृष्णाला देतो तेव्हा राज्यपदी विराजमान असलेला हा परमात्मा ते पोहे मिटक्या मारत मारत आवडीने खातो. हा सगळा भावाचा परिणाम आणि प्रभाव आहे. जीवनातील प्रत्येक कृती जर भाव भरून केली तर ती प्रत्येक कृती आपल्या आराध्याला आवडणारी पूजाच असेल. अगदी माउलींच्याच भाषेत सांगायचं तर ‘मग तीही जे जे करावे। ते मजची पडले आघवे।।’ 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक