शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
5
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
6
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
7
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
8
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
9
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
10
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
11
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
12
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
13
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
14
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
15
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
16
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
17
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
18
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
20
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?

आनंद तरंग : आनंदी आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 03:14 IST

‘भाव ज्याचे गाठी। त्यासी लाभ उठाउठी।।’ अशी अनुभूती घेता येत असते

इंद्रजीत देशमुख

तुकोबाराय आम्हाला उच्च दर्जाची पारमार्थिक अनुभूती घेण्यासाठी भावयुक्त अंत:करणाने त्याची आराधना करायला सांगतात. वास्तविक संसार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी योग्य रीतीने साधण्यासाठी भाव असावाच लागतो. जीवनातील प्रत्येक गोष्ट भावाच्या आधारावरच साधावी लागते. हाच भाव आपल्या दिवसभराच्या प्रत्येक व्यवहारात रूप बदलून आपल्याला वर्तवत असतो. त्यामुळेच आपला एखाद्याशी खूप जिवलग स्नेह तर एखाद्याशी अतिआकसी भांडण असे वर्तन आपल्या हातून होत असते. पारमार्थिकाबाबत ज्याच्या अंत:करणात सात्त्विक भावाचं भरतं आलेलं असतं तो या जगातील प्रत्येक जीवाला, ‘अवघे जन मज झाले लोकपाळ। सोयरे सकळ प्राणसखे’ या न्यायाने आपलंसं मानत असतो आणि त्यांच्याप्रति आपलं वर्तन ठेवत असतो. ज्यांची जीवनचर्या या भूमिकेने बहरलेली असते त्यांच्या जीवनात,

‘भाव ज्याचे गाठी। त्यासी लाभ उठाउठी।।’ अशी अनुभूती घेता येत असते. म्हणूनच प्रभुचिंतन करत असताना ‘आमच्या अंतरी कंठी प्रेम दाटे नयनी निर लोटे। हृदयी प्रगटे रामरूप।।' अशी सार्द्रता निर्माण व्हायला हवी. अशी भाविकता आम्ही जोपासली की आमच्या अंतरी कोणतंच वैषम्यमंडित मळभ उरत नाही आणि मग आम्ही आमचं आणि इतरांचं असं अवघ्यांचं आयुष्य आनंदी करू शकतो. भाविकतेत आपल्या मनात कमी-जास्तपणाचा भेद उरत नाही म्हणूनच सुदामा नावाचा गरीब मित्र आपल्या फाटक्या कणवटीत बांधून आणलेले मूठभर पोहे द्वारकाधीश श्रीकृष्णाला देतो तेव्हा राज्यपदी विराजमान असलेला हा परमात्मा ते पोहे मिटक्या मारत मारत आवडीने खातो. हा सगळा भावाचा परिणाम आणि प्रभाव आहे. जीवनातील प्रत्येक कृती जर भाव भरून केली तर ती प्रत्येक कृती आपल्या आराध्याला आवडणारी पूजाच असेल. अगदी माउलींच्याच भाषेत सांगायचं तर ‘मग तीही जे जे करावे। ते मजची पडले आघवे।।’ 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक