शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

आनंद तरंग- पापामुळे सत्याचे वाटोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 02:29 IST

गेल्या अनेक शतकांपासून माणसांच्या मनात दोन संकल्पना घर करून बसल्या आहेत. एक म्हणजे ‘पाप’ आणि दुसरी म्हणजे ‘पुण्य’ पुण्याचा माणूस संचय करीत राहतो,

प्रा. शिवाजीराव भुकेलेगेल्या अनेक शतकांपासून माणसांच्या मनात दोन संकल्पना घर करून बसल्या आहेत. एक म्हणजे ‘पाप’ आणि दुसरी म्हणजे ‘पुण्य’ पुण्याचा माणूस संचय करीत राहतो, तर पापाला भित राहतो. आपल्या देशात सत्तर टक्क्यांहून अधिक माणसे पापभिरूआहेत. त्यामुळे तीर्थक्षेत्रावर माणसांची गर्दी ओसंडून वाहत आहे. देवी-देवतांच्या देवळाच्या भिंंतीला सिमेंट आणि मातीसुद्धा शिल्लक राहत नाही एवढे त्यांचे उंबरे झिजविले जात आहेत. या वेळी सुज्ञ माणसाच्या मनात राहून-राहून एकच प्रश्न उभा राहतो. अत्याधुनिकतेची समज येऊनसुद्धा आमच्या घड्याळाचे काटे उलटे तर फिरत नाहीत ना? पाप मनाने करायचे आणि धुऊन शरीराला काढायचे हा कुठला पापक्षालनाचा न्याय? मुळात पाप ही एक रोगट मानसिकतेची प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती नको ती कृती करायला लावते आणि अशा कृती समाजाला विकृत करीत राहतात. आपण किती पापी आहोत याचे भूत-भविष्य वर्तविण्यासाठी कुठल्या गुरूची गरज नाही. तोंडात देवाचे नाव आणि बगलेत सुरी असेल. वरून-वरून दान-धर्माची दांभिक कृती करायची आणि मनात परधन, परनारी यांना ओरबाडून काढायचे प्लॅनिंंग सुरू असेल, दुसऱ्याला काटा रुतल्यानंतर आपले दात दिसत असतील, दुसºयाचे आसू हेच आपले हसू असेल तर आपण शंभर टक्के पापी आहोत, असे समजायला काहीच हरकत नाही. अशा पापात्मक प्रवृत्तीमुळे सत्याचे पार वाटोळे झालेय म्हणून या प्रवृत्तीचा निषेध करताना तुकोबाराय म्हणतात -पापाचिया मुळे, झाले सत्याचे वाटोळे।दोष जाहले बळीवंत, नाही ऐंसी जाली नीत ।मेघ पडो येतो भीती, पिके साडीयली क्षिती ।तुका म्हणे काही वेदावीर्य शक्ती नाही॥समाजात जेव्हा पापात्मक दोष बलवंत होतात तेव्हा त्या समाजातील दोषी मंडळींची वाटचाल नरकाच्या दिशेने सुरू आहे, असे समजायला काहीच हरकत नाही.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक