शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

ज्ञानमोचक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 04:25 IST

मराठीचे आद्य गद्य लेखक म्हाइंभटाने स्वामींना एकदा प्रश्न विचारला, ज्ञानाचं काय लक्षण? स्वामींनी ‘ज्ञानमोचक’ हे सूत्र सांगून उत्तर दिलं.

- बा.भो. शास्त्रीमराठीचे आद्य गद्य लेखक म्हाइंभटाने स्वामींना एकदा प्रश्न विचारला, ज्ञानाचं काय लक्षण? स्वामींनी ‘ज्ञानमोचक’ हे सूत्र सांगून उत्तर दिलं. जे अधीन, अज्ञान व अविद्या बंधनं तोडतं ते ज्ञान. हे त्याचं लक्षण आहे. या तीनच बंधनांत जग अडकलं आहे. जे दिसत नसतात पण असतात. प्रेम दिसत नाही पण बंधन असतं. धाक दिसत नाही पण बंधन असतं. कायदा दिसत नाही पण बंधन आहे. विकार दिसत नाही पण त्यांचा आपल्यावर ताबा असतो. तनाच्या, मनाच्या, जनाच्या, धनाच्या सर्वच अधीन असतात. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या ग.दि.मा.च्या काव्यात सुरेख वर्णन केलं आहे. जो शब्द लक्ष्याचं लक्षण सांगतो त्याला शास्त्रात लक्षण म्हणतात. सूत्रात मोचक या क्रियापदाने ज्ञानाचं लक्षण सांगितलं आहे. खरं तर, भटाला ज्ञानाचं लक्षण आधीच ठाऊक होतं. कारण स्वामींच्या पहिल्या भेटीत जो संवाद झाला. त्यात ‘ज्ञानउदयें मोक्षु’ असं त्यांनीच उत्तर दिलं आहे. पुन्हा ‘ज्ञानादेव तु कैवल्यं! ज्ञात्वादेवं मुच्यते सर्वपाशै:’ या वेद उपनिषदाने केलेल्या व्याख्या त्यांना माहिती होत्याच. गीतेने ज्ञानाचं विस्तारपूर्वक केलेलं विवेचनही त्यांना कळलं होतं. मग तोच प्रश्न पुन्हा का विचारला? तर, अधिकार वाणीतून ‘ज्ञानं मोचकं’ याचा मराठी अनुवाद त्यांना ऐकण्याची इच्छा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैखरीला परेचा स्पर्श व्हावा असं कुणाला वाटत नाही. हे सूत्र म्हणजे प्रकाशाचा पुंज आहे. सूत्रसृष्टीत तळपणारा तापहीन सूर्य आहे. अज्ञान व आशापाशांनी जखडलेल्या जीवांना मुक्तीमार्ग दाखवणारा दीपस्तंभ आहे. आणखी एका सूत्रात स्वामी ज्ञानाचं लक्षण सांगताना म्हणतात,‘‘जे जैसे असे ते तैसे जाणिजे ते ज्ञान’’यात स्वामींनी यथार्थ ज्ञानाचा परिचय करून दिला आहे. ज्ञान सत्य असतं, मिथ्या नसतं. जे जसं आहे ते तसंच जाणणं याचं नाव ज्ञान. ते आरशासारखं सत्य दाखवतं खोटं बोलत नाही. ते ज्ञान अग्नीसारखं निर्दोष, पाण्यासारखं निर्मळ व तलवारीसारखं धारदार आहे. गीतेने त्याला नौका व पवित्र म्हटलं आहे. ज्ञानाने कुणालाही कधीच फसवलं नाही. ज्ञानापासून साध्या लोकांना वंचित ठेवणारा वर्ग वेगळाच आहे. त्यांनीच अज्ञानाच्या अंधारात ठेवलं व मिथ्या ज्ञानाने आपल्या अनेक पिढ्या बरबाद केल्या. आम्ही माहितीला ज्ञान समजतो ती अचूक नसते. तिच्यावरचा विश्वास आंधळा असतो. देव भगताच्या अंगात येतो. कोंबडा, बकरा मागतो. कुणी अंगातल्या देवाला देवत्वाचा पुरावा मागत नाही. गाडगेबाबा कीर्तनात म्हणायचे, ‘‘असा कसा तुमचा देव, घेतो बकराचे जीव.’’ बळी घेणारा देव दयाळू कसा? शुद्ध बुद्ध देव घाणेरड्या देहात कसा? देव उदार. तो नारळ नैवेद्याची भीक कसा मागतो? तो धरतो म्हणे. तो पोलीस का लुटारू, ही तर खंडणी झाली. मुक्तीची भाषा करणारा व अडचणीत आणतो. देव कृपाळू मांसाहारी कसा? श्रद्धेला पुरावा लागतो, अंधश्रद्धा अफवेवर पोसली जाते. अफवा सोडणे हा अन्यथा ज्ञानाचा जोरात चालणारा धंदा आहे. पण असत्य हे कदापिही विज्ञानाच्या प्रयोगशाळेत टिकत नाही. ‘सत्यमेव’च जयते. स्वामी एक सुंदर गोष्ट सांगतात, दोन गुरुबंधूंना एक डुक्कर दिसलं, एक म्हणतो हा मोठा उंदीर आहे. दुसरा म्हणतो हत्तीचं लहान पिल्लू आहे. दोघांचा वाद होतो. सत्य कळावं म्हणून डुकराला गुरूकडे नेतात. आपलं मत सांगतात, गुरू म्हणतो, मी तुम्हाला एवढं ज्ञान दिलं, पण व्यर्थ. अरे हे डुक्कर नाही व हत्तीचं पिल्लूही नाही हा पक्षी आहे. स्वामी हसून म्हणतात, शिष्य जुळतंमिळतं बोलले, पण गुरूने असत्याची हद्द पार केली.