शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग ३२, कर आणि पहा या नांव कॄपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 08:00 IST

आज बरेच लोक मेडिटेशन करतात. मेडीटेशन करणे वाईट आहे असे मला म्हणायचे नाही. पण तुम्ही जर म्हणाल मेडिटेशनचा क्लास लाऊन मला मनशांती मिळेल तर त्यामुळे ती मिळणार नाही. आधी तुमची मनशांती का ढळली आणि तुम्हांला आता मनशांतीच्या क्लासला का जावे लागत आहे याचा विचार करा

ठळक मुद्देमनशांती ढळण्याचे एकच कारण तुम्ही चांगले बोलत नाही व चांगल्या इच्छा करत नाहीआनंदी मनुष्य जिथे जाईल तिथे आनंद देतोमनशांती हवी असेल तर आधी शुभ बोला, शुभ इच्छा करा, शुभ चिंतन करा आणि यथाशक्ती शुभ करा

- सदगुरू श्री वामनराव पैआज बरेच लोक मेडिटेशन करतात. मेडीटेशन करणे वाईट आहे असे मला म्हणायचे नाही. पण तुम्ही जर म्हणाल मेडिटेशनचा क्लास लाऊन मला मनशांती मिळेल तर त्यामुळे ती मिळणार नाही. आधी तुमची मनशांती का ढळली आणि तुम्हांला आता मनशांतीच्या क्लासला का जावे लागत आहे याचा विचार करा. मनशांती ढळण्याचे एकच कारण तुम्ही चांगले बोलत नाही व चांगल्या इच्छा करत नाही. जीवनविद्या सांगते तुला मनशांती पाहिजे तर मी सांगतो ते कर. हे केल्याने नुसती तुलाच मनशांती मिळेल असे नाही तर तू इतरांना देखील मनशांती देऊ शकशील. त्यामुळे तुला तर मनशांती मिळेलच पण तुझ्यामुळे इतर लोकांना देखील मनशांती मिळेल. त्याचबरोबर तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे तू इतर लोकांना आनंदी करशील. अत्तरवाला असतो ना तो अत्तराच्या बाटल्या सोबत घेवून फिरतो त्यामुळे तो जिथे जाईल तिथे सुगंध दरवळतो. तसा आनंदी मनुष्य जिथे जाईल तिथे आनंद देतो. मग तुम्हाला पण अशी मनशांती हवी असेल तर आधी शुभ बोला, शुभ इच्छा करा, शुभ चिंतन करा आणि यथाशक्ती शुभ करा मग तुम्हांला मनशांती मिळते की नाही ते बघा. आता हे कुणी करायचे तर यावर लोक मला सांगतात वामनराव की तुम्हीच आमच्यावर कॄपा करा. मी सांगतो कर आणि पहा या नांव कृपा. म्हणून मी आता सांगितले तसे करा आणि मनशांती मिळते का ते पहा. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सुध्दा सांगतात, “डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी, तुका म्हणे घे रे जीवा नको सोडू या केशवा”.

यावरुन मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे ती म्हणजे मी हा विषय मांडत असताना अखिल मानव जात डोळयासमोर ठेवून हे सांगत आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाने मी मानवजातीचा प्रतिनिधी आहे हे लक्षांत घेऊन ते वाचावे म्हणजे मी काय सांगतो ते तुम्हांला लगेच कळेल. माझे प्रबोधन हे अखिल मानवजातीला उद्देशून असते.हे सांगण्याचे कारण हेच की सुखी होणे किंवा दु:खी होणे हे आपल्या एकटयावर अवलंबून नसते हा एक महत्वाचा भाग आहे. मनुष्य हा समाजात रहाणारा प्राणी आहे म्हणून तो समाजाचा एक घटक आहे. मनुष्य हा समाजाचा घटक असल्यामुळे समाजात जे काही घडते त्याचे सुपरिणाम किंवा दुष्परिणाम त्याच्यावर होत असतात व व्यक्तिकडून होणा-या कर्माचे सुपरिणाम किंवा दुष्परिणाम कुटुंबावर, समाजावर, राष्ट्रावर आणि विश्वावर होत असतात ही गोष्ट लक्षांत ठेवली तर आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा मी फक्त माझ्यापुरता विचार करतो असे बोलणे कसे अयोग्य आहे ते तुमच्या लक्षात येईल.