शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग ३२, कर आणि पहा या नांव कॄपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 08:00 IST

आज बरेच लोक मेडिटेशन करतात. मेडीटेशन करणे वाईट आहे असे मला म्हणायचे नाही. पण तुम्ही जर म्हणाल मेडिटेशनचा क्लास लाऊन मला मनशांती मिळेल तर त्यामुळे ती मिळणार नाही. आधी तुमची मनशांती का ढळली आणि तुम्हांला आता मनशांतीच्या क्लासला का जावे लागत आहे याचा विचार करा

ठळक मुद्देमनशांती ढळण्याचे एकच कारण तुम्ही चांगले बोलत नाही व चांगल्या इच्छा करत नाहीआनंदी मनुष्य जिथे जाईल तिथे आनंद देतोमनशांती हवी असेल तर आधी शुभ बोला, शुभ इच्छा करा, शुभ चिंतन करा आणि यथाशक्ती शुभ करा

- सदगुरू श्री वामनराव पैआज बरेच लोक मेडिटेशन करतात. मेडीटेशन करणे वाईट आहे असे मला म्हणायचे नाही. पण तुम्ही जर म्हणाल मेडिटेशनचा क्लास लाऊन मला मनशांती मिळेल तर त्यामुळे ती मिळणार नाही. आधी तुमची मनशांती का ढळली आणि तुम्हांला आता मनशांतीच्या क्लासला का जावे लागत आहे याचा विचार करा. मनशांती ढळण्याचे एकच कारण तुम्ही चांगले बोलत नाही व चांगल्या इच्छा करत नाही. जीवनविद्या सांगते तुला मनशांती पाहिजे तर मी सांगतो ते कर. हे केल्याने नुसती तुलाच मनशांती मिळेल असे नाही तर तू इतरांना देखील मनशांती देऊ शकशील. त्यामुळे तुला तर मनशांती मिळेलच पण तुझ्यामुळे इतर लोकांना देखील मनशांती मिळेल. त्याचबरोबर तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे तू इतर लोकांना आनंदी करशील. अत्तरवाला असतो ना तो अत्तराच्या बाटल्या सोबत घेवून फिरतो त्यामुळे तो जिथे जाईल तिथे सुगंध दरवळतो. तसा आनंदी मनुष्य जिथे जाईल तिथे आनंद देतो. मग तुम्हाला पण अशी मनशांती हवी असेल तर आधी शुभ बोला, शुभ इच्छा करा, शुभ चिंतन करा आणि यथाशक्ती शुभ करा मग तुम्हांला मनशांती मिळते की नाही ते बघा. आता हे कुणी करायचे तर यावर लोक मला सांगतात वामनराव की तुम्हीच आमच्यावर कॄपा करा. मी सांगतो कर आणि पहा या नांव कृपा. म्हणून मी आता सांगितले तसे करा आणि मनशांती मिळते का ते पहा. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सुध्दा सांगतात, “डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी, तुका म्हणे घे रे जीवा नको सोडू या केशवा”.

यावरुन मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे ती म्हणजे मी हा विषय मांडत असताना अखिल मानव जात डोळयासमोर ठेवून हे सांगत आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाने मी मानवजातीचा प्रतिनिधी आहे हे लक्षांत घेऊन ते वाचावे म्हणजे मी काय सांगतो ते तुम्हांला लगेच कळेल. माझे प्रबोधन हे अखिल मानवजातीला उद्देशून असते.हे सांगण्याचे कारण हेच की सुखी होणे किंवा दु:खी होणे हे आपल्या एकटयावर अवलंबून नसते हा एक महत्वाचा भाग आहे. मनुष्य हा समाजात रहाणारा प्राणी आहे म्हणून तो समाजाचा एक घटक आहे. मनुष्य हा समाजाचा घटक असल्यामुळे समाजात जे काही घडते त्याचे सुपरिणाम किंवा दुष्परिणाम त्याच्यावर होत असतात व व्यक्तिकडून होणा-या कर्माचे सुपरिणाम किंवा दुष्परिणाम कुटुंबावर, समाजावर, राष्ट्रावर आणि विश्वावर होत असतात ही गोष्ट लक्षांत ठेवली तर आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा मी फक्त माझ्यापुरता विचार करतो असे बोलणे कसे अयोग्य आहे ते तुमच्या लक्षात येईल.