शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग ३२, कर आणि पहा या नांव कॄपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 08:00 IST

आज बरेच लोक मेडिटेशन करतात. मेडीटेशन करणे वाईट आहे असे मला म्हणायचे नाही. पण तुम्ही जर म्हणाल मेडिटेशनचा क्लास लाऊन मला मनशांती मिळेल तर त्यामुळे ती मिळणार नाही. आधी तुमची मनशांती का ढळली आणि तुम्हांला आता मनशांतीच्या क्लासला का जावे लागत आहे याचा विचार करा

ठळक मुद्देमनशांती ढळण्याचे एकच कारण तुम्ही चांगले बोलत नाही व चांगल्या इच्छा करत नाहीआनंदी मनुष्य जिथे जाईल तिथे आनंद देतोमनशांती हवी असेल तर आधी शुभ बोला, शुभ इच्छा करा, शुभ चिंतन करा आणि यथाशक्ती शुभ करा

- सदगुरू श्री वामनराव पैआज बरेच लोक मेडिटेशन करतात. मेडीटेशन करणे वाईट आहे असे मला म्हणायचे नाही. पण तुम्ही जर म्हणाल मेडिटेशनचा क्लास लाऊन मला मनशांती मिळेल तर त्यामुळे ती मिळणार नाही. आधी तुमची मनशांती का ढळली आणि तुम्हांला आता मनशांतीच्या क्लासला का जावे लागत आहे याचा विचार करा. मनशांती ढळण्याचे एकच कारण तुम्ही चांगले बोलत नाही व चांगल्या इच्छा करत नाही. जीवनविद्या सांगते तुला मनशांती पाहिजे तर मी सांगतो ते कर. हे केल्याने नुसती तुलाच मनशांती मिळेल असे नाही तर तू इतरांना देखील मनशांती देऊ शकशील. त्यामुळे तुला तर मनशांती मिळेलच पण तुझ्यामुळे इतर लोकांना देखील मनशांती मिळेल. त्याचबरोबर तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे तू इतर लोकांना आनंदी करशील. अत्तरवाला असतो ना तो अत्तराच्या बाटल्या सोबत घेवून फिरतो त्यामुळे तो जिथे जाईल तिथे सुगंध दरवळतो. तसा आनंदी मनुष्य जिथे जाईल तिथे आनंद देतो. मग तुम्हाला पण अशी मनशांती हवी असेल तर आधी शुभ बोला, शुभ इच्छा करा, शुभ चिंतन करा आणि यथाशक्ती शुभ करा मग तुम्हांला मनशांती मिळते की नाही ते बघा. आता हे कुणी करायचे तर यावर लोक मला सांगतात वामनराव की तुम्हीच आमच्यावर कॄपा करा. मी सांगतो कर आणि पहा या नांव कृपा. म्हणून मी आता सांगितले तसे करा आणि मनशांती मिळते का ते पहा. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सुध्दा सांगतात, “डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी, तुका म्हणे घे रे जीवा नको सोडू या केशवा”.

यावरुन मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे ती म्हणजे मी हा विषय मांडत असताना अखिल मानव जात डोळयासमोर ठेवून हे सांगत आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाने मी मानवजातीचा प्रतिनिधी आहे हे लक्षांत घेऊन ते वाचावे म्हणजे मी काय सांगतो ते तुम्हांला लगेच कळेल. माझे प्रबोधन हे अखिल मानवजातीला उद्देशून असते.हे सांगण्याचे कारण हेच की सुखी होणे किंवा दु:खी होणे हे आपल्या एकटयावर अवलंबून नसते हा एक महत्वाचा भाग आहे. मनुष्य हा समाजात रहाणारा प्राणी आहे म्हणून तो समाजाचा एक घटक आहे. मनुष्य हा समाजाचा घटक असल्यामुळे समाजात जे काही घडते त्याचे सुपरिणाम किंवा दुष्परिणाम त्याच्यावर होत असतात व व्यक्तिकडून होणा-या कर्माचे सुपरिणाम किंवा दुष्परिणाम कुटुंबावर, समाजावर, राष्ट्रावर आणि विश्वावर होत असतात ही गोष्ट लक्षांत ठेवली तर आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा मी फक्त माझ्यापुरता विचार करतो असे बोलणे कसे अयोग्य आहे ते तुमच्या लक्षात येईल.