शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रसन्न मनानेच विकारांवर मात शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:49 IST

जगभरात सध्या कोरोनाची दहशत पसरली आहे. वैश्विक संकट आपल्यावर आले आहे.

कोरोनाचे मोठे संकट आपल्यावर आले आहे. या कालखंडात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सरकारने दिलेल्या सूचनांचे आणि आदेशांचे पालन करायला हवे. या कालखंडात सद्विचारांचे आचरण आणि कल्याण होईल, असे आपले आवडते छंद जोपासायला हवेत. मन प्रसन्न ठेवणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. प्रसन्न मनानेच सर्व विकारांवर मात करता येणार आहे.

जगभरात सध्या कोरोनाची दहशत पसरली आहे. वैश्विक संकट आपल्यावर आले आहे. त्यावर आपल्याला मात करायची आहे. आलेल्या संकटाला न घाबरता, माणसाने धार्मिक आणि अध्यात्मिक साधनेने मन प्रसन्न ठेवायला हवे. ‘‘मन करा रे प्रसन्न...’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वप्रथम आपल्यामध्ये निर्माण झालेली भीती संपवायला हवी. यापूर्वी प्लेग, कॉलरा अशा अनेक साथी आल्या आणि आज त्यांचे नामोनिशानही नाही. त्यामुळे कोरोनाही संपणार आहे. मात्र, आहे त्या कालखंडात आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच घरी बसून चिंतन करायला हवे. कल्याण होईल, अशी आवड जोपासायला हवी. चिंता नव्हे.शरीर स्वास्थ असेल तर मन स्वास्थ राहील आणि शरीर स्वस्थ नसेल तर मन स्वास्थ, कसे राहणार? आपल्याला काय होईल? याविषयीचीच माणसाच्या मनात भीती आणि चिंता आहे. काय होईल, याचा भ्रमही आहे. कोरोना शेजारच्याला झाला मग मलाही होईल का? याची भीती आहे. खरे तर, अनेक लोक याच भीतीखाली वावरत आहेत. आणि अशी भीती बाळगली तर मन शांत कसे राहणार? माझ्या डोक्यावर जर कोणी टांगती तलवार ठेवली तर मन:शांती कशी लाभणार? खरे तर हा अत्यंत अवघड प्रश्न आहे. यावर मात करण्यासाठी संत चोखामेळा यांचा सुंदर अभंग आहे.

‘‘एकांती बैसोनि करी गुजगोष्टी। धरोनी हनुवटी बुझवित॥ नको बा मानु संसाराचा शीण। तुज एक खुण सांगतो मी॥ होणार ते होय न होणार ते न होय। सुख-दु:ख पाहे कर्माधिन॥ देव म्हणे चोख्या नको मानु शीण। तुज माझी आण भक्तराया॥, असा संत चोखामेळा यांनी अभंगात सांगितले आहे.जर जीवनात सिद्धांत ठरलेला आहे, तर मग एखाद्या गोष्टीबद्दल किती काळजी बाळगायची. मन शांत ठेवा, हे सांगणं जेवढं कठीण आहे, तेवढं प्रत्यक्षातून कृतीत आणणे अवघड आहे. दुसरी गोष्ट मन इतके चंचल आहे की, ते सुरुवातीला चांगल्यांचे चिंतन करण्याऐवजी वाईटांचेच चिंतन अधिक करीत असते. मन किती चंचल आहे, हे संत एकनाथ महाराजांनी आपल्या एका रचनेत सांगितले आहे. जोपर्यंत तुझी कृपा आमच्यावर होत नाही, तोपर्यंत हे मन शांत होणार नाही, हे संत एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. कोरोनाची व्याप्ती एवढी मोठी आहे की, तो केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर त्याने सगळे जग आपल्या कवेत घेतले आहे. अशावेळी मन शांत ठेवणे गरजेचे आहे. अर्थात, माणसाने चिंता करण्यापेक्षा माणसाने चिंतन करायला हवे. चांगल्या विचारांचे वाचन करायला हवे. संतांचे विचार वाचायला हवेत आणि आपल्याला समजलेले विचार आपल्या कुटुंबातील नागरिकांना सांगायला हवेत.

कोरोनाचा सामना करण्यासाठी देशातील डॉक्टर, संशोधकांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा सुरू केली आहे. नागरिक म्हणून आपलीही महत्त्वाची जबाबदारी आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच नामस्मरण करायला हवे. आपल्या माणसांना वेळ द्यावा, त्यांच्याबरोबरच वेळ घालवावा. आपल्याला जे खेळ आवडतात, कला आवडतात, त्या चांगल्या गोष्टींना वेळ द्यावा. ज्यांना पुस्तक वाचायला आवडते, त्यांनी सकारात्मक ऊर्जा देणारी पुस्तके, चरित्रे, संतसाहित्य वाचावे. तसेच अध्यात्मिक विचार ऐकावेत, सकारात्मक विचारांचे आचरण करावे. महत्त्वाची बाब म्हणजे, केंद्र किंवा राज्य सरकारने लॉकडाउनविषयी ज्या सूचना दिल्या आहेत, त्यांचे तंतोतत पालन करायला हवे.

संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग आहे, ‘‘धावलो मी आता आपुल्या शोधावे, कृपा करोनी देवे आश्वासीजे, कोण आम्हांस ते क्षिणले भागले, तुजविन उगले पांडुरंगा घेता नाम, कोणापासी आम्ही सांगावे सुख-दु:ख, कोण तहान भूक निवारी, कोण या तपाची करी परिहार...’’ शेवटी करुणा भाकणे एवढेच आपल्या हाती आहे. मन प्रसन्न ठेऊनच आपण कोणत्याही विकारावर मात करू शकतो.हभप बाबामहाराज सातारकर(शब्दांकन : विश्वास मोरे )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकcorona virusकोरोना वायरस बातम्या