शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

प्रसन्न मनानेच विकारांवर मात शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:49 IST

जगभरात सध्या कोरोनाची दहशत पसरली आहे. वैश्विक संकट आपल्यावर आले आहे.

कोरोनाचे मोठे संकट आपल्यावर आले आहे. या कालखंडात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सरकारने दिलेल्या सूचनांचे आणि आदेशांचे पालन करायला हवे. या कालखंडात सद्विचारांचे आचरण आणि कल्याण होईल, असे आपले आवडते छंद जोपासायला हवेत. मन प्रसन्न ठेवणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. प्रसन्न मनानेच सर्व विकारांवर मात करता येणार आहे.

जगभरात सध्या कोरोनाची दहशत पसरली आहे. वैश्विक संकट आपल्यावर आले आहे. त्यावर आपल्याला मात करायची आहे. आलेल्या संकटाला न घाबरता, माणसाने धार्मिक आणि अध्यात्मिक साधनेने मन प्रसन्न ठेवायला हवे. ‘‘मन करा रे प्रसन्न...’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वप्रथम आपल्यामध्ये निर्माण झालेली भीती संपवायला हवी. यापूर्वी प्लेग, कॉलरा अशा अनेक साथी आल्या आणि आज त्यांचे नामोनिशानही नाही. त्यामुळे कोरोनाही संपणार आहे. मात्र, आहे त्या कालखंडात आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच घरी बसून चिंतन करायला हवे. कल्याण होईल, अशी आवड जोपासायला हवी. चिंता नव्हे.शरीर स्वास्थ असेल तर मन स्वास्थ राहील आणि शरीर स्वस्थ नसेल तर मन स्वास्थ, कसे राहणार? आपल्याला काय होईल? याविषयीचीच माणसाच्या मनात भीती आणि चिंता आहे. काय होईल, याचा भ्रमही आहे. कोरोना शेजारच्याला झाला मग मलाही होईल का? याची भीती आहे. खरे तर, अनेक लोक याच भीतीखाली वावरत आहेत. आणि अशी भीती बाळगली तर मन शांत कसे राहणार? माझ्या डोक्यावर जर कोणी टांगती तलवार ठेवली तर मन:शांती कशी लाभणार? खरे तर हा अत्यंत अवघड प्रश्न आहे. यावर मात करण्यासाठी संत चोखामेळा यांचा सुंदर अभंग आहे.

‘‘एकांती बैसोनि करी गुजगोष्टी। धरोनी हनुवटी बुझवित॥ नको बा मानु संसाराचा शीण। तुज एक खुण सांगतो मी॥ होणार ते होय न होणार ते न होय। सुख-दु:ख पाहे कर्माधिन॥ देव म्हणे चोख्या नको मानु शीण। तुज माझी आण भक्तराया॥, असा संत चोखामेळा यांनी अभंगात सांगितले आहे.जर जीवनात सिद्धांत ठरलेला आहे, तर मग एखाद्या गोष्टीबद्दल किती काळजी बाळगायची. मन शांत ठेवा, हे सांगणं जेवढं कठीण आहे, तेवढं प्रत्यक्षातून कृतीत आणणे अवघड आहे. दुसरी गोष्ट मन इतके चंचल आहे की, ते सुरुवातीला चांगल्यांचे चिंतन करण्याऐवजी वाईटांचेच चिंतन अधिक करीत असते. मन किती चंचल आहे, हे संत एकनाथ महाराजांनी आपल्या एका रचनेत सांगितले आहे. जोपर्यंत तुझी कृपा आमच्यावर होत नाही, तोपर्यंत हे मन शांत होणार नाही, हे संत एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. कोरोनाची व्याप्ती एवढी मोठी आहे की, तो केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर त्याने सगळे जग आपल्या कवेत घेतले आहे. अशावेळी मन शांत ठेवणे गरजेचे आहे. अर्थात, माणसाने चिंता करण्यापेक्षा माणसाने चिंतन करायला हवे. चांगल्या विचारांचे वाचन करायला हवे. संतांचे विचार वाचायला हवेत आणि आपल्याला समजलेले विचार आपल्या कुटुंबातील नागरिकांना सांगायला हवेत.

कोरोनाचा सामना करण्यासाठी देशातील डॉक्टर, संशोधकांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा सुरू केली आहे. नागरिक म्हणून आपलीही महत्त्वाची जबाबदारी आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच नामस्मरण करायला हवे. आपल्या माणसांना वेळ द्यावा, त्यांच्याबरोबरच वेळ घालवावा. आपल्याला जे खेळ आवडतात, कला आवडतात, त्या चांगल्या गोष्टींना वेळ द्यावा. ज्यांना पुस्तक वाचायला आवडते, त्यांनी सकारात्मक ऊर्जा देणारी पुस्तके, चरित्रे, संतसाहित्य वाचावे. तसेच अध्यात्मिक विचार ऐकावेत, सकारात्मक विचारांचे आचरण करावे. महत्त्वाची बाब म्हणजे, केंद्र किंवा राज्य सरकारने लॉकडाउनविषयी ज्या सूचना दिल्या आहेत, त्यांचे तंतोतत पालन करायला हवे.

संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग आहे, ‘‘धावलो मी आता आपुल्या शोधावे, कृपा करोनी देवे आश्वासीजे, कोण आम्हांस ते क्षिणले भागले, तुजविन उगले पांडुरंगा घेता नाम, कोणापासी आम्ही सांगावे सुख-दु:ख, कोण तहान भूक निवारी, कोण या तपाची करी परिहार...’’ शेवटी करुणा भाकणे एवढेच आपल्या हाती आहे. मन प्रसन्न ठेऊनच आपण कोणत्याही विकारावर मात करू शकतो.हभप बाबामहाराज सातारकर(शब्दांकन : विश्वास मोरे )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकcorona virusकोरोना वायरस बातम्या