शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ज्या बुद्धीला प्रयोगशील प्रयत्नवादाची जोड मिळते तीच बुद्धी धारदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 04:54 IST

एखाद्या गोष्टीला सतत वापरत राहिले की, तिला धार चढते.

- विजयराज बोधनकरएखाद्या गोष्टीला सतत वापरत राहिले की, तिला धार चढते. तिचा उपयोग केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे होतात, परंतु एखादी गोष्ट फक्त पडूनच राहिली की, त्या गोष्टीची क्षमता हळूहळू कमी होत जाते आणि कालांतराने ती मृत होत जाते. बुद्धी ही अशीच गोष्ट आहे. ज्या बुद्धीला प्रयोगशील प्रयत्नवादाची जोड मिळत राहते, अशा व्यक्तीची बुद्धी नेहमीच धारदार होत जाते. खरे तर बुद्धीला प्रयोगशाळा म्हटले, तरी योग्य होईल. मेंदूंच्या पेशींची क्षमता प्रचंड आहे. त्या बुद्धीच्या अस्तित्वातून जाणिवेने माणूस कुठलीही निर्मिती करू शकतो. पुराणकाळापासून ते आतापर्यंत अचाट, अजस्त्र शोध मानवाने लावले. बुवाबाजीच्या जाळ्यात अडकलेला बराचसा समाज बुद्धीच्या महाद्वारातून स्वत:कडेच सामर्थ्याच्या नजरेने पाहू लागला. जातीपातीची लादलेली बंधने झुगारून फक्त एक मानव या भूमिकेतून प्रगतीच्या महामार्गावरून चालताना त्याला एकच साक्षात्कार होऊ लागला की, तो म्हणजे सातत्याने बुद्धीला प्रज्वलित ठेवले, तर बुद्धीच्या प्रत्येक कपाटातून अनेक जीवघेण्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात आणि त्याला ती मिळू लागली. जो माणूस सतत जगाला काहीतरी देत राहतो, त्याच्या सुखाची संपन्नता मात्र शब्दाच्या पलीकडची असते. मार्कांसाठी परीक्षा देणारे विद्यार्थी आणि आत्मचिंतनातून नवीन-नवीन शोध लावणारे विद्यार्थी यातला आत्मचिंतन करणारा विद्यार्थीच श्रेष्ठ ठरत जातो. डॉ. होमी भाभा ते डॉ. अब्दुल कलाम ही नावे आत्मचिंतनाच्या मार्गावरची आहेत. अशासारख्या अनेक अनेक महामानवांनी हे जग समृद्ध केले, ते केवळ बुद्धीचा वापर करूनच.