शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

प्रेरणादायी नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 05:36 IST

आपल्या जीवनात आपण ज्या कोणत्या स्वरूपाचे कार्य निवडले असेल, आपल्याला जर त्या परिस्थितींमध्ये पुढाकार घेण्याची इच्छा असेल, तर सर्वप्रथम ...

आपल्या जीवनात आपण ज्या कोणत्या स्वरूपाचे कार्य निवडले असेल, आपल्याला जर त्या परिस्थितींमध्ये पुढाकार घेण्याची इच्छा असेल, तर सर्वप्रथम आपण केवळ शब्दांद्वारे, फसवणूक किंवा चालाखी करून नाही, तर कृतीतून उदाहरण समोर ठेऊन लोकांचे नेतृत्व करणे आवश्यक आहे. मूलत: लोकांचे नेतृत्व करण्याची तुमची क्षमता म्हणजे आपल्याला पाहिजे असलेल्या दिशेने, एका विशिष्ट ध्येयाकडे जाण्यासाठी लोकांना प्रेरित करणे.

जर असे घडायला हवे असेल, तर त्यांनी स्वत:हून त्या दिशेने जाण्यासाठी तुम्ही त्यांना प्रेरित करता येणे आवश्यक आहे. काम करून घेण्यासाठी तुम्हाला सतत त्यांचा पाठपुरावा करावा लागत असेल, तर नेता बनणे अतिशय अवघड आहे आणि जसा तुमच्या टीमचा आकार वाढत जातो किंवा तुम्ही हाताळत असलेली टीम प्रत्यक्ष संपर्काच्या बाहेर असेल, तर त्यांना प्रेरित करून त्यांचे नेतृत्व करणे अधिक अवघड होईल. आपल्याला लोकांवर सतत लक्ष ठेवून त्यांना हाताळावे लागत असेल, तर तुम्ही त्यांचे नेतृत्व करू शकणार नाही. लोकांचे नेतृत्व तुम्ही तेव्हाच करू शकाल, जेव्हा ते तुम्ही अपेक्षित कार्य करण्यासाठी प्रेरित असतात आणि ते इतके प्रेरित असतात की, तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी ते करून दाखवू शकतील. असे असेल तरच नेतृत्व ही एक श्रमरहित, सहज प्रक्रिया बनते. जर तुम्हाला अपेक्षित अशी कार्य-कृती लोकांनी करण्यासाठी त्यांना प्रेरित करायचं असेल, तर तुमचे अवघे अस्तित्वच अशा प्रकारचे उदाहरण बनले पाहिजे की, स्वाभाविकपणे ते स्वत:हून; जे गरजेचे आहे ते करण्यासाठी सिद्ध असतील, अन्यथा नेतृत्व करणे शक्य नाही. कुठल्याही मनुष्यासाठी, शिक्षणाचा अर्थ आपली क्षितिजे रुंदावणे, आपल्या जीवनाची व्याप्ती विस्तारणे असा आहे. प्रत्येक वेळी आपण आपल्या मर्यादा विस्तारतो, तेव्हा तो एक आनंददायक अनुभव असतो़, पण मग असे का दिसून येते की, परीक्षेचे दडपण असह्य झाल्याने अनेक मुले आत्महत्या करतात? हे केवळ, शिक्षण आज ज्या प्रकारे दिले जाते, त्यामुळेच घडते आहे.

आजची संपूर्ण शिक्षण प्रणाली मानवासाठी अनेक अर्थाने विनाशकारी बनू शकते. याचा अर्थ असा नाही की, आपण हे शिक्षण देणे बंद करावे. ते फक्त मानवी वात्सल्य आणि मानवी स्पर्शाने दिले गेले पाहिजे, केवळ एक माहितीचा ढिगारा प्रस्तुत करणे नव्हे. मुले जे शिकत आहेत, ते सर्वकाही जीवनाशीच निगडित आहे-एकूण एक सर्वकाही जीवनच आहे, पण आजचे शिक्षण अशा पद्धतीने देण्यात येत आहे की, ते बहुतेक जीवनाशी संबंधित नाही. शिक्षण हे जीवनाशी निगडित हवे. ती सत्यशोधक प्रक्रिया असायला हवी, जिथे विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे की, ते काहीतरी नवीन शोधत आहेत. आम्ही ईशा होम स्कूल सुरू केले. त्याला ‘होम स्कूल’ असे म्हटले जाते. कारण ते एका कुटुंबाप्रमाणे चालविले जाते.

वेगवेगळ्या वयोगटांमधील विद्यार्थी एकत्र शिक्षण घेतात, एकत्र अभ्यास करतात आणि अत्यंत समर्पित, उच्चविद्याभूषित शिक्षकांसह, जे एकाच वेळेस सहानुभूतीपूर्वक, तसेच मुलांना जीवनात यशस्वी होण्यासाठी झटत असतात, त्यांचासोबत एखाद्या कुटुंबासारखे एकत्रच मोठे होतात, मुलांना अभ्यास करायला लावणे ही काही फार मोठी बाब नाही. दडपण न टाकता, तुम्ही जर त्यांची बुद्धिमत्ता जरा अधिक धारदार केली आणि त्यांच्यात ज्ञानाची ओढ निर्माण केलीत, तर तुम्ही पाहाल, परीक्षेत ते सहजगत्या उत्तीर्ण होतील.- सद्गुरू जग्गी वासुदेव