शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

प्रेरणादायी नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 05:36 IST

आपल्या जीवनात आपण ज्या कोणत्या स्वरूपाचे कार्य निवडले असेल, आपल्याला जर त्या परिस्थितींमध्ये पुढाकार घेण्याची इच्छा असेल, तर सर्वप्रथम ...

आपल्या जीवनात आपण ज्या कोणत्या स्वरूपाचे कार्य निवडले असेल, आपल्याला जर त्या परिस्थितींमध्ये पुढाकार घेण्याची इच्छा असेल, तर सर्वप्रथम आपण केवळ शब्दांद्वारे, फसवणूक किंवा चालाखी करून नाही, तर कृतीतून उदाहरण समोर ठेऊन लोकांचे नेतृत्व करणे आवश्यक आहे. मूलत: लोकांचे नेतृत्व करण्याची तुमची क्षमता म्हणजे आपल्याला पाहिजे असलेल्या दिशेने, एका विशिष्ट ध्येयाकडे जाण्यासाठी लोकांना प्रेरित करणे.

जर असे घडायला हवे असेल, तर त्यांनी स्वत:हून त्या दिशेने जाण्यासाठी तुम्ही त्यांना प्रेरित करता येणे आवश्यक आहे. काम करून घेण्यासाठी तुम्हाला सतत त्यांचा पाठपुरावा करावा लागत असेल, तर नेता बनणे अतिशय अवघड आहे आणि जसा तुमच्या टीमचा आकार वाढत जातो किंवा तुम्ही हाताळत असलेली टीम प्रत्यक्ष संपर्काच्या बाहेर असेल, तर त्यांना प्रेरित करून त्यांचे नेतृत्व करणे अधिक अवघड होईल. आपल्याला लोकांवर सतत लक्ष ठेवून त्यांना हाताळावे लागत असेल, तर तुम्ही त्यांचे नेतृत्व करू शकणार नाही. लोकांचे नेतृत्व तुम्ही तेव्हाच करू शकाल, जेव्हा ते तुम्ही अपेक्षित कार्य करण्यासाठी प्रेरित असतात आणि ते इतके प्रेरित असतात की, तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी ते करून दाखवू शकतील. असे असेल तरच नेतृत्व ही एक श्रमरहित, सहज प्रक्रिया बनते. जर तुम्हाला अपेक्षित अशी कार्य-कृती लोकांनी करण्यासाठी त्यांना प्रेरित करायचं असेल, तर तुमचे अवघे अस्तित्वच अशा प्रकारचे उदाहरण बनले पाहिजे की, स्वाभाविकपणे ते स्वत:हून; जे गरजेचे आहे ते करण्यासाठी सिद्ध असतील, अन्यथा नेतृत्व करणे शक्य नाही. कुठल्याही मनुष्यासाठी, शिक्षणाचा अर्थ आपली क्षितिजे रुंदावणे, आपल्या जीवनाची व्याप्ती विस्तारणे असा आहे. प्रत्येक वेळी आपण आपल्या मर्यादा विस्तारतो, तेव्हा तो एक आनंददायक अनुभव असतो़, पण मग असे का दिसून येते की, परीक्षेचे दडपण असह्य झाल्याने अनेक मुले आत्महत्या करतात? हे केवळ, शिक्षण आज ज्या प्रकारे दिले जाते, त्यामुळेच घडते आहे.

आजची संपूर्ण शिक्षण प्रणाली मानवासाठी अनेक अर्थाने विनाशकारी बनू शकते. याचा अर्थ असा नाही की, आपण हे शिक्षण देणे बंद करावे. ते फक्त मानवी वात्सल्य आणि मानवी स्पर्शाने दिले गेले पाहिजे, केवळ एक माहितीचा ढिगारा प्रस्तुत करणे नव्हे. मुले जे शिकत आहेत, ते सर्वकाही जीवनाशीच निगडित आहे-एकूण एक सर्वकाही जीवनच आहे, पण आजचे शिक्षण अशा पद्धतीने देण्यात येत आहे की, ते बहुतेक जीवनाशी संबंधित नाही. शिक्षण हे जीवनाशी निगडित हवे. ती सत्यशोधक प्रक्रिया असायला हवी, जिथे विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे की, ते काहीतरी नवीन शोधत आहेत. आम्ही ईशा होम स्कूल सुरू केले. त्याला ‘होम स्कूल’ असे म्हटले जाते. कारण ते एका कुटुंबाप्रमाणे चालविले जाते.

वेगवेगळ्या वयोगटांमधील विद्यार्थी एकत्र शिक्षण घेतात, एकत्र अभ्यास करतात आणि अत्यंत समर्पित, उच्चविद्याभूषित शिक्षकांसह, जे एकाच वेळेस सहानुभूतीपूर्वक, तसेच मुलांना जीवनात यशस्वी होण्यासाठी झटत असतात, त्यांचासोबत एखाद्या कुटुंबासारखे एकत्रच मोठे होतात, मुलांना अभ्यास करायला लावणे ही काही फार मोठी बाब नाही. दडपण न टाकता, तुम्ही जर त्यांची बुद्धिमत्ता जरा अधिक धारदार केली आणि त्यांच्यात ज्ञानाची ओढ निर्माण केलीत, तर तुम्ही पाहाल, परीक्षेत ते सहजगत्या उत्तीर्ण होतील.- सद्गुरू जग्गी वासुदेव