शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

प्रेरणादायी नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 05:36 IST

आपल्या जीवनात आपण ज्या कोणत्या स्वरूपाचे कार्य निवडले असेल, आपल्याला जर त्या परिस्थितींमध्ये पुढाकार घेण्याची इच्छा असेल, तर सर्वप्रथम ...

आपल्या जीवनात आपण ज्या कोणत्या स्वरूपाचे कार्य निवडले असेल, आपल्याला जर त्या परिस्थितींमध्ये पुढाकार घेण्याची इच्छा असेल, तर सर्वप्रथम आपण केवळ शब्दांद्वारे, फसवणूक किंवा चालाखी करून नाही, तर कृतीतून उदाहरण समोर ठेऊन लोकांचे नेतृत्व करणे आवश्यक आहे. मूलत: लोकांचे नेतृत्व करण्याची तुमची क्षमता म्हणजे आपल्याला पाहिजे असलेल्या दिशेने, एका विशिष्ट ध्येयाकडे जाण्यासाठी लोकांना प्रेरित करणे.

जर असे घडायला हवे असेल, तर त्यांनी स्वत:हून त्या दिशेने जाण्यासाठी तुम्ही त्यांना प्रेरित करता येणे आवश्यक आहे. काम करून घेण्यासाठी तुम्हाला सतत त्यांचा पाठपुरावा करावा लागत असेल, तर नेता बनणे अतिशय अवघड आहे आणि जसा तुमच्या टीमचा आकार वाढत जातो किंवा तुम्ही हाताळत असलेली टीम प्रत्यक्ष संपर्काच्या बाहेर असेल, तर त्यांना प्रेरित करून त्यांचे नेतृत्व करणे अधिक अवघड होईल. आपल्याला लोकांवर सतत लक्ष ठेवून त्यांना हाताळावे लागत असेल, तर तुम्ही त्यांचे नेतृत्व करू शकणार नाही. लोकांचे नेतृत्व तुम्ही तेव्हाच करू शकाल, जेव्हा ते तुम्ही अपेक्षित कार्य करण्यासाठी प्रेरित असतात आणि ते इतके प्रेरित असतात की, तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी ते करून दाखवू शकतील. असे असेल तरच नेतृत्व ही एक श्रमरहित, सहज प्रक्रिया बनते. जर तुम्हाला अपेक्षित अशी कार्य-कृती लोकांनी करण्यासाठी त्यांना प्रेरित करायचं असेल, तर तुमचे अवघे अस्तित्वच अशा प्रकारचे उदाहरण बनले पाहिजे की, स्वाभाविकपणे ते स्वत:हून; जे गरजेचे आहे ते करण्यासाठी सिद्ध असतील, अन्यथा नेतृत्व करणे शक्य नाही. कुठल्याही मनुष्यासाठी, शिक्षणाचा अर्थ आपली क्षितिजे रुंदावणे, आपल्या जीवनाची व्याप्ती विस्तारणे असा आहे. प्रत्येक वेळी आपण आपल्या मर्यादा विस्तारतो, तेव्हा तो एक आनंददायक अनुभव असतो़, पण मग असे का दिसून येते की, परीक्षेचे दडपण असह्य झाल्याने अनेक मुले आत्महत्या करतात? हे केवळ, शिक्षण आज ज्या प्रकारे दिले जाते, त्यामुळेच घडते आहे.

आजची संपूर्ण शिक्षण प्रणाली मानवासाठी अनेक अर्थाने विनाशकारी बनू शकते. याचा अर्थ असा नाही की, आपण हे शिक्षण देणे बंद करावे. ते फक्त मानवी वात्सल्य आणि मानवी स्पर्शाने दिले गेले पाहिजे, केवळ एक माहितीचा ढिगारा प्रस्तुत करणे नव्हे. मुले जे शिकत आहेत, ते सर्वकाही जीवनाशीच निगडित आहे-एकूण एक सर्वकाही जीवनच आहे, पण आजचे शिक्षण अशा पद्धतीने देण्यात येत आहे की, ते बहुतेक जीवनाशी संबंधित नाही. शिक्षण हे जीवनाशी निगडित हवे. ती सत्यशोधक प्रक्रिया असायला हवी, जिथे विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे की, ते काहीतरी नवीन शोधत आहेत. आम्ही ईशा होम स्कूल सुरू केले. त्याला ‘होम स्कूल’ असे म्हटले जाते. कारण ते एका कुटुंबाप्रमाणे चालविले जाते.

वेगवेगळ्या वयोगटांमधील विद्यार्थी एकत्र शिक्षण घेतात, एकत्र अभ्यास करतात आणि अत्यंत समर्पित, उच्चविद्याभूषित शिक्षकांसह, जे एकाच वेळेस सहानुभूतीपूर्वक, तसेच मुलांना जीवनात यशस्वी होण्यासाठी झटत असतात, त्यांचासोबत एखाद्या कुटुंबासारखे एकत्रच मोठे होतात, मुलांना अभ्यास करायला लावणे ही काही फार मोठी बाब नाही. दडपण न टाकता, तुम्ही जर त्यांची बुद्धिमत्ता जरा अधिक धारदार केली आणि त्यांच्यात ज्ञानाची ओढ निर्माण केलीत, तर तुम्ही पाहाल, परीक्षेत ते सहजगत्या उत्तीर्ण होतील.- सद्गुरू जग्गी वासुदेव