शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

अनुचित नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 5:57 AM

धर्माधिकाऱ्यांनी स्त्रियांची उपेक्षा करून त्यांची निंदा केली. पुरुषप्रधान संस्कृतीने तिला नरकाची खाण म्हटलं. महिलांना धर्माधिकार नाकारला.

- बा. भो. शास्त्रीस्वार्थी माणसाने अनेक जाती निर्माण केल्या. काहींचे अधिकार हिरावून घेतले. स्वनिर्मित कल्पना धर्मग्रंथात पेरल्या आणि धर्मनियम तयार करून माणसांचे तुकडे केले. जगाला आधार देणारा मानवच निराधार केला. देवधर्मापासून त्याला वंचित ठेवला. धर्माधिकाऱ्यांनी स्त्रियांची उपेक्षा करून त्यांची निंदा केली. पुरुषप्रधान संस्कृतीने तिला नरकाची खाण म्हटलं. महिलांना धर्माधिकार नाकारला. तिला मंदिर प्रवेशास बंदी केली. अधिकाराची पात्रता असावी हे खरं आहे. अपात्र राजा, सेनापती, वैद्य, शिक्षक, धर्माचे आचार्य समाज हे देशाला अतिशय घातकच आहेत. पण हा पात्रतेचा अधिकार विशिष्ट वर्गालाच कसा काय असू शकेल, याचा विचार आता समाजाने केला पाहिजे. आजही जर महिलांना सन्मान मिळत नसेल तर तोे देश उन्नत कसा? या संकुचित विचाराने अखंड मानव जात छिन्नभिन्न झाली. त्यात एकलव्यासह अनेकांचा बळी गेला. यातून उच्च-नीचतेचा भाव निर्माण झाला. अनंत काळ भेदाभेद होत राहिला. परमगती सर्व जीवांना मिळत नाही, असा मतलबी विद्वानांनी सिद्धांत मांडला होता. पण पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने या अनुचित रूढींविरोधात पहिलं बंड पुकारलं.मां हि पार्थ व्यपाश्रित्यये पि स्यु: पापयोनय:स्त्रियोवैश्यास्तथा शूद्रास्तेपि यान्ति परां गतिम्पापात्म्यासह स्त्री, वैश्य तसेच शूद्रांनाही मोक्षाधिकार असल्याचं ठणकावून गीतेत सांगितलं आहे. नंतर श्रीचक्रधरांनी लोकांचं निरीक्षण केलं आणि ते म्हणाले, ‘हा अवघा जनु ठकला असे गा: परि मी ठकला ऐसे कव्हनी न म्हणे : कव्हनी एकु ऐसे म्हणेल : मी ठकला : तरी तयाचे ठक फैडिजैल.’ हाच कळवळा संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून व्यक्त केला.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक