शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
3
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
4
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
5
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
6
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
7
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
8
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
9
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

उपासनेला दृढ चालवावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 09:35 IST

सद्गुरूंची उपासना केल्याने प्रपंच आणि परमार्थ हे द्वंद्व नष्ट होऊन सर्वांप्रती समबुद्धी भाव विकसित होतो.

- धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज

सर्व स्थिरचर सृष्टीचा मूळ स्त्रोत हा आत्मा आहे. मानवमात्राचा सर्वांगीण विकास आत्मोपासनेत दडलेला आहे. आत्मकेंद्रित झालेला माणूस नराचा नारायण होतो. आत्मदेवाचा परिचय पूजनीय सद्गुरू करून देतात. सद्गरूंना शरण जाऊन आत्मज्ञान प्राप्त करून आत्मोन्नती साधावी. सद्गुरूंची उपासना केल्याने प्रपंच आणि परमार्थ हे द्वंद्व नष्ट होऊन सर्वांप्रती समबुद्धी भाव विकसित होतो.सर्वश्रेष्ठ उपासनेमुळे मनावर शुद्ध सात्त्विक संस्कार होतो. यामुळे आध्यात्मिक प्रगती, दीर्घायुष्य, आरोग्य व सर्व कामांत यश प्राप्त होऊन संसारात सद्गुरुकृपेचा आनंददायी अनुभव प्राप्त होतो. उपासना ही विद्वत्तेसोबत गेली पाहिजे. जेव्हा त्यासोबत चालता, तेव्हा माणसाचे सर्वत्र रक्षण होते. माणसाने मोठा विद्वान होणे जितके आवश्यक आहे, तितकेच ती विद्वत्ता टिकवून ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. यातूनच समाज मोठा होतो, ज्ञानी होतो. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ असे म्हटले जाते. खरं तर यात पाय धरणे महत्त्वाचे नसते तर तो त्याच्या विद्वत्तेला सलाम असतो. जो विद्वान असतो, त्या विद्वानांनी आपले आचरण चांगले राखले पाहिजे. हे आचरण विद्वत्तेला परिपूर्ण असले पाहिजे.संसारामध्ये असलेल्या लोकांना भक्ती सांगितली आहे, तशी उपासनाही सांगितली आहे. हे करताना सद्गुरूंनी जो मार्ग दाखविला आहे तो सत्यधर्म म्हणून पाळला पाहिजे. या सत्यधर्माचे सोनेरी पात्र सत्याने भरलेले असून ते प्राशन करण्यासाठी सद्गुरू चरण सांगितले आहे. उलटे केलेले सत्याचे जे मुख आहे ते सुलटे करून प्राशन करण्याकरिता हा आमचा मानवी जन्म आहे. सत्य हे उलटे असते हे आपणास फार उशिरा कळते. सत्याचा शोध घेणारा मात्र त्याच्या मागे सातत्याने प्रयत्नशील राहतो आणि त्यालाच सत्याचे दर्शन घडते. सत्य म्हणजे आनंद. या आनंदामध्ये कमतरता येऊच शकत नाही. सत्य आनंदाची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहाणारच नाही; कारण आनंदासाठी मानव भुकेलेला असतो. या आनंदाचे वाटप करण्यासाठी हा मानवी देह आपण धारण केला आहे. शेवटी आनंद कोणाला नको आहे? सर्वांना आनंद प्रिय आहे. किंबहुना माणसाचे जगणे आनंदापासून आहे. जो या नरदेहाच्या अपूर्वतेकडे पाहत गेला त्या सर्वांना पूर्ण सत्य प्राप्त झालेले आहे. माणसातील अपूर्वतेमुळेच महानता या मानवी देहाला प्राप्त होते. सण, उत्सव, देव, धर्म हे आनंदाने जगण्यासाठी आहेत. जर जन्म आनंदात गेला तर मरणही आनंदातच होईल. तुम्ही आम्ही सगळेजण आनंदाचे पुत्र आहोत. अमृत तुम्हा आम्हामध्ये वास करत आहे. त्या अमृताचे आम्ही वारसदार आहोत. ही मालमत्ता आम्हास ऋषीमुनींनी दिलेली आहे. उपासनेशिवाय ती प्राप्त होऊ शकत नाही. ती जपण्याचे काम आम्हास करण्याचे आहे.भगवंत भक्तीसाठी उपासना फार महत्त्वाची मानलेली आहे. भगवंतावरील प्रेम हे अविनाशी असते. भगवंत नामाचे धन कोणी हिरावू शकत नाही. त्यासाठी आपल्या उपासनेत प्रेम, श्रद्धा भक्तिभाव पाहिजे. आपल्या मनातील चंचलता रोखण्यासाठी आत्मज्ञान जीवनात फार आवश्यक आहे. भगवंताच्या उपासनेने मन स्थिर होते. सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवा. ज्या घरात भगवंताची उपासना होते, ते घर मंदिर आहे. भगवंताचा तेथे वास असतो. चारित्र्यसंपन्न, सुशिक्षित, सुसंस्कृत, बलशाली भारत घडविण्यासाठी दिव्य उपासनेचा सर्वांनी स्वीकार करावा.(धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी हे श्री दत्त पद्मनाभ पीठ तपोभूमीचे पीठाधीश्वर आहेत)

 

 

 

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक