शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

उपासनेला दृढ चालवावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 09:35 IST

सद्गुरूंची उपासना केल्याने प्रपंच आणि परमार्थ हे द्वंद्व नष्ट होऊन सर्वांप्रती समबुद्धी भाव विकसित होतो.

- धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज

सर्व स्थिरचर सृष्टीचा मूळ स्त्रोत हा आत्मा आहे. मानवमात्राचा सर्वांगीण विकास आत्मोपासनेत दडलेला आहे. आत्मकेंद्रित झालेला माणूस नराचा नारायण होतो. आत्मदेवाचा परिचय पूजनीय सद्गुरू करून देतात. सद्गरूंना शरण जाऊन आत्मज्ञान प्राप्त करून आत्मोन्नती साधावी. सद्गुरूंची उपासना केल्याने प्रपंच आणि परमार्थ हे द्वंद्व नष्ट होऊन सर्वांप्रती समबुद्धी भाव विकसित होतो.सर्वश्रेष्ठ उपासनेमुळे मनावर शुद्ध सात्त्विक संस्कार होतो. यामुळे आध्यात्मिक प्रगती, दीर्घायुष्य, आरोग्य व सर्व कामांत यश प्राप्त होऊन संसारात सद्गुरुकृपेचा आनंददायी अनुभव प्राप्त होतो. उपासना ही विद्वत्तेसोबत गेली पाहिजे. जेव्हा त्यासोबत चालता, तेव्हा माणसाचे सर्वत्र रक्षण होते. माणसाने मोठा विद्वान होणे जितके आवश्यक आहे, तितकेच ती विद्वत्ता टिकवून ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. यातूनच समाज मोठा होतो, ज्ञानी होतो. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ असे म्हटले जाते. खरं तर यात पाय धरणे महत्त्वाचे नसते तर तो त्याच्या विद्वत्तेला सलाम असतो. जो विद्वान असतो, त्या विद्वानांनी आपले आचरण चांगले राखले पाहिजे. हे आचरण विद्वत्तेला परिपूर्ण असले पाहिजे.संसारामध्ये असलेल्या लोकांना भक्ती सांगितली आहे, तशी उपासनाही सांगितली आहे. हे करताना सद्गुरूंनी जो मार्ग दाखविला आहे तो सत्यधर्म म्हणून पाळला पाहिजे. या सत्यधर्माचे सोनेरी पात्र सत्याने भरलेले असून ते प्राशन करण्यासाठी सद्गुरू चरण सांगितले आहे. उलटे केलेले सत्याचे जे मुख आहे ते सुलटे करून प्राशन करण्याकरिता हा आमचा मानवी जन्म आहे. सत्य हे उलटे असते हे आपणास फार उशिरा कळते. सत्याचा शोध घेणारा मात्र त्याच्या मागे सातत्याने प्रयत्नशील राहतो आणि त्यालाच सत्याचे दर्शन घडते. सत्य म्हणजे आनंद. या आनंदामध्ये कमतरता येऊच शकत नाही. सत्य आनंदाची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहाणारच नाही; कारण आनंदासाठी मानव भुकेलेला असतो. या आनंदाचे वाटप करण्यासाठी हा मानवी देह आपण धारण केला आहे. शेवटी आनंद कोणाला नको आहे? सर्वांना आनंद प्रिय आहे. किंबहुना माणसाचे जगणे आनंदापासून आहे. जो या नरदेहाच्या अपूर्वतेकडे पाहत गेला त्या सर्वांना पूर्ण सत्य प्राप्त झालेले आहे. माणसातील अपूर्वतेमुळेच महानता या मानवी देहाला प्राप्त होते. सण, उत्सव, देव, धर्म हे आनंदाने जगण्यासाठी आहेत. जर जन्म आनंदात गेला तर मरणही आनंदातच होईल. तुम्ही आम्ही सगळेजण आनंदाचे पुत्र आहोत. अमृत तुम्हा आम्हामध्ये वास करत आहे. त्या अमृताचे आम्ही वारसदार आहोत. ही मालमत्ता आम्हास ऋषीमुनींनी दिलेली आहे. उपासनेशिवाय ती प्राप्त होऊ शकत नाही. ती जपण्याचे काम आम्हास करण्याचे आहे.भगवंत भक्तीसाठी उपासना फार महत्त्वाची मानलेली आहे. भगवंतावरील प्रेम हे अविनाशी असते. भगवंत नामाचे धन कोणी हिरावू शकत नाही. त्यासाठी आपल्या उपासनेत प्रेम, श्रद्धा भक्तिभाव पाहिजे. आपल्या मनातील चंचलता रोखण्यासाठी आत्मज्ञान जीवनात फार आवश्यक आहे. भगवंताच्या उपासनेने मन स्थिर होते. सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवा. ज्या घरात भगवंताची उपासना होते, ते घर मंदिर आहे. भगवंताचा तेथे वास असतो. चारित्र्यसंपन्न, सुशिक्षित, सुसंस्कृत, बलशाली भारत घडविण्यासाठी दिव्य उपासनेचा सर्वांनी स्वीकार करावा.(धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी हे श्री दत्त पद्मनाभ पीठ तपोभूमीचे पीठाधीश्वर आहेत)

 

 

 

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक