शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

अरे संसार संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 21:06 IST

मित्राच्या लग्नाच्या पुजेला गेलो होतो. जेवताना प्रल्हाद शिंदेच्या आवाजातील गाणं कानावर आलं, ‘‘बायको तुझी गोरी-गोरी-बसवू नको डोईवरी, नेम नाही रे कधी - हाती देईल तुरी’’॥ व गाणं ऐकून राहूलची आठवण झाली.

-डॉ. दत्ता कोहिनकर

मित्राच्या लग्नाच्या पुजेला गेलो होतो. जेवताना प्रल्हाद शिंदेच्या आवाजातील गाणं कानावर आलं, ‘‘बायको तुझी गोरी-गोरी-बसवू नको डोईवरी, नेम नाही रे कधी - हाती देईल तुरी’’॥ व गाणं ऐकून राहूलची आठवण झाली. राहूल हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. सधन कुटूंब - वडील सरपंच, घराण्याचा रूबाब, प्रतिष्ठा, पुर्वापार घराण्याने जपलेली संस्कृती, माय-लेकांचे एकमेकांवर अतोनात प्रेम. राहूल हा घराण्यातला पहिलाच उच्चशिक्षित अभियंता. राहूलचे लग्न नात्यातील बागायतदाराची मुलगी सुनीताबरोबर ठरले.

सुनीता देखील आकर्षक व्यक्तीमत्व असलेली हुशार, कर्तव्यदक्ष, अभियंता तरूणी. लग्न ठरताच राहूलच्या आईने राहूल आपल्यापासून लग्नानंतर दूर जाऊ नये म्हणून, राहूलला, बायकोला डोक्यावर बसवायचे नाही, तिला आपल्या धाकात व आज्ञेतच ठेवायचे, पुरूषार्थ दाखवायचा, स्त्री ही उपभोगाची दासी असते. अशा अनेक प्रकारचे उपदेश केले होते. इकडे सुनीताच्या आईने देखील सुनीताला पहिल्यापासूनच वेगळं राहण्याचा प्रयत्न कर. नवर्‍याला आपल्या मुठीत ठेवायचे असते. अशा अनेक प्रकारचे उपदेशपर वेळोवेळी डोस पाजले होते. लग्नानंतर राहूल पुरूषार्थ गाजवायचा तर सुनीता त्याला आपल्या मुठीत ठेवायला पाहायची. शेवटी सुनीताला बर्‍याचदा मारही खावा लागायचा. एक दिवस तुफान भांडणानंतर राहूलने सुनीताला शिवीगाळ व मारहाण केली व माहेरी निघून जा अशी धमकी दिली. सुनीता रागाने माहेरी निघून गेली. तिच्या घरच्यांनी राहूल विरोधात पोलिसांत तक्रार केली. या सर्व गोष्टींचा राहूलवर परिणाम होऊन त्याला प्रचंड नैराश्य आले. त्यातून बाहेर पडण्यासाठी मित्रांनी त्याला ध्यान शिबिरासाठी पाठवले होते.

राहूलची सर्व व्यथा ऐकल्यानंतर मी राहुलला म्हणालो," राहूल- पत्नी ही आपली अर्धांगिनी असते." आपल्या घराचा -वंशाचा उद्धार करणारी व आपल्या सर्व गरजा पूर्ण करणारी ती एक आदीशक्ती असते. सासरी येताना ती आपल्या कुटूंबाचा - आडनावाचा - सग्या, सोयर्‍यांचा त्याग करून आपल्या घरात आलेली असते. There is no life without wife.. ‘पत्नीशिवाय जीवन व्यर्थ आहे’’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. ती सर्वांगाने खरी आहे. संसारात संतुष्ट पत्नी म्हणजे साक्षात ऐश्‍वर्यलक्ष्मीला आमंत्रण देणारी गृहलक्ष्मीच असते. ज्या घरात स्त्रीयांचा सन्मान होतो तेथे सगळया शुभशक्ती मदत करत असतात. घराची सर्वच देखभाल ती करते म्हणून गृहमंत्री म्हणून तिला मान दे. सर्वांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणारी ती एक अन्नमंत्री पण असते. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणारी ती एक शिक्षणमंत्री पण असते. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारी आरोग्यमंत्री पण ती असते. तीच सरस्वती, तीच अन्नपूर्णा, तीच जगदंबा अशी पूजनीय स्त्री हा कुटूंबरूपी किल्ल्याचा महत्वाचा बुरूज असतो. तो बुरूज व्यवस्थित व मजबूत असण्यासाठी आपण तिला समान न्याय-हक्क-स्वातंत्र्य-मान-स्पेस दिली पाहिजे. पती व मुलांसाठी ती आपलं सर्वस्व अर्पण करते. एखाद्या दिवशी पती व मुले गावाला गेली तर ती एकटी असताना कधीच स्वतःच्या आवडीचा स्वयंपाक करत नाही, असेल ते खाते. घरात सगळयांची जेवण झाल्यानंतर उरलेले भोजन ती खात असते. शिळेपाळे न फेकता नाश्ता म्हणून खाणे ती आपलेच कर्तव्य समजते. ती प्रेमाची भुकेली असते. तिचे हृदय हे मुके असते, ते बोलत नाही. प्रेममय कलश घेऊन तिच्या अंतःकरणात आपल्या पतीने प्रवेश करावा असे तिला मनोमन वाटत असते. शंकर भगवान जसे हलाहल पिऊन देखील जगाचे कल्याण करतात तसेच स्त्री ही निंदा-अपमान-मार-शिव्याशाप याचे विष मुकाट्याने पीते व पुन्हा घराच्या सेवेसाठी सज्ज होते. त्यामुळे आपल्या पत्नीला न्याय दे व तिच्यावर प्रेमाचा अविष्कार कर.

चर्चेनंतर त्याची चुक त्याला उमगली. राहूल सासरी गेला. पत्नीची अंतःकरणापासून माफी मागितली. दिलगीरी व्यक्त केली. दोघेही ध्यानशिबीराला बसले. शिबीरानंतर त्यांच्या पत्नीचे देखील समुपदेशन केले. तिलाही तिची चुक कळाली आज त्याचा संसार सुखाने चालू आहे. मुलामुलींच्या आईवडीलांनी मात्र यातून योग्य तो बोध घेतल्यास मुलामुलींच्या संसाररूपी वेलीला नक्कीच बहर येईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकmarriageलग्नRelationship Tipsरिलेशनशिप