शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

क्रोध असेल तर तो आत्मज्ञानी नाही, असेच समजावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 7:35 PM

क्रोध हा एक असा विकार आहे की ज्यामुळे माणसाचे समाधान नष्ट होते.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी ( बीड ) 

क्रोध हा एक असा विकार आहे की ज्यामुळे माणसाचे समाधान नष्ट होते. आज बहुतांशी लोकांना या विकाराने ग्रासले आहे. याच क्रोधामुळे जीवनात अनेक अनर्थ घडतात. पण प्रश्न असा पडतो की हा क्रोध का बरं निर्माण होतो. .? शांतीसागर एकनाथ महाराज याचे कारण सांगतात; जेथे कामाचे अपूर्ण काज ! तेथे क्रोधाचे खवळे तेज!काम भोगात व्यत्यय आला की क्रोध उत्पन्न होतो. एका विधवा मातेला चार वर्षाचा मुलगा होता. तिचे एका पुरूषावर प्रेम बसले. तो तिला इतका आवडला की; त्याच्या शिवाय ती राहूच शकत नव्हती. पण तो पुरूष मात्र तिला स्वीकारण्यास तयार नव्हता. कारण तिला असणारा मुलगा त्याला मान्य नव्हता. त्या बाईला काम विकाराने पुरते ग्रासले होते. तिची अतृप्त इच्छा पूर्ण होण्याकरिता तिने मुलाचा गळा दाबला व त्याला ठार केले. जन्मदात्या आईला क्रोध विकाराने राक्षसीण बनवले. सुभाषितकार वर्णन करतात; क्रोधमूलमनर्थानां क्रोध:संसार बंधनम् ! धर्म: क्षयकर: क्रोध: तस्मात् क्रोधं परित्यजेत !!या एकाच विकारामुळे प्रपंचात अनेक अनर्थ निर्माण होतात. संत एकनाथ महाराज म्हणतात; क्रोधा ऐसा महान वैरी! जडला असता निज जिव्हारी! जो ज्ञानाची मानी थोरी ! तो संसारी अतिमूर्ख !!जो स्वत:ला आत्मज्ञानी म्हणवून घेत असेल, आणि त्याच्याजवळ क्रोध असेल तर तो आत्मज्ञानी नाही, असेच समजावे. एखादा स्वत:ला संत म्हणून घेत असेल, आणि त्याला क्रोध येत असेल तर तो संत नाही. हे विकार निर्माण होण्याचे एकच कारण आहे, अज्ञानाने देह म्हणजेच सर्वस्व आहे असे समजणे व देहाच्या सुखाकरिता विषयोपभोगा खेरीज दुसरे साधनच नाही असे समजून विकार वश होणे.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात; देहचि आपणपे मानिती ! विषय ते भोग्य म्हणती! यया पर ते न स्मरती आणकि काही!!म्हणूनच हे घातक विकार निर्माण होतात. त्या करिता देहाचे व देहासाठी लागणाऱ्या विषयांचे क्षणभंगुरत्व कळले पाहिजे. हा क्रोध निर्माण होऊच नये असे वाटत असेल तर एकनाथ महाराज रामबाण उपाय सांगतात;वाचे म्हणता शिवनाम ! तया न बाधी क्रोध काम!!

(लेखक के राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक 8329878467 ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक