शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

जर प्रपंच मिथ्या आहे तर तो आम्हाला सत्य का भासतो..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 1:45 PM

हा प्रपंच मिथ्या आहे. मिथ्या या शब्दाचा अर्थ तुम्ही त्याला जसे समजता तसा तो नाही. आम्हाला तो सत्य भासतो पण तो सत्य नाही.

- हभप भरतबुवा रामदासी (बीड)

संसारसिंधू तरुन जाण्यासाठी विचार तरी कोणता करावयाचा..? विचार आणि भवसिंधू याचा संबंध तरी कोणता..? तर या प्रश्नाचे उत्तर असे की,

अगा जे झालेचि नाही । तयाची वार्ता पुससी कायी ॥

हा प्रपंच मिथ्या आहे. मिथ्या या शब्दाचा अर्थ तुम्ही त्याला जसे समजता तसा तो नाही. आम्हाला तो सत्य भासतो पण तो सत्य नाही. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतात -

प्रपंच एक झाला होता । हेंच समूळचि मिथ्या वार्ता ॥पुढे होईल मागुता । हे कल्पांतीहि घडे ना ॥

जर प्रपंच मिथ्या आहे तर तो आम्हाला सत्य का भासतो..?तर संत म्हणतात -

रज्जू सर्पाकार भासीयेले जगडंबर ।

दोरीच्या ठिकाणी भासणारा साप नाहीसा होण्यासाठी तो साप काठीने मारावा लागतो का..? अहो.! त्याला मारण्यासाठी प्रकाशाची उपस्थिती पुरे..! एकदा का प्रकाश त्याठिकाणी निर्माण झाला की तिथे साप नाहीच हे कळते. त्याप्रमाणे क्षणोक्षणी विचार केला की भवसिंधुतून सहज तरुन जाता येते कारण जन्म आणि मरण हे नाहीच याचे ज्ञान होते.

एका सज्जन माणसाचा भूत, प्रेत, पिशाच्च यावर मुळीच विश्वास नव्हता. त्याचे धैर्य पाहण्याकरिता एका सज्जन माणसाने एकदा त्याच्याबरोबर पैज लावली. अमावास्येच्या दिवशी रात्री बारा वाजता स्मशानभूमीत जाऊन तू जर त्याठिकाणी लाकडाची खुंटी ठोकून आला तर आम्ही तुला खरंच निर्भय समजू..! ठरलं..! हा एकटाच स्मशानभूमीत निघाला पण जाताना पिशाच्चाची कल्पना डोक्यात शिरली, कसातरी स्मशानात पोचला, खुंटी ठोकली व निघतांना त्याचे धोतर त्याच खुंटीला अडकले. तो पळून जाण्याचा प्रयत्न करणार तोच तोंडावर पडला. आपल्याला पिशाच्चाने झडपले या विचाराने तो बेशुद्ध पडला. बराच वेळ झाला तरी हा परत कसा येईना..? म्हणून त्याचा मित्र दिवा घेऊन स्मशानात गेला. त्याला सावध केले व खुंटीला अडकलेले धोतर दाखवले. त्याबरोबर त्याची भीती दूर पळाली. भीती नाहिशी होऊन तो पूर्वस्थितीवर आला. यावरुन विचार हाच बंधनाला कारण आहे हे सिद्ध होते. विचारानेच बंधन व विचारानेच मुक्त होता येते म्हणून तुकाराम महाराज म्हणतात -

केला पाहिजे विचार । मन मित्र दावेदार ॥

खरं तर विचार तरी कोणता करावा..? आपण पुढील लेखात याचे चिंतन करू..?

 

( लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांच्या भ्रमणध्वनी ९४२१३४४९६० ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक