शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
13
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
14
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
15
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
16
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
17
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
18
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
19
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
20
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २८, दिशा चुकली की अवदशा प्राप्त होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 07:00 IST

माणसाला आपण सुखी व्हायचे म्हणजे नेमके काय हेच कळत नाही याचा परिणाम असा झाला की तो सुखी होण्याचा प्रयत्न करतो व होतो दु:खी. बरे केवळ स्वत: दु:खी होत नाहीत तर इतरांनाही दु:खी करतो.

ठळक मुद्देदिशा चुकली की अवदशा प्राप्त होते म्हणून दिशा चुकता कामा नये.सदगुरु काय करतात तर सदगुरु योग्य दिशा देण्याचे काम करतात.सदगुरुंनी दिलेल्या दिशेने आपली इंद्रिये जेव्हा वळतात तेव्हा त्याला एकादशी असे म्हणतात.

- सदगुरू श्री वामनराव पैमाणसाला आपण सुखी व्हायचे म्हणजे नेमके काय हेच कळत नाही याचा परिणाम असा झाला की तो सुखी होण्याचा प्रयत्न करतो व होतो दु:खी. बरे केवळ स्वत: दु:खी होत नाहीत तर इतरांनाही दु:खी करतो. बघा दहशतवादी स्वत: वर तर दु:ख ओढवून घेतातच पण त्यांच्यामुळे किती लोक जखमी होतात, किती जण मृत्यूमुखी पडतात हे सगळं पाहिले तर एक माणूस किती माणसांना दु:ख देवू शकतो हे तुमच्या लक्षात येईल.पुर्वीच्या लढाया तरी ब-या होत्या. त्या घराबाहेर तरी होत असत पण आता तर घराघरातच लढाया होताना दिसतात. आता जर महायुध्द झाले तर आपण जिंकलो म्हणून सांगायलाही कुणी उरणार नाही. हरणाराही मरणार व जिंकणारा मरणार.

माणूस सुखी होण्यासाठी प्रयत्न करतो पण होतो दु:खी कारण त्याच्या प्रयत्नांची दिशाच चुकलेली आहे. दिशा चुकली की अवदशा प्राप्त होते म्हणून दिशा चुकता कामा नये. सदगुरु काय करतात तर सदगुरु योग्य दिशा देण्याचे काम करतात. सदगुरुंचे जे महत्व आहे ते इथे आहे. सदगुरु जी दिशा देतात ती दिशा महत्वाची असते. सदगुरुंनी दिलेल्या दिशेने आपली इंद्रिये जेव्हा वळतात तेव्हा त्याला एकादशी असे म्हणतात. एकादश इंद्रिये जेव्हा एका दिशेने जातात तेव्हा ती खरी एकादशी असते.

तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेले आहे, “घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख,ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण,मना तेथ धाव घेई राही विठोबाचे पायी, तुका म्हणे घे रे जीवा नको सोडू या केशवा” हया अभंगात सर्व इंद्रियांची एकच दिशा आहे व ती दिशा म्हणजे विठ्ठल. तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे त्याप्रमाणे सर्व इंद्रिये एका दिशेने वळली की तीच एकादशी. आणि अशी एकादशी आपल्याला करता आली पाहिजे. आज आपण एकादशी करतो व दुप्पट खातो. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे.. तुला देवाने वाचा दिली आहे ना ती कशासाठी तर विठोबाचे नाम घेण्यासाठी किंवा चांगले बोलण्यासाठी. दोघांपैकी एक केलेस तरी चालेल. जर कोणी म्हणाले आम्ही नास्तिक आहोत आम्ही देवाचे नाम घेणार नाही पण चांगले बोलू तर चालेल तेही उत्तम आहे. शुभ बोल रे ना-या असे आपल्या वाडवडिल म्हणायचे.

शुभ बोलणे हेच भजन, शुभ कर्म करणे हेच पूजन, शुभ चिंतन करणे हेच ध्यान, शुभ इच्छा करणे हीच प्रार्थना हा आमच्या जीवनविद्येचा सिध्दांतच आहे. शेवटी देवाचे भजन, पूजन, ध्यान, प्रार्थना कशासाठी करतो तर देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी. देवाला प्रसन्न कशासाठी करून घेतो तर त्याने आपल्याला सुख देण्यासाठी. तो आपल्याला सुख कधी देणार तर आपण जेव्हा त्याला प्रसन्न करणार तेव्हा.त्यामुळे शुभ बोला.