शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २८, दिशा चुकली की अवदशा प्राप्त होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 07:00 IST

माणसाला आपण सुखी व्हायचे म्हणजे नेमके काय हेच कळत नाही याचा परिणाम असा झाला की तो सुखी होण्याचा प्रयत्न करतो व होतो दु:खी. बरे केवळ स्वत: दु:खी होत नाहीत तर इतरांनाही दु:खी करतो.

ठळक मुद्देदिशा चुकली की अवदशा प्राप्त होते म्हणून दिशा चुकता कामा नये.सदगुरु काय करतात तर सदगुरु योग्य दिशा देण्याचे काम करतात.सदगुरुंनी दिलेल्या दिशेने आपली इंद्रिये जेव्हा वळतात तेव्हा त्याला एकादशी असे म्हणतात.

- सदगुरू श्री वामनराव पैमाणसाला आपण सुखी व्हायचे म्हणजे नेमके काय हेच कळत नाही याचा परिणाम असा झाला की तो सुखी होण्याचा प्रयत्न करतो व होतो दु:खी. बरे केवळ स्वत: दु:खी होत नाहीत तर इतरांनाही दु:खी करतो. बघा दहशतवादी स्वत: वर तर दु:ख ओढवून घेतातच पण त्यांच्यामुळे किती लोक जखमी होतात, किती जण मृत्यूमुखी पडतात हे सगळं पाहिले तर एक माणूस किती माणसांना दु:ख देवू शकतो हे तुमच्या लक्षात येईल.पुर्वीच्या लढाया तरी ब-या होत्या. त्या घराबाहेर तरी होत असत पण आता तर घराघरातच लढाया होताना दिसतात. आता जर महायुध्द झाले तर आपण जिंकलो म्हणून सांगायलाही कुणी उरणार नाही. हरणाराही मरणार व जिंकणारा मरणार.

माणूस सुखी होण्यासाठी प्रयत्न करतो पण होतो दु:खी कारण त्याच्या प्रयत्नांची दिशाच चुकलेली आहे. दिशा चुकली की अवदशा प्राप्त होते म्हणून दिशा चुकता कामा नये. सदगुरु काय करतात तर सदगुरु योग्य दिशा देण्याचे काम करतात. सदगुरुंचे जे महत्व आहे ते इथे आहे. सदगुरु जी दिशा देतात ती दिशा महत्वाची असते. सदगुरुंनी दिलेल्या दिशेने आपली इंद्रिये जेव्हा वळतात तेव्हा त्याला एकादशी असे म्हणतात. एकादश इंद्रिये जेव्हा एका दिशेने जातात तेव्हा ती खरी एकादशी असते.

तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेले आहे, “घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख,ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण,मना तेथ धाव घेई राही विठोबाचे पायी, तुका म्हणे घे रे जीवा नको सोडू या केशवा” हया अभंगात सर्व इंद्रियांची एकच दिशा आहे व ती दिशा म्हणजे विठ्ठल. तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे त्याप्रमाणे सर्व इंद्रिये एका दिशेने वळली की तीच एकादशी. आणि अशी एकादशी आपल्याला करता आली पाहिजे. आज आपण एकादशी करतो व दुप्पट खातो. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे.. तुला देवाने वाचा दिली आहे ना ती कशासाठी तर विठोबाचे नाम घेण्यासाठी किंवा चांगले बोलण्यासाठी. दोघांपैकी एक केलेस तरी चालेल. जर कोणी म्हणाले आम्ही नास्तिक आहोत आम्ही देवाचे नाम घेणार नाही पण चांगले बोलू तर चालेल तेही उत्तम आहे. शुभ बोल रे ना-या असे आपल्या वाडवडिल म्हणायचे.

शुभ बोलणे हेच भजन, शुभ कर्म करणे हेच पूजन, शुभ चिंतन करणे हेच ध्यान, शुभ इच्छा करणे हीच प्रार्थना हा आमच्या जीवनविद्येचा सिध्दांतच आहे. शेवटी देवाचे भजन, पूजन, ध्यान, प्रार्थना कशासाठी करतो तर देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी. देवाला प्रसन्न कशासाठी करून घेतो तर त्याने आपल्याला सुख देण्यासाठी. तो आपल्याला सुख कधी देणार तर आपण जेव्हा त्याला प्रसन्न करणार तेव्हा.त्यामुळे शुभ बोला.