शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
5
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
6
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
7
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
8
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
9
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
10
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
11
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
12
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
13
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
14
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
16
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
17
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
18
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
19
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
20
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २९, मानवी शरीर हे साक्षात परमेश्वर आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 14:46 IST

आपल्याला सुख शांती देणारा हा देव आहे कुठे तर तुकाराम महाराज सांगतात हा देव नाही कुठे.“तुका म्हणे विठो भरला सबाह्यी तया उणे काय चराचरी”. कारण तो सर्वांमध्ये आहे व आपण सतत शुभ बोलून सर्वांना सुखी करणे हेच खरे भजन आहे

ठळक मुद्देदेवाने वाचा दिलेली आहे हे माणसाचे केवढे भाग्य आहेकल्पना करा मुक्या माणसाला केवढे वाईट वाटत असेल इतर माणसांना बोलताना पाहूनपण आपण बोलतो याचा आपल्याला खरा आनंद आहे का? नाही याचे कारण अतिपरिचयात अवज्ञा

- सदगुरू श्री वामनराव पैआपल्याला सुख शांती देणारा हा देव आहे कुठे तर तुकाराम महाराज सांगतात हा देव नाही कुठे.“तुका म्हणे विठो भरला सबाह्यी तया उणे काय चराचरी”. कारण तो सर्वांमध्ये आहे व आपण सतत शुभ बोलून सर्वांना सुखी करणे हेच खरे भजन आहे. याचा अर्थ आपण टाळ घेवून भजन करतो ते भजन वाईट आहे असे नव्हे. टाळ घेवून भजन करणे हा उपासनेचा एक भाग झाला पण तुकाराम महाराज तिथेच थांबत नाहीत तर ते पुढे असे सांगतात की देवाने माणसाला बुध्दी दिली आहे तसेच देवाने माणसाला वाचा देखील दिली हे एक अनोखे वैशिष्टय आहे. कारण देवाने ही वाचा  फक्त माणसालाच दिलेली आहे इतर प्राण्यांना दिलेली नाही. त्यामुळे फक्त माणसालाच बोलता येते इतर प्राण्यांना बोलता येत नाही.

प्राण्यांना शिकविले तर थोडे फार बोलू शकतील. पण देवाने वाचा दिलेली आहे हे माणसाचे केवढे भाग्य आहे. कल्पना करा मुक्या माणसाला केवढे वाईट वाटत असेल इतर माणसांना बोलताना पाहून. पण आपण बोलतो याचा आपल्याला खरा आनंद आहे का? नाही याचे कारण अतिपरिचयात अवज्ञा. बघा नवीन मोटार घेतली की सुरवातीला काय आनंद होतो. पण नंतर आपणच म्हणतो ड्रायव्हिंग करणे म्हणजे काय ताप आहे. आपण बोलतो ही देवाची केवढी मोठी कृपा आहे. माणूस ही देवाची प्रतिकृती आहे असे जे मी म्हणतो त्याचे कारण हेच आहे.

जीवनविद्येचा सिध्दांत आहे मानवी शरीर ही परमेश्वराची प्रतिकृती आहे. मानवी शरीर हे साक्षात परमेश्वर आहे. मानवी शरीराकडे बघा.अगदी केसांपासून ते पायाच्या अंगठयापर्यंत सगळे दिव्य आहे. प्रत्येक अवयव दिव्य आहे.डोळे आपल्याला देवाने दिलेत हे आपलं किती भाग्य आहे. याबाबत आंधळ्याला विचारा तो म्हणेल या जगात भाग्यवान तोच ज्याल्या डोळ्यांनी पहाता येते. मुका काय म्हणेल ज्यांना बोलता येते त्यांच्याइतके भाग्यवान दुसरे कुणीच नाही.बहिरा असेल तो काय म्हणेल ज्यांना ऐकता येते त्यांच्याइतके भाग्यवान कुणीच नाही. लंगडा काय म्हणेल ज्यांना चालता येते त्यांच्याइतके भाग्यवान दुसरे कुणी नाही.

जे थोटे असतील ते काय म्हणतील ज्यांना देवाने दोन हात दिले त्यांच्याइतके भाग्यवान कुणी नाही. त्यामुळे प्रत्येक अवयव हा दिव्य आहे.त्याचे मोल करता येणार नाही इतके ते दिव्य आहेत. एका कवीने फार सुंदर म्हटलेले आहे,“डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखितो मधुरही वाचे आम्ही बोलतो, हातांनी बहुसाळ काम करितो विश्रांती ही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरूनी उठतो ही ईश्वराची द्या” यात फक्त द्या या शब्दाऐवजी कृपा हा शब्द वापरला पाहिजे होता. देवाची म्हणा नाहीतर निसर्गाची कृपा म्हणा. जे देव मानत नाहीत त्यांनी निसर्गाची कॄपा म्हणावी.