शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २९, मानवी शरीर हे साक्षात परमेश्वर आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 14:46 IST

आपल्याला सुख शांती देणारा हा देव आहे कुठे तर तुकाराम महाराज सांगतात हा देव नाही कुठे.“तुका म्हणे विठो भरला सबाह्यी तया उणे काय चराचरी”. कारण तो सर्वांमध्ये आहे व आपण सतत शुभ बोलून सर्वांना सुखी करणे हेच खरे भजन आहे

ठळक मुद्देदेवाने वाचा दिलेली आहे हे माणसाचे केवढे भाग्य आहेकल्पना करा मुक्या माणसाला केवढे वाईट वाटत असेल इतर माणसांना बोलताना पाहूनपण आपण बोलतो याचा आपल्याला खरा आनंद आहे का? नाही याचे कारण अतिपरिचयात अवज्ञा

- सदगुरू श्री वामनराव पैआपल्याला सुख शांती देणारा हा देव आहे कुठे तर तुकाराम महाराज सांगतात हा देव नाही कुठे.“तुका म्हणे विठो भरला सबाह्यी तया उणे काय चराचरी”. कारण तो सर्वांमध्ये आहे व आपण सतत शुभ बोलून सर्वांना सुखी करणे हेच खरे भजन आहे. याचा अर्थ आपण टाळ घेवून भजन करतो ते भजन वाईट आहे असे नव्हे. टाळ घेवून भजन करणे हा उपासनेचा एक भाग झाला पण तुकाराम महाराज तिथेच थांबत नाहीत तर ते पुढे असे सांगतात की देवाने माणसाला बुध्दी दिली आहे तसेच देवाने माणसाला वाचा देखील दिली हे एक अनोखे वैशिष्टय आहे. कारण देवाने ही वाचा  फक्त माणसालाच दिलेली आहे इतर प्राण्यांना दिलेली नाही. त्यामुळे फक्त माणसालाच बोलता येते इतर प्राण्यांना बोलता येत नाही.

प्राण्यांना शिकविले तर थोडे फार बोलू शकतील. पण देवाने वाचा दिलेली आहे हे माणसाचे केवढे भाग्य आहे. कल्पना करा मुक्या माणसाला केवढे वाईट वाटत असेल इतर माणसांना बोलताना पाहून. पण आपण बोलतो याचा आपल्याला खरा आनंद आहे का? नाही याचे कारण अतिपरिचयात अवज्ञा. बघा नवीन मोटार घेतली की सुरवातीला काय आनंद होतो. पण नंतर आपणच म्हणतो ड्रायव्हिंग करणे म्हणजे काय ताप आहे. आपण बोलतो ही देवाची केवढी मोठी कृपा आहे. माणूस ही देवाची प्रतिकृती आहे असे जे मी म्हणतो त्याचे कारण हेच आहे.

जीवनविद्येचा सिध्दांत आहे मानवी शरीर ही परमेश्वराची प्रतिकृती आहे. मानवी शरीर हे साक्षात परमेश्वर आहे. मानवी शरीराकडे बघा.अगदी केसांपासून ते पायाच्या अंगठयापर्यंत सगळे दिव्य आहे. प्रत्येक अवयव दिव्य आहे.डोळे आपल्याला देवाने दिलेत हे आपलं किती भाग्य आहे. याबाबत आंधळ्याला विचारा तो म्हणेल या जगात भाग्यवान तोच ज्याल्या डोळ्यांनी पहाता येते. मुका काय म्हणेल ज्यांना बोलता येते त्यांच्याइतके भाग्यवान दुसरे कुणीच नाही.बहिरा असेल तो काय म्हणेल ज्यांना ऐकता येते त्यांच्याइतके भाग्यवान कुणीच नाही. लंगडा काय म्हणेल ज्यांना चालता येते त्यांच्याइतके भाग्यवान दुसरे कुणी नाही.

जे थोटे असतील ते काय म्हणतील ज्यांना देवाने दोन हात दिले त्यांच्याइतके भाग्यवान कुणी नाही. त्यामुळे प्रत्येक अवयव हा दिव्य आहे.त्याचे मोल करता येणार नाही इतके ते दिव्य आहेत. एका कवीने फार सुंदर म्हटलेले आहे,“डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखितो मधुरही वाचे आम्ही बोलतो, हातांनी बहुसाळ काम करितो विश्रांती ही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरूनी उठतो ही ईश्वराची द्या” यात फक्त द्या या शब्दाऐवजी कृपा हा शब्द वापरला पाहिजे होता. देवाची म्हणा नाहीतर निसर्गाची कृपा म्हणा. जे देव मानत नाहीत त्यांनी निसर्गाची कॄपा म्हणावी.