शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

निराशा घालविणारी भेट झाल्याशिवाय माणूसपण कसं उभारून येईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 04:58 IST

रांगेतल्या मुंग्या एकमेकांना भेटल्याशिवाय पुढे जात नाहीत.

- बा.भो. शास्त्रीरांगेतल्या मुंग्या एकमेकांना भेटल्याशिवाय पुढे जात नाहीत. कुणी कुणाला चावत नाही. त्या काय म्हणत असतील ‘‘बरी आहेस का तू, बरी आहेस का तू’’ असंच म्हणत असतील. कुत्र्यांच्या भेटीचं स्वरूप वेगळं असतं. तिथं भुंकण्याशिवाय काही नाही.‘‘तुमच्या भेटीत देव भेटेआणिक पाडाचे गोमटेनवनीत लाभे अवचटेपरशास्त्राचे’’सूर्याच्या भेटीने सूर्यफूल उमलतं, चंद्राच्या भेटीत सोमकांत द्रवत असतो. दूध-साखर भेटते तेव्हा स्वाद भेटतो. कृष्ण-सुदामाच्या भेटीत मैत्रभाव भेटतो व राम-भरताच्या भेटीत बंधुभाव दिसतो. भेट सजातीय असावी. पाणी पाण्यात मिसळतं. तेल पाण्यात मिसळत नाही. प्रेम प्रेमाशी एकरूप होतं. ही भेट विजातीय असते. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफजलाची भेट ही विळ्या-भोपळ्याचीच भेट ना? आज माणसं वर्तमानपत्र वाचतात. भावना वाचत नाहीत. दूरदर्शन पाहताना शेजारी बसतात, पण बोलत नाहीत. शब्द असून संवाद थांबला आहे. कानाच्या दारावर मोबाइलचा पहारा आहे. विवंचना, धावपळ, टेन्शन, नसलेल्या सुखाच्या अभावात दु:खी असलेला माणूस असलेल्या वस्तूच्या सुखाला वंचित झाला. फुटपाथवरचा भिकारी चांगला झोपतो. पलंगावर चिंता झोपू देत नाही. याचं कारण एखादा संत, सज्जन किंवा विचारवंताची भेट होत नाही हेच तर आहे. सूत्रात पाड शब्द आहे. पाडाला आलेला आंबा रसाळ व मधुर असतो, उमेद वाढविणारी, निराशा घालविणारी अशी भेट झाल्याशिवाय पुसत चाललेलं माणूसपण कसं उभारून येईल?

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक