शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

निराशा घालविणारी भेट झाल्याशिवाय माणूसपण कसं उभारून येईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 04:58 IST

रांगेतल्या मुंग्या एकमेकांना भेटल्याशिवाय पुढे जात नाहीत.

- बा.भो. शास्त्रीरांगेतल्या मुंग्या एकमेकांना भेटल्याशिवाय पुढे जात नाहीत. कुणी कुणाला चावत नाही. त्या काय म्हणत असतील ‘‘बरी आहेस का तू, बरी आहेस का तू’’ असंच म्हणत असतील. कुत्र्यांच्या भेटीचं स्वरूप वेगळं असतं. तिथं भुंकण्याशिवाय काही नाही.‘‘तुमच्या भेटीत देव भेटेआणिक पाडाचे गोमटेनवनीत लाभे अवचटेपरशास्त्राचे’’सूर्याच्या भेटीने सूर्यफूल उमलतं, चंद्राच्या भेटीत सोमकांत द्रवत असतो. दूध-साखर भेटते तेव्हा स्वाद भेटतो. कृष्ण-सुदामाच्या भेटीत मैत्रभाव भेटतो व राम-भरताच्या भेटीत बंधुभाव दिसतो. भेट सजातीय असावी. पाणी पाण्यात मिसळतं. तेल पाण्यात मिसळत नाही. प्रेम प्रेमाशी एकरूप होतं. ही भेट विजातीय असते. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफजलाची भेट ही विळ्या-भोपळ्याचीच भेट ना? आज माणसं वर्तमानपत्र वाचतात. भावना वाचत नाहीत. दूरदर्शन पाहताना शेजारी बसतात, पण बोलत नाहीत. शब्द असून संवाद थांबला आहे. कानाच्या दारावर मोबाइलचा पहारा आहे. विवंचना, धावपळ, टेन्शन, नसलेल्या सुखाच्या अभावात दु:खी असलेला माणूस असलेल्या वस्तूच्या सुखाला वंचित झाला. फुटपाथवरचा भिकारी चांगला झोपतो. पलंगावर चिंता झोपू देत नाही. याचं कारण एखादा संत, सज्जन किंवा विचारवंताची भेट होत नाही हेच तर आहे. सूत्रात पाड शब्द आहे. पाडाला आलेला आंबा रसाळ व मधुर असतो, उमेद वाढविणारी, निराशा घालविणारी अशी भेट झाल्याशिवाय पुसत चाललेलं माणूसपण कसं उभारून येईल?

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक