शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

देवाच्या चरणी लीन होणारा सुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 1:08 PM

सत्य सनातन धर्म हाच या देशाचा पाया आहे.

सोलापूर : सत्य सनातन धर्म हाच या देशाचा पाया आहे. प्रत्येकाने एकमेकांचा आदर करण्याची हिंदू संस्कृती असून, अयोध्येत राममंदिर होण्यासाठी सर्वधर्मीयांनी प्रयत्न केले आहेत, हीच प्रभू रामचंद्राची इच्छा होती, असे श्री देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी प्रवचनात सांगितले. देवाच्या चरणी जीवन अर्पण करणारा प्रत्येकजण सुखी होतो, असेही महाराज म्हणाले.

गुरुवारी उद्धव चरित्र, रुक्मिणी विवाह, रास पंचाध्यायी या विषयावर प्रवचन झालं. यावेळी प्रवचन देताना देवकीनंदन ठाकूर महाराज म्हणाले, देवाच्या चरणी जीवन अर्पण करणारा कायम सुखी असतो. सत्य सनातन धर्म हाच या देशाचा पाया आहे. प्रत्येकाने एकमेकांचा आदर करावा, हा देश हिंदूंचा आहे मात्र इथे इतर धर्मीय देखील गुण्यागोविंदाने राहतात, हेच या धर्माचे वैशिष्ट्य आहे.

देशातील कोणत्याही व्यक्तीने अथवा राजकीय पक्षाने सनातन धर्माची अवहेलना करू नये. ज्या देशात जन्म झाला, त्या देशाच्या संस्कृती-सभ्यतेचा आदर करा, भाईचारा ठेवला तरच सर्वधर्मसमभाव टिकून राहील. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत राम मंदिर उभारण्यास परवानगी दिली आहे. न्यायालयानेही मान्य केले की, अयोध्या हे श्रीरामांचे जन्मस्थळ आहे. मंदिर उभारणे ही प्रभू श्रीरामांचीच मर्जी आहे. त्यामुळे अयोध्येत भव्य राम मंदिराचे निर्माण होणार आहे.

मानवी जीवन ईश्वर प्राप्तीसाठी आहे. त्यामुळे देवासमोर कधीच खोटं बोलू नका. साधू-संत हे देवाचे रूप असतात, त्यांच्यासोबत कपट करू नका, अन्यथा त्याचे कठोर फळ भोगावे लागेल, म्हणून जीवनात कपट ठेवू नका. आपल्या सामर्थ्यानुसार दान करा, समाजसेवा करताना दिखावा करू नका, असंही देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी सांगितले.

श्री भागवत कथेचा गुरुवारी सहावा दिवस होता. नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या हस्ते भगवत गीतेची आरती करून प्रवचनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संतोष गालपल्ली, दिगंबर लगशेट्टी, रमेश झालगे, अविनाश दासरी, मारुती महिंद्रकर, रामकृष्ण सुंचू, संतोष कामून यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक