शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - अतुलनीय संस्कृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 08:11 IST

भारतीय संस्कृती ही अत्यंत समृद्ध आणि बहुरंगी आहे. ती किचकट आणि अस्ताव्यस्त वाटत असली, तरी ती तितकीच खूप सुंदर आहे.

सद्गुरू जग्गी वासुदेव

भारतीय संस्कृती ही अत्यंत समृद्ध आणि बहुरंगी आहे. ती किचकट आणि अस्ताव्यस्त वाटत असली, तरी ती तितकीच खूप सुंदर आहे. आणि ती काही तुम्ही एका रात्रीत उभारू शकणार नाही. अशी वैविध्यपूर्ण संस्कृती निर्माण करायला हजारो वर्षे लागली आहेत. या संस्कृतीत कुठल्याच गोष्टीचे स्वागत करायला आपण कचरलो नाही. सर्व प्रकारचे देव, सर्व प्रकारच्या धारणा, श्रद्धा आणि जगातील एकूणएक तत्त्वज्ञानांचा आपण स्वीकार केला आहे, कारण या संस्कृतीत आध्यात्मिक ज्ञान अतिशय खोलवर आणि परिपूर्णरीत्या अभ्यासले गेले आहे. जगात इतर कोणत्याच ठिकाणी असं घडलं नाही. एक आत्मज्ञानी व्यक्ती कशी निर्माण करायची, हे आपल्याला अवगत आहे.

आपल्याला हे माहीत आहे, की एका व्यक्तीबरोबर जर आपण अमुक एक ठरावीक गोष्ट केली, की ती व्यक्ती त्यानुसार आकार घेईल. जगातील इतर कोणत्याही संस्कृतीने अंतर्ज्ञानाकडे इतक्या खोलवर आणि समजुतीने पाहिलेले नाही, जितके या संस्कृतीने पाहिले आहे. दुर्दैवाने, आज बहुतांश लोक ही संस्कृती अगदी वरकरणी अनुभवतात. परंतु जर तुम्ही या संस्कृतीकडे लक्षपूर्वक पाहिले, तर तुम्हाला समजेल, जीवनाचा प्रत्येक पैलू अतिशय बारकाईने अभ्यासला गेला आहे, आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अनुषंगाने समजून घेऊन निर्माण केला आहे. भारतीय जीवनशैलीत, तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात करत असलेली प्रत्येक सहज, सोपी कार्य-कृती, ही खरंतर तुम्हाला तुमच्या मुक्तीच्या दिशेने घेऊन जाणारी एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. कसे बसावे, कसे उभे राहावे, कसे जेवावे, अभ्यास कसा करावा अशा प्रत्येक कृतीसाठी एक आसन आणि एक मुद्रा आणि एक विशिष्ट प्रकारची मन:स्थिती सुचिवली आहे, जेणेकरून तुम्ही जाणिवेचे उच्च शिखर गाठू शकता. उदाहरणार्थ, संगीत आणि नृत्य हे काही मनोरंजन नाही, या देशात त्या एक आध्यात्मिक प्रक्रिया आहेत. जर तुम्ही भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य पाहिलेत, जर तुम्ही ते योग्य प्रकारे आत्मसात केलेत आणि त्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलेत, तर तुम्ही ऋ षीं-मुनींसारखे बनाल; ती तुमचा आत्मबोध घडवून आणतील. जे संगीतकार आपल्या संगीतात तल्लीन होतात, ते साहजिकच चिंतनशील बनतात, कारण आपल्या संस्कृतीची रचनाच त्या प्रकारे केली गेली आहे. म्हणून, केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी या संस्कृतीची जपणूक करणे, तिचे संवर्धन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. 

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक