शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - अतुलनीय संस्कृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 08:11 IST

भारतीय संस्कृती ही अत्यंत समृद्ध आणि बहुरंगी आहे. ती किचकट आणि अस्ताव्यस्त वाटत असली, तरी ती तितकीच खूप सुंदर आहे.

सद्गुरू जग्गी वासुदेव

भारतीय संस्कृती ही अत्यंत समृद्ध आणि बहुरंगी आहे. ती किचकट आणि अस्ताव्यस्त वाटत असली, तरी ती तितकीच खूप सुंदर आहे. आणि ती काही तुम्ही एका रात्रीत उभारू शकणार नाही. अशी वैविध्यपूर्ण संस्कृती निर्माण करायला हजारो वर्षे लागली आहेत. या संस्कृतीत कुठल्याच गोष्टीचे स्वागत करायला आपण कचरलो नाही. सर्व प्रकारचे देव, सर्व प्रकारच्या धारणा, श्रद्धा आणि जगातील एकूणएक तत्त्वज्ञानांचा आपण स्वीकार केला आहे, कारण या संस्कृतीत आध्यात्मिक ज्ञान अतिशय खोलवर आणि परिपूर्णरीत्या अभ्यासले गेले आहे. जगात इतर कोणत्याच ठिकाणी असं घडलं नाही. एक आत्मज्ञानी व्यक्ती कशी निर्माण करायची, हे आपल्याला अवगत आहे.

आपल्याला हे माहीत आहे, की एका व्यक्तीबरोबर जर आपण अमुक एक ठरावीक गोष्ट केली, की ती व्यक्ती त्यानुसार आकार घेईल. जगातील इतर कोणत्याही संस्कृतीने अंतर्ज्ञानाकडे इतक्या खोलवर आणि समजुतीने पाहिलेले नाही, जितके या संस्कृतीने पाहिले आहे. दुर्दैवाने, आज बहुतांश लोक ही संस्कृती अगदी वरकरणी अनुभवतात. परंतु जर तुम्ही या संस्कृतीकडे लक्षपूर्वक पाहिले, तर तुम्हाला समजेल, जीवनाचा प्रत्येक पैलू अतिशय बारकाईने अभ्यासला गेला आहे, आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अनुषंगाने समजून घेऊन निर्माण केला आहे. भारतीय जीवनशैलीत, तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात करत असलेली प्रत्येक सहज, सोपी कार्य-कृती, ही खरंतर तुम्हाला तुमच्या मुक्तीच्या दिशेने घेऊन जाणारी एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. कसे बसावे, कसे उभे राहावे, कसे जेवावे, अभ्यास कसा करावा अशा प्रत्येक कृतीसाठी एक आसन आणि एक मुद्रा आणि एक विशिष्ट प्रकारची मन:स्थिती सुचिवली आहे, जेणेकरून तुम्ही जाणिवेचे उच्च शिखर गाठू शकता. उदाहरणार्थ, संगीत आणि नृत्य हे काही मनोरंजन नाही, या देशात त्या एक आध्यात्मिक प्रक्रिया आहेत. जर तुम्ही भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य पाहिलेत, जर तुम्ही ते योग्य प्रकारे आत्मसात केलेत आणि त्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलेत, तर तुम्ही ऋ षीं-मुनींसारखे बनाल; ती तुमचा आत्मबोध घडवून आणतील. जे संगीतकार आपल्या संगीतात तल्लीन होतात, ते साहजिकच चिंतनशील बनतात, कारण आपल्या संस्कृतीची रचनाच त्या प्रकारे केली गेली आहे. म्हणून, केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी या संस्कृतीची जपणूक करणे, तिचे संवर्धन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. 

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक