शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - चारित्र्यच अलंकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 03:41 IST

भागवत धर्माचे सोज्वळ कळस म्हणून गौरव होणाऱ्या संतश्रेष्ठ तुकोबांच्या चारित्र्यबलाबद्दल एक सुंदर कथा सांगितली जाते.

प्रा. शिवाजीराव भुकेले

भागवत धर्माचे सोज्वळ कळस म्हणून गौरव होणाऱ्या संतश्रेष्ठ तुकोबांच्या चारित्र्यबलाबद्दल एक सुंदर कथा सांगितली जाते. कथेचा सारांश असा आहे, तुकोबांचा तपोभंग करण्यासाठी बंबाजी गोसावी, सालोमालो इ. मंडळींनी एका नर्तकीला सुपारी दिली. तिने भंडारा डोंगरावर जाऊन असे नृत्य करायचे की, तुकोबा पांडुरंगाचे भजन सोडून त्या नर्तकीच्या भजनी लागले पाहिजेत. नर्तकीने सुपारी स्वीकारली व भररात्री तुकोबांच्या समोर नृत्य करू लागली, नेत्र कटाक्ष टाकू लागली; पण श्रीरंगाच्या रंगात रंगलेल्या तुकोबांनी नर्तकीकडे नेत्र उघडून पाहिलेच नाही. शेवटी बिचारी नर्तकी नाचूनऽऽ घायाळ झाली. सकाळ होताच तुकोबांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा नर्तकी म्हणाली, तुकोबा माझे नृत्य जाऊ द्या; पण सांगा ना मी कशी दिसते? तेव्हा देहू गावचे हे चारित्र्याचे लोक विद्यापीठ उद्गारले -

परावीया नारी रखुमाई समान ।हे गेलें नेमोन ठायींचेंची ॥जाय वों तू माते न करी सायास ।आम्ही विष्णुदास तैसे नव्हों ॥

सदर घटना नक्की कशी व केव्हा घडली या बाबतीत विद्वानांच्या मध्ये कदाचित वादही असतील; पण तुकोबांच्या निष्कलंक चारित्र्यबलाबद्दल मात्र कुठलाच वाद नाही. तुकोबांचे कुटुंब अलंकारांनी सजले नव्हते, तर शुद्ध चारित्र्य हाच त्यांचा खरा अलंकार होता. म्हणूनच तर ते भागवत धर्माचे कळस झाले. जर ज्ञानाची इमारत चारित्र्याच्या पायावर उभी असेल, तर साºया विश्वात मातृ-पितृ व भगिनी भाव निर्माण करता येतो; पण ज्ञानाच्या इमारतीला चारित्र्यभ्रष्टतेचे ग्रहण लागले, तर शेकडो आसाराम निर्माण होतात अन् तुकोबा देवळापुरते मर्यादित होतात. चारित्र्यहीन माणसे कितीही उच्च स्थानावर बसली तरी त्या स्थानालाच ती भ्रष्ट करून रिकामी होतात. कावळा उच्च शिखरावर बसला तरी त्याला गरुडाची सर येत नाही. उलट शिखरालाच तो घाण करून रिकामा होतो. याउलट सत्याची अन् चारित्र्याची काट्या-कुट्यांनी भरलेली वाट तुडविणारे माणसातील गरुड फारच कमी असतात. वस्तुत: त्यांचीच समाजाला खरी गरज आहे. त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. साºया आयुष्याच्या इमारतीला तडा गेला तरी चालेल, पण चारित्र्यास तडा जाता कामा नये, ही भावना सर्वात महत्त्वाची. भोवतालची परिस्थिती पाहिली, की वाटते या चारित्र्यसंपन्नतेसाठी जाणीवपूर्वक साधना करणारे तुकोबा, ज्ञानोबा, शिवबा, विवेकानंद जरी आज नव्याने जन्माला आले नाहीत तरी चालतील; पण चारित्र्याचा लिलाव करून समाजातील सद्भावनेचा दिवाच मालवून टाकणारे समाजकंटक समाजात निर्माण होता कामा नयेत. ती वृत्ती वाढू देता कामा नये. कारण हेच नराधम समाजाचे आणि राष्ट्राचे अध:पतन करण्यास कारणीभूत होतात. म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात असू द्यावी की, आपण ज्या स्थानावर बसलोय ते स्थान किती उच्च आहे, यापेक्षा आपले चारित्र्य किती उच्च आहे., हे खूप गरजेचे आहे. चारित्र्यसंपन्न माणसाकडे एकही अलंकार नसतो; पण त्याचे निर्मल चारित्र्य हाच त्याचा सर्वश्रेष्ठ अलंकार असतो. त्याच आधारावर त्याचे समाजात मूल्यमापन होत असते. समाजातील अशा दीपस्तंभाविषयी तुकोबांनी म्हटलेच होते -

बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाउले ।अंगे झाडीन अंगण । त्याचे दास्यत्व करीन ।त्याचा होर्ईन किंकर । उभा ठाकेन जोडुनी कर ।तुका म्हणे तोची देव । त्याचे चरणी माझा भाव । 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक