शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आनंद तरंग - स्नेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 07:24 IST

श्रीचक्रधरस्वामी मराठीतून उपदेश देत सारगर्भ छोटे छोटे वाक्य ते सांगत त्याला सूत्र असं म्हणतात.

बा.भो. शास्त्री

श्रीचक्रधरस्वामी मराठीतून उपदेश देत सारगर्भ छोटे छोटे वाक्य ते सांगत त्याला सूत्र असं म्हणतात. त्यातलंच हे एक सुंदर सूत्र आहे ‘स्नेहाचा ठाई उचित स्फुरे’. मानवी हृदयात अनेक कप्पे असतात. त्यात एक स्नेहाचा कप्पा आहे तो स्वामींनी उघडला, ज्यातून स्नेह पाझरतं. देहबोलीतून बाहेर येतं. उचित-अनुचितांचे तरंग मनात उठतात व वाचेतून शीतोष्ण शब्द बाहेर पडावे तसं हे स्फुरण. बरं-वाईट घेऊन बाहेर येतं. अनुचित असुरी तर उचित दैवी गुणाचं लक्षण आहे. असुर नाश तर दैवी निर्माण करतं. अजिंठा वेरूळची सुंदर शिल्पं ही दैवी देण व त्याच शिल्पाला भग्न करणं हे असुरपण. आपल्याला साई व्हायचं की कसाई हे स्वत: ठरवावं. यातले आपण कोण? उचित की अनुचित, ज्याचं चिंतन खराब आहे तो वाईट करतो. ज्याचं चिंतन चांगलं आहे तो चांगलं करतो. आपलं भावविश्व जसं आहे तसंच आपण वागतो. मन विटलं, माणसं फाटले, माणूस वर गेला व मानवता खाली आली अशा वेळी जगातलं अनुचित कमी करावं, उचित वाढावं म्हणून स्वामींनी ‘स्नेहाचा ठाई उचित स्फुरे’ असं एक गोड सूत्र सांगितलं आहे. जिथं पाणी तिथं हिरवळ व प्रसन्नता असते. हिरवळीत गती व विकास असतो. हेच जिवंतपणाचं लक्षण आहे. वाळवंटात गरम हवा असते. तिथं सगळं मृत असतं. स्नेह ओलं आहे. तिथं बाग आहे. तीळगूळ घ्या गोडगोड बोला, का गुळात गोडवा तर तीळात तेल आहे. स्नेहविना गोडवा फसवा आहे. स्नेहाची ओळख करून देताना स्वामी म्हणाले, ‘मातेचं स्नेह ते नैसर्गिक’ इथे आईचा दाखला दिला. मैत्रीला समानगुण हवेत. लग्नाला वय हवं. सगळं हेतूशी बांधलेलं आहे. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक