शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - स्नेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 07:24 IST

श्रीचक्रधरस्वामी मराठीतून उपदेश देत सारगर्भ छोटे छोटे वाक्य ते सांगत त्याला सूत्र असं म्हणतात.

बा.भो. शास्त्री

श्रीचक्रधरस्वामी मराठीतून उपदेश देत सारगर्भ छोटे छोटे वाक्य ते सांगत त्याला सूत्र असं म्हणतात. त्यातलंच हे एक सुंदर सूत्र आहे ‘स्नेहाचा ठाई उचित स्फुरे’. मानवी हृदयात अनेक कप्पे असतात. त्यात एक स्नेहाचा कप्पा आहे तो स्वामींनी उघडला, ज्यातून स्नेह पाझरतं. देहबोलीतून बाहेर येतं. उचित-अनुचितांचे तरंग मनात उठतात व वाचेतून शीतोष्ण शब्द बाहेर पडावे तसं हे स्फुरण. बरं-वाईट घेऊन बाहेर येतं. अनुचित असुरी तर उचित दैवी गुणाचं लक्षण आहे. असुर नाश तर दैवी निर्माण करतं. अजिंठा वेरूळची सुंदर शिल्पं ही दैवी देण व त्याच शिल्पाला भग्न करणं हे असुरपण. आपल्याला साई व्हायचं की कसाई हे स्वत: ठरवावं. यातले आपण कोण? उचित की अनुचित, ज्याचं चिंतन खराब आहे तो वाईट करतो. ज्याचं चिंतन चांगलं आहे तो चांगलं करतो. आपलं भावविश्व जसं आहे तसंच आपण वागतो. मन विटलं, माणसं फाटले, माणूस वर गेला व मानवता खाली आली अशा वेळी जगातलं अनुचित कमी करावं, उचित वाढावं म्हणून स्वामींनी ‘स्नेहाचा ठाई उचित स्फुरे’ असं एक गोड सूत्र सांगितलं आहे. जिथं पाणी तिथं हिरवळ व प्रसन्नता असते. हिरवळीत गती व विकास असतो. हेच जिवंतपणाचं लक्षण आहे. वाळवंटात गरम हवा असते. तिथं सगळं मृत असतं. स्नेह ओलं आहे. तिथं बाग आहे. तीळगूळ घ्या गोडगोड बोला, का गुळात गोडवा तर तीळात तेल आहे. स्नेहविना गोडवा फसवा आहे. स्नेहाची ओळख करून देताना स्वामी म्हणाले, ‘मातेचं स्नेह ते नैसर्गिक’ इथे आईचा दाखला दिला. मैत्रीला समानगुण हवेत. लग्नाला वय हवं. सगळं हेतूशी बांधलेलं आहे. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक