शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

Guru Purnima 2018 : काय आहे गुरूपौर्णिमेचे महत्त्व?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 11:10 IST

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हटले जाते. तसचं या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. खरं तर ज्या व्यास ऋषींनी महाभारत, वेद आणि पुराणांसारखे ग्रंथ आणि महाकाव्य लिहिली अशा व्यासमुनींना वंदन करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हटले जाते. तसचं या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. खरं तर ज्या व्यास ऋषींनी महाभारत, वेद आणि पुराणांसारखे ग्रंथ आणि महाकाव्य लिहिली अशा व्यासमुनींना वंदन करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. गुरू व्यासमुनींची जागा कोणीही घेऊ शकत नाही अशी प्रत्येकाची श्रद्धा असते. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रातही सांगितले आहे. व्यास ऋषींना भारतीय संस्कृतीचे शिल्पकार मानले जाते. त्यांनी लिहिलेल्या महाभारतासारख्या महाकाव्यातून आपल्यासमोर धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, युद्धशास्त्र आणि मानसशास्त्र यांसारख्या गोष्टी अगदी सहजपणे मांडल्या. सर्वज्ञानी माणसांचा राजा म्हणून व्यास ऋषींना संबोधले जाते. संत ज्ञानेश्वरांनीही ज्ञानेश्वरीमध्ये 'व्यासांचा मागोवा घेतू' असं म्हणूनच सुरुवात केली आहे. 

संपूर्ण भारतात हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असत. त्यावेळी ते श्रद्धेने आपल्या गुरूंची पूजा करून त्यांना गुरूदक्षिणा देत असत. आपल्या देशात पूर्वपार गुरू-शिष्य परंपरा चालत आली आहे. या दिवशी आपण ज्या गुरूंकडून विद्या प्राप्त करतो. आणि त्या विद्येच्या बळावर स्वतःच्या पायावर उभं राहतो. त्या गुरूंबाबत कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य असतं. त्यासाठीच या दिवशी आपल्या गुरूंचा सन्मान करणं गरजेचं असतं. 

आपल्या भारतीय परंपरांमध्येही अनेक गुरू शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये द्रोणाचार्य आणि अर्जुन यांच्यासोबतच एकलव्याची द्रोणाचार्यांप्रति असलेली निष्ठाही आपण जाणतोच. याव्यतिरिक्त दानशूर असलेल्या कर्णाला घडवलेले परशुराम, विश्वामित्र यांनी राम आणि लक्ष्मण यांना दिलेल्या शिकवणीच्या गोष्टीही आपण वेळोवेळी ऐकतोच. संत ज्ञानेश्वरांनी तर आपला मोठा भाऊ संत निवृत्तीनाथांनाच गुरू मानले होते. तर नामदेवांनी साक्षात विठ्ठ्लालाच गुरू स्थानी बसवले होते. अशा अनेक जोड्या आपल्याला आजही पहायला मिळतात. 

आपल्या आयुष्यात आपणही प्रत्येक गोष्ट कोणाकडून तरी शिकत असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला मदत करणारी, आपल्याला योग्य तो मार्ग दाखवणारी व्यक्ती आपल्याला गुरूंच्या स्थानीच असते. त्यामुळे गुरूबद्दलच्या भावना व्यक्त करताना किंवा त्यांची महती सांगताना आपल्या तोंडून लगेच श्र्लोक बाहेर पडतो...

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ।गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ।।

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाAdhyatmikआध्यात्मिक