शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

...म्हणून मुळात प्रत्येकाने प्रथम स्वत:चे परिवर्तन घडवून आणणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 05:04 IST

भारतात कोणत्याही प्रकारचे शिक्षण सुरू करण्यापूर्वी ब्रह्मसूत्र देण्याची प्रथा होती.

- सद्गुरू जग्गी वासुदेवभारतात कोणत्याही प्रकारचे शिक्षण सुरू करण्यापूर्वी ब्रह्मसूत्र देण्याची प्रथा होती. म्हणजे आध्यात्मिक पाऊल हे नेहमी पहिले पाऊल असे, त्यानंतरच मग व्यक्तीचे इतर प्रकारच्या शिक्षणाने सशक्तीकरण होत असे. जीवनात अध्यात्म हे पहिले पाऊल आहे, हे जो जाणत नाही अशा व्यक्तीला थोडे जरी सशक्त केले तरी तो धोकादायक ठरतो.आजकाल जगात हेच घडतेय. आज शिक्षणामुळे म्हणा किंवा राजकीय आणि आर्थिक सामर्थ्यामुळे; ममताशून्य आणि आनंदहीन लोकांच्या हाती पुष्कळ अधिकारिक सत्ता आली आहे. आज वाईट लोक नव्हे, तर चांगले, सुशिक्षित लोक जगाला विनाशाच्या खाईत लोटत आहेत. जगात माजलेला संघर्ष हा वाईट विरुद्ध चांगले असा नाहीये. तो नेहमी दोन चांगल्या व्यक्तींमध्ये आहे. जगात ज्याला दहशतवादी म्हणतात, त्याला वाटते की तो खूप चांगला माणूस आहे. जेवढे अधिक आपण चांगले आहोत असे त्याला वाटते तेवढा तो आपल्यासाठी विनाशकारी ठरतो. वाईट माणसे लढायच्या भानगडीत पडत नाहीत. फक्त चांगली माणसेच संपूर्ण संस्कृती नामशेष करतील आणि एकमेकांचा समूळ नायनाट करतील यात शंका नाही. म्हणून मुळात प्रत्येकाने प्रथम स्वत:चे परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. तर प्रत्येक व्यक्तीची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी म्हणजे त्याने आपले आंतरिक स्थैर्य प्रस्थापित करणे व एक आनंदी व्यक्ती बनणे. ज्या माणसाला स्वत:चे शरीर, मन आणि भावना नीट हाताळता येत नाहीत; पण त्याला जग हाताळायचे आहे, हे कदापि शक्य नाही. जर तुम्हाला स्वत:ला कसे सांभाळायचे हे माहीत नसेल, तर जग कसे सांभाळावे हे तुम्हाला कळणारच नाही. म्हणून स्वत:मध्ये स्थैर्य प्रस्थापित करणे, आपला आंतरिक समन्वय आणि सुसूत्रता साधणे आणि आतून एक आनंदी व्यक्ती होऊन बहरणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आणि जबाबदारी आहे. माणूस एकदा जर आनंदी झाला की साहजिकच तो जगात केवळ आनंदच उधळणार.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक