शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भावभक्तीच्या वाटेनेच होईल देवाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 20:20 IST

भावाचा अभाव असेल तर भगवंताचा प्रभाव प्रत्ययाला येणार नाही

 - ह.भ.प. भरतबुवा रामदासीअध्यात्म हे श्रद्धेचे शास्त्र आहे. ज्या साधकाच्या अंत:करणात भाव, निष्ठा, विश्वास, परमश्रद्धा असेल त्या साधकालाच परमेश्वराचे सगुण दर्शन होईल. भावाचा अभाव असेल तर भगवंताचा प्रभाव प्रत्ययाला येणार नाही. भावातच ईश्वराचे अस्तित्व दडलेले आहे. भक्तीशास्त्रात भावाला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपण म्हणाल भाव म्हणजे तरी काय..? तर भक्तीरसायन सिंधुकार भावाची व्याख्या करतांना म्हणतात-प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधै: ॥प्रेम ही भावाची पहिली अवस्था आहे. अंत:करणात शुद्ध सत्वगुण असणे हे भावाचे लक्षण आहे. देवाच्या प्राप्तीसाठी तीव्र अभिलाषेने चित्तात निर्माण झालेली जी आर्द्रता, जो स्नेह, जे प्रेम त्या परमप्रेमासच भाव असे म्हणतात.भगवंताबद्दल परमप्रेम असणे म्हणजेच भक्ती. देवर्षी नारद महाराज म्हणतात -सा तु अस्मिन् परम प्रेम रूपा ।भक्तीसाधनेत परमप्रेम असल्याशिवाय भगवंत सगुण दर्शनाचा विषय होऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले -भक्ती एक जाणे । तेथे साने थोर न म्हणे ॥ आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥बहुतांशी लोकांना असे वाटते की, देव दिसत का नाही..? तो दिसत नाही याचाच अर्थ तो या जगात नसावा मग जो इंद्रिय गोचर नाही, बुद्धी गम्य नाही. जो तर्काच्या ताजव्यात तोलता येत नाही, त्याला मानावयाचे काही कारण नाही पण हा पाखंडी विचार करण्याचे काही कारण नाही. अध्यात्मशास्त्र हे श्रद्धेचे शास्त्र आहे. स्वामी विवेकानंदांनी भगवान रामकृष्णांना विचारले,  भगवान या जगात देव आहे का..? असलाच तर तो दिसत का नाही..? भगवान म्हणाले - नरेंद्रा..! आग पेटितल्या प्रत्येक काडीत अग्नी असतोच पण तो दिसतो का..? प्रत्येक बीजात वृक्ष असतो पण तो दिसतो का..? दुधात तूप असतेच पण ते दिसते का..? नरेंद्रा... दुधातले तूप दिसण्याकरिता काही क्रिया प्रक्रिया कराव्या लागतील, नंतरच ते दिसेल.तुकाराम महाराज म्हणतात -दुधी असता नवनीत नेणे तयाचे मथित ।भावभक्तीच्या फुलांनी अंत:करणाची परडी भरली की सगळ्या आयुष्यालाच भक्तीचा सुगंध प्राप्त होतो. भावाची वाट वहिवाटली तर देहबुद्धी तुटेल, भवसिंधु आटेल, विवेक जागेल, पाखंड भंगेल, भास निरसेल, सद्वस्तु भासेल आणि भगवंत प्रगटेल अशा भावभक्तीच्या वाटेनेच देवाचे दर्शन होईल.

(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, 9421344960)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक