शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
4
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
5
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
6
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
7
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
8
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
9
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
10
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
11
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
12
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
13
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
14
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
15
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
16
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
17
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
18
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
19
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
Daily Top 2Weekly Top 5

देव... भक्तिमार्ग अन् शाश्वत सुख...

By appasaheb.patil | Updated: February 13, 2020 12:05 IST

आध्यात्मिक...

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुख हरवून बसल्याची जवळपास सगळ्यांचीच भावना आहे. अगदी श्रीमंतातला श्रीमंत असो वा गरिबातला गरीब सगळ्यांचीच अवस्था सारखीच आहे़ आपल्या आयुष्याची सुरुवात शाळेपासून होते. शाळेत असताना आपल्याला असं वाटतं की, महाविद्यालयात गेल्यानंतर आपल्याला जास्त आनंद मिळेल. पण महाविद्यालयात गेल्यानंतर जाणवतं की, शाळेतच खूप मजा होती. महाविद्यालयानंतर ग्रॅज्युएशन, नोकरी, लग्न, मुले अन् परिवार यामध्ये आयुष्याचा निम्मा काळ व्यतीत होतो़ म्हणजे वयाच्या पन्नाशी-साठीला आल्यावरही आपल्याला शाश्वत सुख कशामध्ये आहे, हे उमगत नाही. म्हणजे आपल्याला असा अनुभव येतो की, आयुष्यात काही केल्या शाश्वत सुख मिळत नाही. 

तुम्ही काहीही करा ते सुख काही काळापुरतेच राहते़ त्यानंतर आपल्याला ते सोडून दुसºया गोष्टींचा ध्यास लागतो़ पुन्हा पुन्हा तेच घडतं़ पण शाश्वत सुखाची हमी कशातूनच मिळत नाही़ म्हणजे बालपणी वेगळ्या अडचणी, तरुणपणी वेगळ्या अडचणी, प्रापंचिक आयुष्यात वेगळ्या अडचणी, म्हातारकाळात वेगळ्या अडचणी यात आपण वैतागून जातो़ पण आपण गांभीर्याने शाश्वत सुख कशात आहे याचा कधी विचारच करत नाही़ या संपूर्ण प्रवासात आपल्याला वेळच मिळत नाही़ कुणी सांगतपण नाही़ एकंदरीत खूप अवघड परिस्थिती आहे़ पण असे शाश्वत सुख खरंच असते का? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहतो   आणि जर असते तर ते कशातून  मिळते त्यासाठी काय करावं लागतं? अशाप्रकारचे प्रश्न आपल्या मनात येतात़ शाश्वत सुखाचा मार्ग तो कोणता? यावर एकच रामबाण उपाय म्हणजे ‘भक्तिमार्ग’, जो आपल्या संतांनी दाखवलेला आहे़ आपल्या संतांनी त्याचे संपूर्ण आयुष्य भक्तिमार्गावरच व्यतीत केलं आणि आपल्याला पण त्यांनी भक्तिमार्गावर जाण्याचा उपदेश केला.

भक्तिमार्ग म्हणजे नक्की काय? कशासाठी ? आणि या मार्गामध्ये असं काय आहे की सगळेच संत आपल्याला भक्तिमार्गावर जायला सांगतात़ याचा शांतपणे विचार केला पाहिजे़ याचं कारण असे आहे की, या मार्गावरच शाश्वत सुख मिळेल, अशी संतांना खात्री आहे़ खात्री यामुळे आहे कारण त्यांनी तसा अनुभव घेतलेला आहे़ आता काहींना वाटेल भक्तिमार्ग म्हणजे आपली दैनंदिन कामे सोडून संन्यास घेऊन टाकणे, असा काही गैरसमज करून घेऊ नका़ आपले काम, संसार सगळ्याच जबाबदाºया पार पाडत फक्त देवाचे नाव अखंडपणे घेणे हाच खरा भक्तिमार्ग़ नावाने सुरुवातीला तुमचे मन शांत होईल़ हळूहळू आनंदाचा, प्रेमाचा झरा तुमच्या मनात वाहू लागेल आणि हळूहळू तो झरा शाश्वतपणे वाहू लागेल.

 जर का असे झाले तर आपल्याला कोणाकडूनच आनंदाची, सुखाची अपेक्षा उरत नाही़ आपणच जर आनंदाने ओलेचिंब झाले तर आपण दुसºयांना देखील आनंदच देऊ आणि आपण वाईट मार्गापासून आपोआपच लांब जाऊ़ कारण वाईट मार्गावरचा असुरी आनंद फार काळ टिकत नाही आणि तुम्हाला त्याचा नंतर खूप त्रास होतो़ जेव्हा तुम्हाला भक्तिमार्गावर वाईट मार्गापेक्षा लाख पटीने जास्त आनंद मिळाला तर वाईट मार्गावर जाण्याचा प्रश्नच येत नाही़ भक्तिमार्गावर जात असताना तुम्हाला प्रापंचिक अडचणी येणारच आहेत़ त्यातून कोणाची सुटका नाही, म्हणजे आपण देवाची भक्ती केली, मग आपल्याला कोणत्याच अडचणी येणार नाहीत, हा एक गैरसमज आहे़ अडचणी येतीलच, पण त्यात आपल्याला देवाकडून खूप बळ मिळेल़ किती पण अडीअडचणी आल्या तरी तुम्ही खंबीर राहू शकाल़ त्यामुळे देवाचे नाव सतत घ्यावे, कोणत्याही देवाचं नाव घेतलं तरी चालतं़ कारण देव एकच आहे फक्त त्याची नावं वेगवेगळी आहेत़ जसं आपण मराठीत पाण्याला पाणी म्हणतो, इंग्रजीत त्याला वॉटर म्हणतात, पण पाणी एकच आहे़ जसं आपण माणूस एकच आहोत, पण आपल्याला दादा, पप्पा, ताई, सासरे बुवा, पिंटू, कृष्णा अशी भरपूर नावे आहेत़ त्यामुळे कोणत्याही देवाची भक्ती करा, पण अगदी मनाच्या देठापासूऩ - आशिष जाधव(लेखक हे आध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार आहेत) 

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक