शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - निष्काम कर्मयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 06:21 IST

वामनराव देशपांडे ज्ञानाइतके पवित्र या विश्वात प्राप्त करण्यासारखे आणखी दुसरे काहीही नाही हे सत्य प्रतिपादन करताना भगवंतांनी एक अत्यंत ...

वामनराव देशपांडे

ज्ञानाइतके पवित्र या विश्वात प्राप्त करण्यासारखे आणखी दुसरे काहीही नाही हे सत्य प्रतिपादन करताना भगवंतांनी एक अत्यंत महत्त्वाचा तत्त्वविचार अधोरेखित केला की या ज्ञानप्राप्तीसाठी कोणा श्रेष्ठ तत्त्वज्ञानी पुरुषोत्तमाच्या ज्ञानसहवासात राहण्याची आवश्यकता नाही. कारण हे भगवंतांना अभिप्रेत असलेले ज्ञान, निष्काम कर्मयोगाद्वारे प्राप्त करून घेणे, कुणाही साधक भक्ताला सहज शक्य आहे. ‘मी’पण एकदा का गळून पडले की, करीत असलेल्या कर्माचे कर्तेपण संपुष्टात येते. आपण कर्म करीत नसून भगवंतच आपल्याला प्रेरणा देऊन हे कर्म आपल्याकडून करवून घेत आहे हा सद्भाव एकदा का शुद्धाचरणी अंत:करणात सतत स्फुरण पावत राहिला की मर्त्य मानवी जीवनातले कर्तेपण आणि फलाशा अक्षरश: भस्मिभूत होऊन जाते. तोच तर शुद्ध ज्ञानाचा अपूर्व दिव्य क्षण असतो.

या निष्काम कर्मयोगाचे तत्त्व एकदा का चित्तात स्थित झाले की, कर्तृत्वाचा अभिमान पूर्णपणे नष्ट होतो. तेव्हाच कर्म करूनही साधक भक्त अकर्माचा आनंद उपभोगू शकतो. म्हणजे काय तर, सर्व कर्ते अकर्म होतात. फलप्र्राप्तीची इच्छाच निर्माण होत नाही. सत्य काय तर निष्काम कर्मयोगी साधक कर्मफलाशी संबंधित राहत नाही. त्यामुळे सुख-दु:खे त्याला स्पर्शच करीत नाहीत. भगवंतांनी अशा साधक भक्तांना उद्देशून ‘योगसंसिद्ध:’ असे म्हटले आहे. म्हणजे काय तर ‘ज्याचा हा निष्काम कर्मयोग’ उत्तम प्रकारे जन्मक्षणीच सिद्ध झाला आहे असा श्रेष्ठ सिद्ध पुरुष, कर्म करूनही कर्मापासून अलिप्तच राहतो. सहसा प्रत्येक मानवी जीव करीत असलेल्या प्रपंचात देहबुद्धीने अडकतो. त्यामुळे असा दुर्दैवी जीव प्रापंचिक वृत्तीने सभोवताल अनुभवत राहतो आणि मानवी सुखदु:खाच्या वेगवान चक्रावर फिरत राहतो. परंतु ज्या भाग्यवान जीवाला तत्त्वज्ञानाची सोबत मिळते, तेव्हा त्याच्या पवित्र श्रद्धेय जीवनाला खरी सुरुवात होते. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक