शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

Ganesh Chaturthi 2020 : बाप्पाचा चेहरा झाकावा का?.... शास्त्र काय सांगतं...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 12:54 PM

गणपती बाप्पांची मूर्ती जेव्हा घरी आणली जाते, तेव्हा मूर्तीचा चेहरा कापडाने झाकलेला असतो. अनेकांना गणपती बाप्पांना घरी कसे आणायचे? त्यांचा चेहरा का झाकायचा?

कोरोना व्हायरसमुळे अजूनही सगळं काही विस्कळीतच आहे. अशातही आपापल्या घरी गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. गणेशोत्सबाबत अनेक रितीरिवाज आहेत. पण हे कसे सुरू झाले किंवा त्यांची मान्यता काय आहे याबाबत फारसं कुणाला माहीत नसतं. आपण नेहमीच बघत असतो की, गणपती बाप्पांची मूर्ती जेव्हा घरी आणली जाते, तेव्हा मूर्तीचा चेहरा कापडाने झाकलेला असतो. अनेकांना गणपती बाप्पांना घरी कसे आणायचे? त्यांचा चेहरा का झाकायचा? गणपती बाप्पांना देखील दृष्ट लागते का? असे प्रश्न पडतात. पण यामागचं कारण काय आहे? चला जाणून घेऊ या प्रथेबाबत...

चेहरा झाकणं गरजेचं आहे का?

पुणे शहरातील वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी सांगितले की, गणेशाची मूर्ती दुकानातून घेतल्यावर ती जागा मोकळी न ठेवता तिथे पैसे आणि सुपारी ठेवण्याची पद्धत आहे. घरी आणताना मूर्तीचे तोंड आपल्याकडे करावे आणि विसर्जन करताना रस्त्याकडे तोंड करावे. मूर्ती आणताना ती कोणाच्या दृष्टीस पडू नये, असा मूर्ती झाकून आणण्यामागील भाव असतो. घराच्या दारात औक्षण करताना मूर्तीवरून कापड काढले जाते. मातीची मूर्ती असेल तर ती जपली जावी किंवा मूर्तीला कोणाची दृष्ट लागू नये, अशी मूर्ती झाकण्यामागील भावना असते. त्यामागे कोणतेही शास्त्र नाही, पण ती काळजी घेण्याची पद्धत आहे. गणेशाची प्राणप्रतिष्ठा सूर्योदयापासून दुपारी १ पर्यंत या कालावधीत अर्थात देवकाळात कधीही करता येऊ शकते. त्यासाठी विशिष्ट मुहूर्त पाहण्याची गरज नाही.

का झाकतात चेहरा?

असा समज आहे की, मूर्ती खूप सुंदर असेल तर लोक वाईट भावनेने तिच्याकडे बघू शकतात. मानवी भावनांचा परिणाम जड वस्तूंवरही होतच असतो. मूर्तीवर असला कोणताही वाईट परिणाम होऊ नये, हा त्यामागचा उद्देश असतो.

मूर्ती घरी आणताना काय करतात?

गणरायाची मूर्ती दुकानातून आणतांना डोक्यावर टोपी घालून जावे. तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. डोक्यावर काहीही न घालता पाहुण्याचे स्वागत करणे हा प्रकार आपल्या संस्कृतीला मान्य नाही. डोक्यावर काहीतरी घालून पाहुण्याचे स्वागत करणे हा त्या पाहुण्याचा सन्मान करण्याचा एक भाग आहे.

कधी आहे मुहूर्त?

भाद्रपद शुक्ल चतुर्थी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.५७ पर्यंत आहे. त्यामुळे याच दिवशी गणेश स्थापना करावयाची आहे. गणेश स्थापना मध्यान्हकाली करण्याची परंपरा आहे. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.२५ पासून दुपारी १.५६ पर्यंत मध्यान्हकाली श्रीगणेशमूर्तीची स्थापना करावी, असे पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले. ज्यांना या वेळेत गणेश स्थापना करता येणार नाही त्यांनी त्या दिवशी पहाटे पाचपासून दुपारी तीन वाजेपर्यंत गणेश स्थापना केली तरी चालेल. गणेशपूजनासाठी जेवढे साहित्य उपलब्ध होईल तेवढे वापरावे. जे नसेल त्या जागी अक्षता अर्पण कराव्या.

हे पण वाचा : 

Ganesh Chaturthi: गणपती स्थापनेसाठी सर्वोत्तम वेळ कोणती?... जाणून घ्या

Ganesh Chaturthi : गणपतीला २१ दुर्वांची जुडी का वाहतात?... अंक'शास्त्रा'मागे आहे अनलासुराच्या वधाची आख्यायिका

Hartalika Puja Vrat : ‘लव्ह मॅरेज’च्या जमान्यात हरतालिका व्रत कशासाठी?... समजून घ्या महती!

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी