शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

विचारांचा उपवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 02:02 IST

खरेच असे उपवास करून आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात का?

- नीता ब्रह्मकुमारी

मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. आधुनिक युगात प्रगती करणारा मानव अनेकानेक सुख-सुविधांनी स्वत:ला संपन्न करण्यासाठी कार्यशील असतो. प्रत्येक जण स्वत: मोठे होण्याची इच्छा बाळगतो, या इच्छांचा कुठेही अंत नाही. एकाची पूर्ती झाली की लगेच दुसरी इच्छा जन्म घेते. कधी कधी खूप कष्ट करून इच्छा पूर्ण केल्या जातात तर काही ईश्वराच्या दारी पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा असते. ईश्वराने त्या पूर्ण कराव्यात या अट्टाहासापोटी आपण उपवास करीत राहतो. कधी सोळा सोमवार, कधी अकरा मंगळवार तर कधी आणि काही.

खरेच असे उपवास करून आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात का? उपवास म्हणजे काय? तो कोणत्या प्रकारचा असावा? हे जाणून घेणे गरजेचे आहे. काही गोष्टी परंपरागत चालत आल्या त्याचा आपण अंगीकार केला. आजही काही श्रद्धाळू माणसे, उपवास म्हणजे काही खाद्य पदार्थ तसेच पेय यांचा त्याग असेच समजतात. हे शरीर एक मशीन आहे त्यालासुद्धा विश्रांतीची गरज आहे. जशी पिठाची गिरण आठवड्यातून एक दिवस बंद ठेवली जाते त्याप्रमाणे आपल्या पोटालाही एक दिवस विश्रांती मिळावी या हेतूने उपवास केला जायचा. जेणेकरून शरीररूपी मशीनचं आॅइलिंग आणि क्लिनिंग होऊ शकेल.

मनोविज्ञानात सांगितले जाते की जर एखाद्या गोष्टीवर सतत आपण लक्ष्य केंद्रित केले तर ती गोष्ट वृद्धीस पावते. ज्याला आपण संकल्पशक्ती असेसुद्धा म्हणू शकतो. थोेडा वेळ काढून जर आपण आपल्या मनाची तपासणी केली तर हे प्रकर्षाने जाणून येते की हे मन काही क्षणांसाठीसुद्धा स्थिर राहत नाही. मनाच्या एकाग्रतेची कमी असल्याचे दिसून येते. मनात सतत विचारांचे वारे वाहत असतात. पण जर हे विचार नकारात्मक किंवा व्यर्थ असतील तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीर तसेच जीवनावरही होतो. तुम्ही स्वत:ला भाग्यशाली किंवा सुखी, समाधानी बनवू इच्छित असाल तर विचारांचा उपवास करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक