शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
3
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
5
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
6
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
7
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
8
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
9
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
10
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
11
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
12
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
13
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
14
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
15
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
16
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
17
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
18
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
19
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
Daily Top 2Weekly Top 5

विचारांचा उपवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 02:02 IST

खरेच असे उपवास करून आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात का?

- नीता ब्रह्मकुमारी

मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. आधुनिक युगात प्रगती करणारा मानव अनेकानेक सुख-सुविधांनी स्वत:ला संपन्न करण्यासाठी कार्यशील असतो. प्रत्येक जण स्वत: मोठे होण्याची इच्छा बाळगतो, या इच्छांचा कुठेही अंत नाही. एकाची पूर्ती झाली की लगेच दुसरी इच्छा जन्म घेते. कधी कधी खूप कष्ट करून इच्छा पूर्ण केल्या जातात तर काही ईश्वराच्या दारी पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा असते. ईश्वराने त्या पूर्ण कराव्यात या अट्टाहासापोटी आपण उपवास करीत राहतो. कधी सोळा सोमवार, कधी अकरा मंगळवार तर कधी आणि काही.

खरेच असे उपवास करून आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात का? उपवास म्हणजे काय? तो कोणत्या प्रकारचा असावा? हे जाणून घेणे गरजेचे आहे. काही गोष्टी परंपरागत चालत आल्या त्याचा आपण अंगीकार केला. आजही काही श्रद्धाळू माणसे, उपवास म्हणजे काही खाद्य पदार्थ तसेच पेय यांचा त्याग असेच समजतात. हे शरीर एक मशीन आहे त्यालासुद्धा विश्रांतीची गरज आहे. जशी पिठाची गिरण आठवड्यातून एक दिवस बंद ठेवली जाते त्याप्रमाणे आपल्या पोटालाही एक दिवस विश्रांती मिळावी या हेतूने उपवास केला जायचा. जेणेकरून शरीररूपी मशीनचं आॅइलिंग आणि क्लिनिंग होऊ शकेल.

मनोविज्ञानात सांगितले जाते की जर एखाद्या गोष्टीवर सतत आपण लक्ष्य केंद्रित केले तर ती गोष्ट वृद्धीस पावते. ज्याला आपण संकल्पशक्ती असेसुद्धा म्हणू शकतो. थोेडा वेळ काढून जर आपण आपल्या मनाची तपासणी केली तर हे प्रकर्षाने जाणून येते की हे मन काही क्षणांसाठीसुद्धा स्थिर राहत नाही. मनाच्या एकाग्रतेची कमी असल्याचे दिसून येते. मनात सतत विचारांचे वारे वाहत असतात. पण जर हे विचार नकारात्मक किंवा व्यर्थ असतील तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीर तसेच जीवनावरही होतो. तुम्ही स्वत:ला भाग्यशाली किंवा सुखी, समाधानी बनवू इच्छित असाल तर विचारांचा उपवास करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक