शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

विश्वास हा नात्यातला व प्रामाणिकपणाचा प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 08:30 IST

कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. सर्व जग विश्वासावर अवलंबून आहे. विश्वास हा नात्यातला व प्रामाणिकपणाचा प्राण आहे. विश्वासातून सामर्थ्य वाढते.

कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. सर्व जग विश्वासावर अवलंबून आहे. विश्वास हा नात्यातला व प्रामाणिकपणाचा प्राण आहे. विश्वासातून सामर्थ्य वाढते. सामर्थ्यशाली माणूस विश्वासू असतो. विश्वासाने जग जिंकता येते. विश्वासातून आत्मस्फूर्ती मिळते. विश्वास मानवी जीवनाचा एक घटक आहे. कोणतेही कार्य करताना त्याच्या मनात विश्वास पक्का असावा. विश्वासामुळेच सफलता प्राप्त होते. विश्वास माणसाला नवसंजीवनी देतो. विश्वासामुळेच आपले कार्य यशस्वी होते. स्वत:चा स्वत:वर विश्वास असणे गरजेचे असते. स्वत:चा विश्वास पक्का असला की कोणतेही काम आपण तडीस नेतो. विश्वासातून एक आत्मऊर्जा मिळते. प्रेरणा-स्फूर्तीचा उद्गाता विश्वास आहे.विश्वासातून मानवी मनाची सचोटी लक्षात येते. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता विश्वासात असते. विचारांची प्रगल्भता विश्वासातून निर्माण होते. आपली कार्यक्षमता विश्वासावर निर्भर असते. विश्वासू माणसे लोकप्रिय होतात. कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर त्या व्यक्तीचा विश्वास श्रेष्ठ ठरतो. जीवनाची धारा बनून विश्वास कार्य करीत असतो. विश्वामध्ये मानव-समाजाचा विकास व कार्यप्रणाली अवलंबून आहे. बुद्धिबळ, ज्ञानबल, जनबल, शरीरबल, धनबळ, मनोबल, पदबळ, राजबळ इत्यादींमधूनही विश्वास जपला जातो. मानव व मानवता याची रक्षा विश्वासातून होते. विश्वासातून विचार, वचन आणि कर्म दिव्यतेकडे जातात. जीवनाला उत्तम गती विश्वासातून प्राप्त होते.मानवी जीवनात सदाचारतेचा संचार विश्वासामुळे होतो. एखादा महामानव जनतेला ऐश्वर्यशाली बनवतो ते त्यातल्या विश्वासामुळे. भयंकर कठीण परिस्थितीमध्ये साथ देतो तो विश्वास, विघ्न-बाधा आली की विश्वास धैर्य देतो. मनुष्याला महान कार्य करण्यास प्रवृत्त करतो तो विश्वासच असतो. विश्वासामुळे माणसे राज्य-साम्राज्य उभी करतात. डोंगराएवढ्या संकटाला तोंड देण्याची हिंमत विश्वासात आहे. जीवनात हानी-लाभ, जय-पराजय, जीवन-मरण, सफलता-विफलता, मान-अपमान, धर्म-अधर्म, विद्या-विज्ञान, ज्ञान-अज्ञान या सर्वांमध्ये विश्वासाला तडा जाऊ देऊ नये, विश्वासू माणूस स्थिर असतो. ज्या माणसांमध्ये धैर्य, साहस आणि विवेक यांचा समन्वय असतो. ज्या माणसांमध्ये धैर्य, साहस आणि विवेक यांचा समन्वय असतो त्याचे कारण त्यांच्यामधला विश्वास. ज्यांचा स्वत:वर विश्वास नसतो ते माणसे भेकुडे असतात.काहीही आपत्ती आली की लगेच घाबरतात. आत्मग्लानी आल्यास तिला झटकून टाकले पाहिजे. त्यासाठी विश्वास फार महत्त्वाचा आहे. म्हणून एका गीतात म्हटले आहे, ‘इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना’ मनातला विश्वास कायम बहरला पाहिजे. विश्वासामुळेच माणसे निर्भय व नि:संशयी असतात.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक