शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
2
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
3
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
4
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
5
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
6
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
7
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
8
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
9
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
10
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
11
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
12
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
13
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
14
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
15
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
16
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
17
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
19
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
20
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी

विश्वास हा नात्यातला व प्रामाणिकपणाचा प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 08:30 IST

कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. सर्व जग विश्वासावर अवलंबून आहे. विश्वास हा नात्यातला व प्रामाणिकपणाचा प्राण आहे. विश्वासातून सामर्थ्य वाढते.

कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. सर्व जग विश्वासावर अवलंबून आहे. विश्वास हा नात्यातला व प्रामाणिकपणाचा प्राण आहे. विश्वासातून सामर्थ्य वाढते. सामर्थ्यशाली माणूस विश्वासू असतो. विश्वासाने जग जिंकता येते. विश्वासातून आत्मस्फूर्ती मिळते. विश्वास मानवी जीवनाचा एक घटक आहे. कोणतेही कार्य करताना त्याच्या मनात विश्वास पक्का असावा. विश्वासामुळेच सफलता प्राप्त होते. विश्वास माणसाला नवसंजीवनी देतो. विश्वासामुळेच आपले कार्य यशस्वी होते. स्वत:चा स्वत:वर विश्वास असणे गरजेचे असते. स्वत:चा विश्वास पक्का असला की कोणतेही काम आपण तडीस नेतो. विश्वासातून एक आत्मऊर्जा मिळते. प्रेरणा-स्फूर्तीचा उद्गाता विश्वास आहे.विश्वासातून मानवी मनाची सचोटी लक्षात येते. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता विश्वासात असते. विचारांची प्रगल्भता विश्वासातून निर्माण होते. आपली कार्यक्षमता विश्वासावर निर्भर असते. विश्वासू माणसे लोकप्रिय होतात. कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर त्या व्यक्तीचा विश्वास श्रेष्ठ ठरतो. जीवनाची धारा बनून विश्वास कार्य करीत असतो. विश्वामध्ये मानव-समाजाचा विकास व कार्यप्रणाली अवलंबून आहे. बुद्धिबळ, ज्ञानबल, जनबल, शरीरबल, धनबळ, मनोबल, पदबळ, राजबळ इत्यादींमधूनही विश्वास जपला जातो. मानव व मानवता याची रक्षा विश्वासातून होते. विश्वासातून विचार, वचन आणि कर्म दिव्यतेकडे जातात. जीवनाला उत्तम गती विश्वासातून प्राप्त होते.मानवी जीवनात सदाचारतेचा संचार विश्वासामुळे होतो. एखादा महामानव जनतेला ऐश्वर्यशाली बनवतो ते त्यातल्या विश्वासामुळे. भयंकर कठीण परिस्थितीमध्ये साथ देतो तो विश्वास, विघ्न-बाधा आली की विश्वास धैर्य देतो. मनुष्याला महान कार्य करण्यास प्रवृत्त करतो तो विश्वासच असतो. विश्वासामुळे माणसे राज्य-साम्राज्य उभी करतात. डोंगराएवढ्या संकटाला तोंड देण्याची हिंमत विश्वासात आहे. जीवनात हानी-लाभ, जय-पराजय, जीवन-मरण, सफलता-विफलता, मान-अपमान, धर्म-अधर्म, विद्या-विज्ञान, ज्ञान-अज्ञान या सर्वांमध्ये विश्वासाला तडा जाऊ देऊ नये, विश्वासू माणूस स्थिर असतो. ज्या माणसांमध्ये धैर्य, साहस आणि विवेक यांचा समन्वय असतो. ज्या माणसांमध्ये धैर्य, साहस आणि विवेक यांचा समन्वय असतो त्याचे कारण त्यांच्यामधला विश्वास. ज्यांचा स्वत:वर विश्वास नसतो ते माणसे भेकुडे असतात.काहीही आपत्ती आली की लगेच घाबरतात. आत्मग्लानी आल्यास तिला झटकून टाकले पाहिजे. त्यासाठी विश्वास फार महत्त्वाचा आहे. म्हणून एका गीतात म्हटले आहे, ‘इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना’ मनातला विश्वास कायम बहरला पाहिजे. विश्वासामुळेच माणसे निर्भय व नि:संशयी असतात.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक