शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

आनंद अनुभवा विश्वास अन् श्रद्धेतून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 18:37 IST

आनंदाकडे पोहोचण्याचा, नव्हे आनंदाला अनुभवण्याचा एक मार्ग विश्वासातून, श्रद्धेतून जातो

- रमेश सप्रे

अवंतीपूरचा राजा विक्रमसेन आणि प्रधान इंद्रसेन दोघांतील संबंध अगदी राम-लक्ष्मणांसारखे. विक्रमसेनाचा आपल्या प्रधानावर पूर्ण विश्वास होता. स्वत:पेक्षा अधिक विश्वास प्रधानावर होता असं म्हटलं तरी चालेल.लागोपाठ तीन वर्षं पाऊस पडला नव्हता. अन्न पाण्याशिवाय सारे प्राणी-माणसं तडफडत होती. विक्रमसेनाला ही दुष्काळामुळे झालेली प्रजेची दुर्दशा पाहावेना. म्हणून इंद्रसेनाबरोबर एका रात्री तो राज्य सोडून निघाला. कुणालाही कळू नये म्हणून त्यांनी साधे कपडे घातले होते. तलवार मात्र दोघांकडेही होती. रात्रभर रानातून चालल्यामुळे दोघेही थकले. इंद्रसेन राजाला म्हणाला, ‘महाराज, या वृक्षाखाली तुम्ही झोपा मी जागून जंगली जनावरांपासून आपलं रक्षण करीन.’ राजाला केव्हा गाढ झोप लागली ते त्यालाही कळलं नाही. प्रधान इंद्रसेन हा संतप्रवृत्तीचा होता. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हा त्याचा जिवंत अनुभव होता. त्याला पक्ष्यांची बोली कळायची. पहाट होत आल्यानं पक्षी जागे झाले व किलबिलू लागले. ज्या झाडाखाली राजा नि प्रधान विश्रांती घेत होते, त्या झाडावर पक्ष्यांचं एक जोडपं येऊन बसलं. त्यांना दुष्काळी परिस्थितीपुढे अगतिक होऊन राजा-प्रधान दूर चाललेयत याची कल्पना होती. पक्षिणी म्हणाली, ‘मला या देवासमान राजाची मन:स्थिती पाहून दु:ख होतं.’ यावर तो पक्षी उद्गारला, ‘अगं, पण यावर उपाय आहे. तुला समोर जे कोरडं तळं दिसतंय ना? राजाचा गळा चिरून त्यातलं रक्त जर तळ्यात सगळीकडे शिंपडलं तर क्षणात सारे झरे वाहू लागून काही वेळातच तळं पाण्यानं तुडुंब भरेल. मग त्याचं पाणी पाट खणून अवंतीपूरला नेलं की सारेच प्रश्न सुटतील. ‘पण हे करणार कोण? त्यांना कळणार तरी कसं? पण यात राजाचे प्राण जातील ना? या पक्षिणीच्या प्रश्नावर पक्ष्याचं उत्तर स्पष्ट होतं. ‘याच तळ्याच्या पलिकडच्या काठावर गोल पानांची वनस्पती आहे त्या पानांचा रस पिळला तर राजाच्या गळ्याची जखम बरी होऊन तो पूर्ववत होईल नि तळं पाण्यानं भरल्यामुळे सारे प्रश्न सुटतील.’हा संवाद प्रधान इंद्रसेनानं संपूर्ण ऐकला. राजा गाढ झोपलाय हे पाहून तो त्या कोरडय़ा सरोवराच्या दुस-या तिरावर जातो. पाहतो तर तिथं खरंच गोल पानांच्या वनस्पती असतात. तलवारीनं तो आपलं बोट कापतो, रक्ताची धार लागते लगेच त्या गोल पानाचा रस लावल्यावर रक्त तर थांबतंच. पण बोटही अगदी पूर्वीसारखं होतं. म्हणजे त्या पक्ष्याचं म्हणणं खरं होतं तर! लगेच तो राजाजवळ येतो. त्याच्या छातीवर बसतो. त्यापूर्वी त्यानं पानांच्या एका द्रोणातून भरभूर गोल पानांचा रस काढून आणलेला असतो. छातीवर इंद्रसेनाला बसलेलं जाणवून राजानं डोळे उघडले. कोणताही प्रतिकार न करता तो शांतपणे पडून राहिला. नंतर इंद्रसेनानं तलवारीनं राजाचा गळा चिरला. रक्ताच्या चिळकांडय़ा उडाल्या. पसाभर रक्त घेऊन इंद्रसेनानं त्या सुक्या तळ्यात ठिकठिकाणी शिंपडलं. नंतर धावत येऊन बेशुद्ध पडलेल्या राजाच्या गळ्याला तो किमयागार रस लावला. काही क्षणातच राजा पूर्ववत झाला. त्यानं कोणताही प्रश्न प्रधानाला विचारला नाही. नंतर दोघं मागं वळून पाहतात तो काय अनेक ठिकाणी झरे फुटून ते तळं भरू लागलं होतं पाण्यानं. दोघंही आनंदानं राज्यात परतले. अनेक लोकांनी कुदळी, फावडी घेऊन त्या तळ्याच्या काठापासून अवंतीपुरापर्यंत पाट खणले. सगळीकडे पाणी पोहोचलं. काळाच्या ओघात पिकं शेतात डोलू लागली. पुन्हा अवंतीपूर आबादी आबाद झालं. सारी प्रजा व राज्य आनंदानं ओतप्रोत भरून गेलं. या सर्व काळात प्रधान इंद्रसेन मात्र एका गोष्टीनं अस्वस्थ होता. इतकं सगळं घडून राजा, प्राणावरच्या संकटातून बाहेर पडून सुद्धा एकदाही त्यानं आपल्याला त्या विषयी एकही प्रश्न कसा विचारला नाही? त्याची ती बेचैनी पाहून एकदा विक्रमसेनानंच त्याला विचारलं, ‘कोणत्याही विचारामुळे तू अस्वस्थ आहेस का?’ यावर इंद्रसेनानं आपल्या मनातल्या खळबळीचं कारण सांगितलं. यावर हसून राजा म्हणाला, ‘एवढंच होय, त्यात काय विचारायचं म्हणून मी विचारलं नाही. कारण तू करशील ते माझ्या नि सर्वाच्या कल्याणाचंच करशील यावर माझा ठाम विश्वास आहे. तू मला ठार जरी मारलं असतंस तरी ते माझ्या हितासाठीच असणार होतं. याबद्दल माझ्या मनात किंचितही संशय नाही.’ यावर इंद्रसेन काय बोलणार? क्षणभर पुतळ्यासारखा निश्चल उभा राहिला.या कथेतून प्रत्ययाला येणारा पूर्ण विश्वास हा केवळ त्या दोघांच्याच नव्हे तर सा-या प्रजाजनांच्या व राज्यातील पशु, पक्षी, वनस्पती साऱ्यांना आनंद देणाराच होता. खरंच आनंदाकडे पोहोचण्याचा, नव्हे आनंदाला अनुभवण्याचा एक मार्ग विश्वासातून, श्रद्धेतून जातो हे निश्चित! 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक