शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

हरी चिंतनाने मनाला सर्व सुखांचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 08:34 IST

मन हे लोलूप होऊन विषयात गुंतलेले आहे. त्यामुळे ते प्रत्येकवेळी विषयाकडे धाव घेते. त्या मनाला विषयापासून मागे फिरवायचे असेल तर भगवंताचे चरण किंवा त्याचे नामस्मरण हेच त्यासाठी बलवान व शूर आहे.

मन हे लोलूप होऊन विषयात गुंतलेले आहे. त्यामुळे ते प्रत्येकवेळी विषयाकडे धाव घेते. त्या मनाला विषयापासून मागे फिरवायचे असेल तर भगवंताचे चरण किंवा त्याचे नामस्मरण हेच त्यासाठी बलवान व शूर आहे. मनात जेव्हा एखादी वासना तयार होते, ती वासना त्या विषयाला चिटकून राहाते. त्यापासून ती दूर जाऊच शकत नाही. मग त्यापासून काही साध्य होईल का अनर्थ होईल, याचाही विचार ते मन करू शकत नाही. फक्त त्या मनाला आपली भूक भागविणे एवढेच माहीत असते. त्याच्या विपरीत परिणामाचा ते मन विचार करत नाही. मनाला आवर घालायचा असेल तर विठोबाचे पाय महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मनाला स्थिर करायचे असेल तर भगवंताचे चरणच स्थिर करू शकतात

‘मना तेथे धाव घेई ।राहे विठोबाच्या पायी ।।तुका म्हणे जीवा।नको सोडू या केशवा।।’

या अभंगावरूनही हे लक्षात येते. म्हणून मनुष्य जातीला संतांनी जो उपदेश केला तो हाच की, मनाला स्थिर करा- त्यासाठी अखंड चिंतन करा. मनापासून हरिचिंतन करून मनाला सर्वसुखांच्या लहरी अनुभवू द्या. ज्याप्रमाणे पाणी स्वच्छ नसेल तर साबण काय करू शकेल, त्याप्रमाणे ‘मन’ स्थिर किंवा शुद्ध नसेल तर ब्रह्मज्ञानाचा उपदेशही लागू पडत नाही. कारण विषयासक्त मन भजनाकरिता सवड मिळू देत नाही. ‘मन’ भव नदीत बुडवून टाकते; पण त्या परमात्म्याला शरण गेल्यास तो त्यातून तारत असतो.

काया, वाचा, मनाने भक्ती केल्यास ईश्वरूपी सगुण संपत्ती आपल्या हाती लाभते. त्या रूपाला नावारूपाला आणता येते. सगळ्या जगाला त्या नियंत्याची ओळख करून देता येईल. हा सर्व मनाचा खेळ आहे. स्थिर मन भवसिंधूच्या पार पोहोचवणारे ठरते. सर्व साधनांचे सार मनाला स्थिर करणे होय. कारण मन स्थिर झाल्याशिवाय योग-यागादी-तपे साध्य होणार नाहीत. भक्तवत्सल, दीननाथ म्हणून ज्याची त्रैलोक्यात ओळख आहे अशा विठ्ठलाच्या भक्तीचा कळस होणे हे मनाचे प्रथम काम आहे. मनाचा विश्वास असला की सर्व साधने सफळ होतात. द्वंद्व राहात नाही. सर्व द्वंद्वापासून मुक्त होऊन मनाची अवस्था स्थिर बनते. मन स्थिर झाल्यास कशाचाही निर्बंध राहात नाही.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक