शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग ३१, प्रत्येक माणूस हा गुणदोषांनी युक्त असतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 14:55 IST

जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे दोष हे असतातच. प्रत्येक माणूस हा गुणदोषांनी युक्त असतो. कुटूंबात सासूसुनांची भांडणे का होतात? सासू म्हणते सून वाईट तर सून म्हणते सासू वाईट. खरंतर दोघीही चांगल्या असतात.

ठळक मुद्देबोलताना जर तुम्ही चांगले बोललात तर भांडणे होणारच नाहीत.सासू सांगते सूनेचे दोष तर सून सांगते सासूचे दोष.सूनेच्या ठिकाणी गुणही आहेत व दोषही आहेत

- सदगुरू श्री वामनराव पैजगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे दोष हे असतातच. प्रत्येक माणूस हा गुणदोषांनी युक्त असतो. कुटूंबात सासूसुनांची भांडणे का होतात? सासू म्हणते सून वाईट तर सून म्हणते सासू वाईट. खरंतर दोघीही चांगल्या असतात. कुणीच वाईट नसतं पण त्यांचं बोलणं वाईट असते. बोलताना जर तुम्ही चांगले बोललात तर भांडणे होणारच नाहीत. सासू सांगते सूनेचे दोष तर सून सांगते सासूचे दोष. सूनेच्या ठिकाणी गुणही आहेत व दोषही आहेत. पण त्यातील गुण पहायचे की दोष पहायचे हे सासूने ठरवायला हवे.

सूनेच्या ठिकाणी जे दोष आहेत तेच फक्त जर सासूने पाहिले व दुस-याला सांगत सुटली तर ते  ऐकणारे नंतर तिच्याच सूनेला जाऊन सांगतात तुझी सासू असं असं बोलत होती. सुनेची देखील तिच गोष्ट.तिने जर सासूचे दोष पाहिले व दुस-यांना सांगितले तर सासू भेटल्यावर ही माणसे तिच्या सासूला सांगतात की तुझी सून असं असं म्हणत होती.मग त्यामुळे काय होतं. संत सांगतात त्याप्रमाणे मुळात माकड त्यात मद्य प्याला त्यात विंचू चावला त्यात डोके फिरले.तसे सासूसुनेचे नाते म्हणजे विळाभोपळा आता त्यात अशा त-हेने जर कुणी आगीत तेल ओतले की आग अधिकच भडकणार. कुटुंबात अशाच प्रकारे भांडणे होतात. घरांत भांडणे होवू लागली की घरातले स्वास्थ बिघडते.

कुटुंबातील प्रत्येक स्त्री फार महत्वाची असते. पुरूष श्रेष्ठ असे समाज जे म्हणतो ते खरे नाही कारण कुटूंबातील स्त्री श्रेष्ट असते. घरातील स्त्री जर शहाणी  तर त्या घरात सुख नांदेल पण तिच जर मुर्ख असतील तर त्या घरात ब्रम्हदेव जरी आला तरी सुख नांदू शकणार नाही. जर स्त्री शहाणी असेल तर ती त्या घरात स्वर्ग निर्माण करेल पण जर ती मूर्ख असेल तर ती त्या घराचा नर्क करेल. याचे कारण तिचे बोलणे. घरातील सगळे चांगले असले तरी त्यांचे बोलणे फार महत्वाचे असते. एक सिनेमा आला होता. बावर्जी नावाचा सिनेमा होता. खरंतर तो मी काही पाहिला नाही पण मला त्याची कथा माहित आहे. त्या सिनेमातील माणसे एकमेकांशी भांडत असतात कारण प्रत्येकाला एकमेकांबद्दल गैरसमज असतात. पण हा बावर्जी काय करतो. तो प्रत्येकाला सांगतो की घरातील प्रत्येकजण तुझ्याबद्दल कसे चांगले बोलत. त्यामुळे त्या माणसांना वाटते अरे दुसरे आपल्याबद्दल चांगले बोलतात आणि आपण उगीच गैरसमज करून घेतो.

अशा प्रकारे तो बावर्जी चांगले बोलून त्या घरात स्वर्ग निर्माण करतो. त्या बावर्जीला जर ही अक्कल होती तर घरातल्या इतर लोकांना ती नव्हती का? पण असे करायला कुणी सांगत नाहीत किंवा कुणी शिकवित नाही. जेव्हा तुम्ही चांगले बोलाल चांगले चिंतन कराल चांगली इच्छा कराल आणि जेवढे चांगले करता येईल तेवढे चांगले कराल तर मनाला किती शांती मिळते ते अनुभवा.