शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग ३१, प्रत्येक माणूस हा गुणदोषांनी युक्त असतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 14:55 IST

जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे दोष हे असतातच. प्रत्येक माणूस हा गुणदोषांनी युक्त असतो. कुटूंबात सासूसुनांची भांडणे का होतात? सासू म्हणते सून वाईट तर सून म्हणते सासू वाईट. खरंतर दोघीही चांगल्या असतात.

ठळक मुद्देबोलताना जर तुम्ही चांगले बोललात तर भांडणे होणारच नाहीत.सासू सांगते सूनेचे दोष तर सून सांगते सासूचे दोष.सूनेच्या ठिकाणी गुणही आहेत व दोषही आहेत

- सदगुरू श्री वामनराव पैजगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे दोष हे असतातच. प्रत्येक माणूस हा गुणदोषांनी युक्त असतो. कुटूंबात सासूसुनांची भांडणे का होतात? सासू म्हणते सून वाईट तर सून म्हणते सासू वाईट. खरंतर दोघीही चांगल्या असतात. कुणीच वाईट नसतं पण त्यांचं बोलणं वाईट असते. बोलताना जर तुम्ही चांगले बोललात तर भांडणे होणारच नाहीत. सासू सांगते सूनेचे दोष तर सून सांगते सासूचे दोष. सूनेच्या ठिकाणी गुणही आहेत व दोषही आहेत. पण त्यातील गुण पहायचे की दोष पहायचे हे सासूने ठरवायला हवे.

सूनेच्या ठिकाणी जे दोष आहेत तेच फक्त जर सासूने पाहिले व दुस-याला सांगत सुटली तर ते  ऐकणारे नंतर तिच्याच सूनेला जाऊन सांगतात तुझी सासू असं असं बोलत होती. सुनेची देखील तिच गोष्ट.तिने जर सासूचे दोष पाहिले व दुस-यांना सांगितले तर सासू भेटल्यावर ही माणसे तिच्या सासूला सांगतात की तुझी सून असं असं म्हणत होती.मग त्यामुळे काय होतं. संत सांगतात त्याप्रमाणे मुळात माकड त्यात मद्य प्याला त्यात विंचू चावला त्यात डोके फिरले.तसे सासूसुनेचे नाते म्हणजे विळाभोपळा आता त्यात अशा त-हेने जर कुणी आगीत तेल ओतले की आग अधिकच भडकणार. कुटुंबात अशाच प्रकारे भांडणे होतात. घरांत भांडणे होवू लागली की घरातले स्वास्थ बिघडते.

कुटुंबातील प्रत्येक स्त्री फार महत्वाची असते. पुरूष श्रेष्ठ असे समाज जे म्हणतो ते खरे नाही कारण कुटूंबातील स्त्री श्रेष्ट असते. घरातील स्त्री जर शहाणी  तर त्या घरात सुख नांदेल पण तिच जर मुर्ख असतील तर त्या घरात ब्रम्हदेव जरी आला तरी सुख नांदू शकणार नाही. जर स्त्री शहाणी असेल तर ती त्या घरात स्वर्ग निर्माण करेल पण जर ती मूर्ख असेल तर ती त्या घराचा नर्क करेल. याचे कारण तिचे बोलणे. घरातील सगळे चांगले असले तरी त्यांचे बोलणे फार महत्वाचे असते. एक सिनेमा आला होता. बावर्जी नावाचा सिनेमा होता. खरंतर तो मी काही पाहिला नाही पण मला त्याची कथा माहित आहे. त्या सिनेमातील माणसे एकमेकांशी भांडत असतात कारण प्रत्येकाला एकमेकांबद्दल गैरसमज असतात. पण हा बावर्जी काय करतो. तो प्रत्येकाला सांगतो की घरातील प्रत्येकजण तुझ्याबद्दल कसे चांगले बोलत. त्यामुळे त्या माणसांना वाटते अरे दुसरे आपल्याबद्दल चांगले बोलतात आणि आपण उगीच गैरसमज करून घेतो.

अशा प्रकारे तो बावर्जी चांगले बोलून त्या घरात स्वर्ग निर्माण करतो. त्या बावर्जीला जर ही अक्कल होती तर घरातल्या इतर लोकांना ती नव्हती का? पण असे करायला कुणी सांगत नाहीत किंवा कुणी शिकवित नाही. जेव्हा तुम्ही चांगले बोलाल चांगले चिंतन कराल चांगली इच्छा कराल आणि जेवढे चांगले करता येईल तेवढे चांगले कराल तर मनाला किती शांती मिळते ते अनुभवा.