शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

शिक्षण आणि संस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 15:17 IST

 शिक्षण ही जीवनाची एक मौल्यवान भेट आहे आणि संस्कार जीवनाचे सार आहे.

 शिक्षण ही जीवनाची एक मौल्यवान भेट आहे आणि संस्कार जीवनाचे सार आहे. या दोन संपत्तीशिवाय मालमत्ता, जमीनजुमला, पद-प्रतिष्ठा आणि मान-मर्यादा सर्व तुच्छ आहेत. शिक्षण केवळ व्यक्तीच्या आयुष्यासाठी दिशानिर्देशच करीत नाही तर स्थिती देखील बदलते. अनादी काळापासून म्हणजे जेव्हा शिक्षणातून मिळणाºया ज्ञानाला संग्रहीत करण्याचे काहीच साधन नव्हते तेव्हा हे शिक्षणरूपी ज्ञान ऋषी, मुनी, आचार्य, गुरू आणि संत महात्म्यांनी मानवी जीवनाचे सार वृक्षांच्या साली, दगडी शिला आणि पानावर लिहिले होते. आणि हेच ज्ञान त्यानंतर विस्तारीत झाले त्याचा प्रसार-प्रसार होत गेला आणि हळुहळू शिक्षण आणि शोध, शिक्षण उद्देश, पध्दती स्वरूपात आणि शैक्षणिक दर्जामध्ये वारंवार बदल होत गेला. आज वेळ आली आहे की, जर जग, देश, समाज आणि कुटुंबातील प्रत्येक कुटुंब शिक्षित नसेल तर मग आम्ही प्रगत जग किंवा प्रगत देशाची कल्पनाच करू शकत काळ नाही. त्यामुळे आज फार वेगाने बदलत आहे आणि नवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहे. शिक्षणाची नवनवीन साधने विकसीत आणि आविष्कृत होत आहे. जग जवळ येत चाललेल आहे. एखाद्या छोट्या घटनेचा सुध्दा प्रभाव संपुर्ण जगावर आज पडत आहे आणि हा प्रभाव समजण्यासाठी, तंत्रज्ञानाचा समज घेण्यासाठी, आपल्या मुलांना उत्तम शिक्षण, अर्थपुर्ण शिक्षण आणि व्यावहारीक शिक्षणासह काळाच्या सोबत चालणे खुप महत्वाचे आहे. ज्या प्रकारे विना शस्त्र युध्द केले जावू शकत नाही त्याचप्रमाणे शिक्षणाशिवाय जीवन सार्थक आणि सत्य बनवू शकत नाही. आपण सर्वांचे आद्य आणि सर्वोत्तम कर्तव्य हेच आहे की, आपल्या संततीला सुशिक्षित व सुसंस्कारीत बनविणे कारण सुशिक्षित व सुसंस्कारीत परिवार - समाज आणि देशाच्या विकासामध्ये खुप महत्वाची भूमिका पार पाडू शकेल आणि देशाचा एक जबाबदार नागरीक बनुन त्यांचे कर्तव्य व जबाबदारी यातून समाजाचा व देशाचा विकास करू शकेल.शिक्षणामध्ये संस्कार समाविष्ट आहे. कारण भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, भारतीय जीवन मुल्य हे शिक्षणाचा आधार आहे. सनातन धर्म हेच शिकवीत आलेला आहे की मनुष्यामनुष्यामध्ये प्रेम, बंधुता, एकता, सहकार्य आणि एकमेकांच्या सुखदु:खात सहकार्य करणे हीच खरी भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीचा हेच वैशिष्ट्य आहे की सर्व संस्कृती त्यात सामावलेल्या आहेत आणि त्याने त्याचे अस्तित्व सुध्दा टिकवून ठेवले आहे. संस्कार कोणत्याही झाडावर उगवत नाही, आकाशातून पडत नाही, संस्कार घर, परिवार, समाज आणि सभोवतालच्या वातावरणापासून सुजीत होत असतात. संस्काराची सगळ्यात जास्त जबाबदारी आई-वडील, पालक आणि शिक्षकांची असते. हे देखील तेवढेच खरे आहे की ही संस्कार केवळ सांगण्याव्दारे, बोलण्याव्दारे येत नाही, पण ते वर्तनातून-आचरणातून येतात, सत्कर्मातून येतात आणि चारित्रीक उज्वलतेतून येतात. जसे आई-वडील, पालक वागतात तसेच त्यांची मुलं पण आचरण करतात.

- सविता लिलाधर तायडे 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकEducationशिक्षण