शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 6

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:29 PM

बारकाईने पाहिले तर पर्यावरणातला प्रत्येक घटक इतका महत्वाचा आहे की एकावर दुसरे दुस-यावर तिसरे घटक अवलंबून आहेत हे तुमच्या लक्षांत येईल.

- सदगुरू श्री वामनराव पैआपण एकमेकांच्या सुखाला किंवा दु:खाला कारणीभूत आहोतबारकाईने पाहिले तर पर्यावरणातला प्रत्येक घटक इतका महत्वाचा आहे की एकावर दुसरे दुस-यावर तिसरे घटक अवलंबून आहेत हे तुमच्या लक्षांत येईल. या दृष्टीकोनातून जो जीवन जगतो त्याच्या जीवनातले दु:ख हरण होते आणि तो माणूस सुखी होेतो.आज आपण एकमेकांवर अवलंबून आहोत.आपण एकमेकांच्या सुखाला किंवा दु:खाला कारणीभूत आहोत ही गोष्ट लोकांच्या ध्यानातच येत नाही.लोकांना आपल्या वाटयाला दु:ख आले की असे वाटते हा देवाचा कोप झाला,मूळ पुरुषाचा रोष झाला,आपण नवस फेडला नाही,दरवर्षी तीर्थयात्रा करतो ती केली नाही,अशा नाना  त-येच्या च्या समजूती लोकांच्या मनात असतात.पण हयाला काहीच अर्थ नाही.काही बुवाबाबा असे सांगतात की आमच्या मठाला दर महिन्याला भेट दिली नाही तर तुमच्यावर संकटे येतील.अशी ते लोकांच्या मनात भिती घालतात.आता हा बुवा रहातो एका टोकाला व लोक रहातात वेगवेगळ्या ठिकाणी.आजकाल प्रवासाचा खर्च इतका वाढलेला आहे की लोकांना तिथे जाणे खरंतर परवडत नाही परंतू संकट येईल हया भितीने ते दूरवरचा प्रवास करतात.हया बुवाबाबाने अशी भिती घातलेली असते की जणू काही या लोकांची सर्व जबाबदारी त्याच्या एकट्यावर आहे.जर कोणी तुमची अशी जबाबदारी घेतो असे म्हणत असेल तर ते खोटे आहे.खरंतर या सगळ्याचे भांडवल मनातील भिती आहे.मग तो माणूस गुंड असो पुंड असो त्या सर्वांचे भांडवल भिती आहे.काही डॉक्टर असे असतात की ते लोकांना घाबरवतात.अहो तुम्ही आलात म्हणून बरे झाले नाहीतर तुमचे काही खरे नव्हते. असे म्हटले की लोक घाबरतात आणि तो मागेल ती फी दयायला तयार होतात.मला असे काही बुवाबाबा माहित आहेत की ते सांगतात, “तुझ्या घरात तीन मृत्यू आहेत त्यात तुझा नंबर तिसरा आहे.”असे सांगितल्यावर कोण घाबरणार नाही सांगा बघू.मृत्यू ही संकल्पनाच लोकांना ठाऊक नाही.एका वर्षात तीन मृत्यू आहेत असे म्हटले की माणूस घाबरतोच.भिती घातली की या बुवाबाबांचे काम झाले.मग ते सांगतील तेवढे पैसे माणूस त्यांना देतो.कधीकधी घरात दु:ख आहे याचे कारण नवस फेडला नाही असे कुणीतरी पुजारी सांगतो व लोकांच्या मनात भिती घालतो.आता मला सांगा नवसाचा व तुमच्या दु:खाचा काही संबंध आहे का? तुम्ही नवस कुणाला केला देवाला.देव तुम्ही नवस फेडला की नाही हे पहात टपून बसला आहे का.अहो देवाचे साम्राज्य किती मोठे आहे.त्याला आपण अनंतकोटी ब्रम्हांड नायक म्हणतो.परमेश्वर हा अनंतकोटी ब्रम्हांड नायक आहे.त्या अनंत कोटी ब्रम्हांडांत माणूस हया प्राण्याला काही स्थान आहे का? जिथे पृथ्वीचे स्थान सुध्दा एका टिंबाइतके आहे तिथे माणसाला किती स्थान असेल.एक ब्रम्हांड,दोन ब्रम्हांड,एक सूर्य,दोन सूर्य नव्हे तर अनेक सूर्य आहेत असे आपले शास्त्रज्ञ सांगतात.