शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

स्वप्न ज्ञानेशांचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 06:39 IST

भावार्थदीपिका नावांचा चैतन्यदीप महाराष्ट्रीयांच्या नगरी चेतविणाऱ्या ज्ञानियांचा शिरोमणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलीने महाराष्ट्रातील घर नि घर आपल्या विवेक दीपाने उजळून टाकले.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेभावार्थदीपिका नावांचा चैतन्यदीप महाराष्ट्रीयांच्या नगरी चेतविणाऱ्या ज्ञानियांचा शिरोमणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलीने महाराष्ट्रातील घर नि घर आपल्या विवेक दीपाने उजळून टाकले. नऊ हजारांहून अधिक ओव्यांचे आपले देशीकार लेणे महालया नाम नेवासे ग्रासी पूर्णत्वास गेले तेव्हा ज्ञानदेवासारख्या आनंदयोग्याने विश्वात्मक परमेश्वरी शक्ती व विश्वगुरू संत निवृत्तीनाथांच्याकडे पसायदान मागितले. मुळात पसायदान हे उपेक्षितांचा म्होरक्या संत ज्ञानोबा माउलीने विश्वाला कवेत घेणारे भव्य-दिव्य स्वप्न आहे. दु:ख गिळून गोविंदाचे गीत गाण्याची सहनशीलता व्यक्तिमत्त्वामध्ये मुरावी लागते तेव्हा कोठे म्हणता येते-आता विश्वात्मके देवें। येणे वागयज्ञे तोशावें।तोशोनी मज द्यावें। पसायदान हे।।आपल्या अन्तवृत्तीला उर्ध्वगामी करणारी भव्य-दिव्य स्पप्ने पाहणे हा तर माणसाचा स्थायीभाव आहे; परंतु या स्वप्नाला वैयक्तिक द्वेशाच्या इंगळीने कडाडून चावा घेऊ नये. एकदा की या इंगळीने चावा घेतला की स्वप्ने सापासारखी जमिनीवरूनच सरपटू लागतात. त्यांना मुक्ततेचे नभांगण कधी खुणावतच नाही. वैयक्तिक स्वप्नांच्या भोवतीने वैयक्तिक स्वार्थ जेव्हा पिंगा घालू लागतो, तेव्हा आपल्या पलीकडील जग धुसर वाटायला लागले. ज्ञानवंत मात्र ‘स्व’चे विसर्जन करून ‘समष्टीच्या’ कल्याणाचे स्वप्न पाहतात. त्यांच्या मनीचा स्वप्नरूपी पक्षीराज सारे विश्व आनंदाने बहारून जावुं रे अशी गगनाला स्पर्श करणारी स्वप्ने पाहतात. तसे पाहिले तर जन्मापासूनच्या उपेक्षा वाटायला आलेल्या ज्ञानदेवांनी पसायदानाच्या रूपाने पाहिलेले स्वप्न साऱ्या कुंपणापलीकडे भरारी घेण्याचे काम करते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक