शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पितृदोष घालवण्यासाठी हे जरूर करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 09:46 IST

ज्या पूर्वजांनी अपार कष्ट सोसून आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, कष्ट सोसून सर्व सुख उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या ऋणातून तर आपण उतराई होऊ शकत नाहीत.

ज्या पूर्वजांनी अपार कष्ट सोसून आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, कष्ट सोसून सर्व सुख उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याऋणातून तर आपण उतराई होऊ शकत नाहीत. परंतु फूल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांचे स्मरण करावे, त्यांच्या नावाने तिलोदक सोडावे, पिंडदान करावे, असे आपल्या संस्कृतीत सांगितलेले आहे. परंतु जे लोक हे करीत नाहीत, त्यांचे काय, असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. तर जे लोक असे करीत नाहीत, त्यांना पितृदोष लागतो. त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. घर, नोकरी, व्यवसाय आदी कामांमध्ये अडचणींचा डोंगर उभा राहतो. साधे, सोपे, सरळ काम पण तेही होत नाही. या बाबींमुळे ते त्रस्त होतात. हा दोष दूर करण्यासाठी पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांच्या नावाने काही नाकाही करणे क्रमप्राप्त ठरते.

एखाद्याला पितृदोष आहे की नाही, हे पाहण्यासाठी कुंडली लागते. परंतु कुंडली, पत्रिका नसेल तर पितृदोषाने आपण त्रस्त आहोत, हे कसे ओळखावे, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. पितृदोषाने घरात कोणत्या घटना घडतात ते थोडक्यात पाहू-

१) वडील व मुलगा यांच्यात खटके उडणे. त्यांच्यात मतभेद असणे. विचार बिल्कुलच न जमणे.

२)  अपत्यांचे विवाह जुळण्यात बाधा उत्पन्न होणे. तसेच जुळलेले लग्न मोडणे. कुंडली जुळत असेल तरी काही ना काही कारणास्तव विवाह न जुळणे.

३) विवाह होऊन अनेक वर्षे झाली तरी अपत्यप्राप्ती न होणे. गर्भपात होणे. अपंग मुले जन्माला येणे.

४) कुटुंबातील सदस्य एकामागे एक आजारी पडणे.

५) कर्ज वाढणे. व्यापार-व्यवसायात नुकसान होणे. परिश्रम घेऊनही नोकरीतील प्रगती खुंटणे.

६) कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण होणे. अन्न- धान्याची बरकत नसणे. वायफळ खर्च होणे.

७) वाईट स्वप्न पडणे. वरील सर्व गोष्टी पितृदोषाचे संकेत दाखवतात. श्राध्दपक्षात ब्राह्मण, पंडीत यांच्याकडून पिंडदान केल्याने पितृदोष नाहीसे होऊन मनशांती लाभते. ज्या माणसाच्या घरात भागवत ग्रंथ जेवढा काळ राहील तोपर्यंत त्याचे पूर्वज-पितर दूध, तूप व मधुयुक्त अन्नसेवन करतात व जलप्राशन करतात. भगवान श्रीकृष्णाने आपले सर्व तेज ज्या भागवत ग्रंथात ठेवले तो ग्रंथ म्हणजेच श्रीमद्भागवत. हा ग्रंथ म्हणजे साक्षात श्रीकृष्णाची अक्षरबद्ध प्रतिमाच. गोकर्णाने आपल्या सावत्र भावाची पिशाच्चमुक्ती होण्यासाठी श्राद्ध केले. भागवत सप्ताह केला. तेव्हा कोठे तो उच्च लोकी गेला. भागवताच्यापठण/श्रवणाने पितर संतुष्ट होऊन सद्गतीस जातात. श्रद्धेने श्राद्ध केल्यास कीर्ती, बल, लक्ष्मी, यश, आरोग्य, धन, धान्य, ऐश्वर्य मिळते. त्यामुळे आपला सर्वतोपरी उत्कर्ष होतो. आपणही ऋणमुक्तीच्या भावनेतून कृतज्ञतेने श्राद्ध करावे.

पितृदोषावर हे आहेत उपाय-

१)  पिंडदान : नित्य मासिक, त्रैमासिक, षष्मासिक, सांवत्सरिक पिंडदान करावे.

२) जलतर्पण- नरकयातना सहन करणाºया पितरांचा जलतर्पणामुळे उद्धार होतो. देवतर्पण करताना बोटांच्या पुढच्या भागाकडून जल सोडावे. गुरू, ऋषी यांना रविचे बोट (अनामिका) व करंगळी यांच्या मुळातून जलतर्पण करावे. गुरुचे बोट (तर्जनी) व अंगठा यांच्यावरून पितरांना तर्पण करावे.

३) विविध प्रकारची दाने द्यावीत - गाय, भूमी, तीळ, सोने, तूप, वस्त्र, धान्य, रुपे, गूळ, मीठ ही दशदाने गरजूंना/सत्पात्रीस द्याव्यात.अष्टदाने- शिधा, जलाने भरलेला कुंभ, गाय, वस्त्र, भूमी, शय्या, छत्र, आसन गरजूंना दान द्यावे. उपदाने- अन्न, जलकुंभ, चामडी पादत्राणे, कमंडलू,छत्र, वस्त्र, काठी, लोखंडाचा मोठा दंड, शेगडी, दिवा, तीळ, विडा, चंदन, फुलमाला. पडदाने- आसन, चामडी जोडे, छत्र किंवा छत्री, अंगठी, कमंडलू,जानवे, तूप, वस्त्र, भोजन, भोजन बनविण्यासाठी भांडी इत्यादी दान करा.

४) आपल्या मात्यापित्यांची मनोभावे सेवा करावी.

५) विधिवत श्रेष्ठतेने हवनविधी करावा. हवनविधीच्या वेळी पितरांना आपण जे द्रव्य देतो त्याला कव्य म्हणतात. हवनाच्या सांगतेवेळी पितर आपली समस्याव प्रार्थना स्वीकारतात. अशाप्रकारे अग्नीच्या माध्यमातून यमासहित आपले सर्व ज्ञात-अज्ञात पितर तृप्त होऊन पुढील सद्गतीस मार्गस्थ होतात.

६) हवनयुक्त पितृसुक्ताचे पठण करणे.

- संकलन : सुमंत अयाचित

टॅग्स :spiritualअध्यात्मिक