शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

पितृदोष घालवण्यासाठी हे जरूर करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 09:46 IST

ज्या पूर्वजांनी अपार कष्ट सोसून आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, कष्ट सोसून सर्व सुख उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या ऋणातून तर आपण उतराई होऊ शकत नाहीत.

ज्या पूर्वजांनी अपार कष्ट सोसून आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, कष्ट सोसून सर्व सुख उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याऋणातून तर आपण उतराई होऊ शकत नाहीत. परंतु फूल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांचे स्मरण करावे, त्यांच्या नावाने तिलोदक सोडावे, पिंडदान करावे, असे आपल्या संस्कृतीत सांगितलेले आहे. परंतु जे लोक हे करीत नाहीत, त्यांचे काय, असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. तर जे लोक असे करीत नाहीत, त्यांना पितृदोष लागतो. त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. घर, नोकरी, व्यवसाय आदी कामांमध्ये अडचणींचा डोंगर उभा राहतो. साधे, सोपे, सरळ काम पण तेही होत नाही. या बाबींमुळे ते त्रस्त होतात. हा दोष दूर करण्यासाठी पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांच्या नावाने काही नाकाही करणे क्रमप्राप्त ठरते.

एखाद्याला पितृदोष आहे की नाही, हे पाहण्यासाठी कुंडली लागते. परंतु कुंडली, पत्रिका नसेल तर पितृदोषाने आपण त्रस्त आहोत, हे कसे ओळखावे, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. पितृदोषाने घरात कोणत्या घटना घडतात ते थोडक्यात पाहू-

१) वडील व मुलगा यांच्यात खटके उडणे. त्यांच्यात मतभेद असणे. विचार बिल्कुलच न जमणे.

२)  अपत्यांचे विवाह जुळण्यात बाधा उत्पन्न होणे. तसेच जुळलेले लग्न मोडणे. कुंडली जुळत असेल तरी काही ना काही कारणास्तव विवाह न जुळणे.

३) विवाह होऊन अनेक वर्षे झाली तरी अपत्यप्राप्ती न होणे. गर्भपात होणे. अपंग मुले जन्माला येणे.

४) कुटुंबातील सदस्य एकामागे एक आजारी पडणे.

५) कर्ज वाढणे. व्यापार-व्यवसायात नुकसान होणे. परिश्रम घेऊनही नोकरीतील प्रगती खुंटणे.

६) कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण होणे. अन्न- धान्याची बरकत नसणे. वायफळ खर्च होणे.

७) वाईट स्वप्न पडणे. वरील सर्व गोष्टी पितृदोषाचे संकेत दाखवतात. श्राध्दपक्षात ब्राह्मण, पंडीत यांच्याकडून पिंडदान केल्याने पितृदोष नाहीसे होऊन मनशांती लाभते. ज्या माणसाच्या घरात भागवत ग्रंथ जेवढा काळ राहील तोपर्यंत त्याचे पूर्वज-पितर दूध, तूप व मधुयुक्त अन्नसेवन करतात व जलप्राशन करतात. भगवान श्रीकृष्णाने आपले सर्व तेज ज्या भागवत ग्रंथात ठेवले तो ग्रंथ म्हणजेच श्रीमद्भागवत. हा ग्रंथ म्हणजे साक्षात श्रीकृष्णाची अक्षरबद्ध प्रतिमाच. गोकर्णाने आपल्या सावत्र भावाची पिशाच्चमुक्ती होण्यासाठी श्राद्ध केले. भागवत सप्ताह केला. तेव्हा कोठे तो उच्च लोकी गेला. भागवताच्यापठण/श्रवणाने पितर संतुष्ट होऊन सद्गतीस जातात. श्रद्धेने श्राद्ध केल्यास कीर्ती, बल, लक्ष्मी, यश, आरोग्य, धन, धान्य, ऐश्वर्य मिळते. त्यामुळे आपला सर्वतोपरी उत्कर्ष होतो. आपणही ऋणमुक्तीच्या भावनेतून कृतज्ञतेने श्राद्ध करावे.

पितृदोषावर हे आहेत उपाय-

१)  पिंडदान : नित्य मासिक, त्रैमासिक, षष्मासिक, सांवत्सरिक पिंडदान करावे.

२) जलतर्पण- नरकयातना सहन करणाºया पितरांचा जलतर्पणामुळे उद्धार होतो. देवतर्पण करताना बोटांच्या पुढच्या भागाकडून जल सोडावे. गुरू, ऋषी यांना रविचे बोट (अनामिका) व करंगळी यांच्या मुळातून जलतर्पण करावे. गुरुचे बोट (तर्जनी) व अंगठा यांच्यावरून पितरांना तर्पण करावे.

३) विविध प्रकारची दाने द्यावीत - गाय, भूमी, तीळ, सोने, तूप, वस्त्र, धान्य, रुपे, गूळ, मीठ ही दशदाने गरजूंना/सत्पात्रीस द्याव्यात.अष्टदाने- शिधा, जलाने भरलेला कुंभ, गाय, वस्त्र, भूमी, शय्या, छत्र, आसन गरजूंना दान द्यावे. उपदाने- अन्न, जलकुंभ, चामडी पादत्राणे, कमंडलू,छत्र, वस्त्र, काठी, लोखंडाचा मोठा दंड, शेगडी, दिवा, तीळ, विडा, चंदन, फुलमाला. पडदाने- आसन, चामडी जोडे, छत्र किंवा छत्री, अंगठी, कमंडलू,जानवे, तूप, वस्त्र, भोजन, भोजन बनविण्यासाठी भांडी इत्यादी दान करा.

४) आपल्या मात्यापित्यांची मनोभावे सेवा करावी.

५) विधिवत श्रेष्ठतेने हवनविधी करावा. हवनविधीच्या वेळी पितरांना आपण जे द्रव्य देतो त्याला कव्य म्हणतात. हवनाच्या सांगतेवेळी पितर आपली समस्याव प्रार्थना स्वीकारतात. अशाप्रकारे अग्नीच्या माध्यमातून यमासहित आपले सर्व ज्ञात-अज्ञात पितर तृप्त होऊन पुढील सद्गतीस मार्गस्थ होतात.

६) हवनयुक्त पितृसुक्ताचे पठण करणे.

- संकलन : सुमंत अयाचित

टॅग्स :spiritualअध्यात्मिक