शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पितृदोष घालवण्यासाठी हे जरूर करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 09:46 IST

ज्या पूर्वजांनी अपार कष्ट सोसून आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, कष्ट सोसून सर्व सुख उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या ऋणातून तर आपण उतराई होऊ शकत नाहीत.

ज्या पूर्वजांनी अपार कष्ट सोसून आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, कष्ट सोसून सर्व सुख उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याऋणातून तर आपण उतराई होऊ शकत नाहीत. परंतु फूल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांचे स्मरण करावे, त्यांच्या नावाने तिलोदक सोडावे, पिंडदान करावे, असे आपल्या संस्कृतीत सांगितलेले आहे. परंतु जे लोक हे करीत नाहीत, त्यांचे काय, असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. तर जे लोक असे करीत नाहीत, त्यांना पितृदोष लागतो. त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. घर, नोकरी, व्यवसाय आदी कामांमध्ये अडचणींचा डोंगर उभा राहतो. साधे, सोपे, सरळ काम पण तेही होत नाही. या बाबींमुळे ते त्रस्त होतात. हा दोष दूर करण्यासाठी पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांच्या नावाने काही नाकाही करणे क्रमप्राप्त ठरते.

एखाद्याला पितृदोष आहे की नाही, हे पाहण्यासाठी कुंडली लागते. परंतु कुंडली, पत्रिका नसेल तर पितृदोषाने आपण त्रस्त आहोत, हे कसे ओळखावे, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. पितृदोषाने घरात कोणत्या घटना घडतात ते थोडक्यात पाहू-

१) वडील व मुलगा यांच्यात खटके उडणे. त्यांच्यात मतभेद असणे. विचार बिल्कुलच न जमणे.

२)  अपत्यांचे विवाह जुळण्यात बाधा उत्पन्न होणे. तसेच जुळलेले लग्न मोडणे. कुंडली जुळत असेल तरी काही ना काही कारणास्तव विवाह न जुळणे.

३) विवाह होऊन अनेक वर्षे झाली तरी अपत्यप्राप्ती न होणे. गर्भपात होणे. अपंग मुले जन्माला येणे.

४) कुटुंबातील सदस्य एकामागे एक आजारी पडणे.

५) कर्ज वाढणे. व्यापार-व्यवसायात नुकसान होणे. परिश्रम घेऊनही नोकरीतील प्रगती खुंटणे.

६) कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण होणे. अन्न- धान्याची बरकत नसणे. वायफळ खर्च होणे.

७) वाईट स्वप्न पडणे. वरील सर्व गोष्टी पितृदोषाचे संकेत दाखवतात. श्राध्दपक्षात ब्राह्मण, पंडीत यांच्याकडून पिंडदान केल्याने पितृदोष नाहीसे होऊन मनशांती लाभते. ज्या माणसाच्या घरात भागवत ग्रंथ जेवढा काळ राहील तोपर्यंत त्याचे पूर्वज-पितर दूध, तूप व मधुयुक्त अन्नसेवन करतात व जलप्राशन करतात. भगवान श्रीकृष्णाने आपले सर्व तेज ज्या भागवत ग्रंथात ठेवले तो ग्रंथ म्हणजेच श्रीमद्भागवत. हा ग्रंथ म्हणजे साक्षात श्रीकृष्णाची अक्षरबद्ध प्रतिमाच. गोकर्णाने आपल्या सावत्र भावाची पिशाच्चमुक्ती होण्यासाठी श्राद्ध केले. भागवत सप्ताह केला. तेव्हा कोठे तो उच्च लोकी गेला. भागवताच्यापठण/श्रवणाने पितर संतुष्ट होऊन सद्गतीस जातात. श्रद्धेने श्राद्ध केल्यास कीर्ती, बल, लक्ष्मी, यश, आरोग्य, धन, धान्य, ऐश्वर्य मिळते. त्यामुळे आपला सर्वतोपरी उत्कर्ष होतो. आपणही ऋणमुक्तीच्या भावनेतून कृतज्ञतेने श्राद्ध करावे.

पितृदोषावर हे आहेत उपाय-

१)  पिंडदान : नित्य मासिक, त्रैमासिक, षष्मासिक, सांवत्सरिक पिंडदान करावे.

२) जलतर्पण- नरकयातना सहन करणाºया पितरांचा जलतर्पणामुळे उद्धार होतो. देवतर्पण करताना बोटांच्या पुढच्या भागाकडून जल सोडावे. गुरू, ऋषी यांना रविचे बोट (अनामिका) व करंगळी यांच्या मुळातून जलतर्पण करावे. गुरुचे बोट (तर्जनी) व अंगठा यांच्यावरून पितरांना तर्पण करावे.

३) विविध प्रकारची दाने द्यावीत - गाय, भूमी, तीळ, सोने, तूप, वस्त्र, धान्य, रुपे, गूळ, मीठ ही दशदाने गरजूंना/सत्पात्रीस द्याव्यात.अष्टदाने- शिधा, जलाने भरलेला कुंभ, गाय, वस्त्र, भूमी, शय्या, छत्र, आसन गरजूंना दान द्यावे. उपदाने- अन्न, जलकुंभ, चामडी पादत्राणे, कमंडलू,छत्र, वस्त्र, काठी, लोखंडाचा मोठा दंड, शेगडी, दिवा, तीळ, विडा, चंदन, फुलमाला. पडदाने- आसन, चामडी जोडे, छत्र किंवा छत्री, अंगठी, कमंडलू,जानवे, तूप, वस्त्र, भोजन, भोजन बनविण्यासाठी भांडी इत्यादी दान करा.

४) आपल्या मात्यापित्यांची मनोभावे सेवा करावी.

५) विधिवत श्रेष्ठतेने हवनविधी करावा. हवनविधीच्या वेळी पितरांना आपण जे द्रव्य देतो त्याला कव्य म्हणतात. हवनाच्या सांगतेवेळी पितर आपली समस्याव प्रार्थना स्वीकारतात. अशाप्रकारे अग्नीच्या माध्यमातून यमासहित आपले सर्व ज्ञात-अज्ञात पितर तृप्त होऊन पुढील सद्गतीस मार्गस्थ होतात.

६) हवनयुक्त पितृसुक्ताचे पठण करणे.

- संकलन : सुमंत अयाचित

टॅग्स :spiritualअध्यात्मिक