शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

पितृदोष घालवण्यासाठी हे जरूर करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 09:46 IST

ज्या पूर्वजांनी अपार कष्ट सोसून आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, कष्ट सोसून सर्व सुख उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या ऋणातून तर आपण उतराई होऊ शकत नाहीत.

ज्या पूर्वजांनी अपार कष्ट सोसून आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, कष्ट सोसून सर्व सुख उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याऋणातून तर आपण उतराई होऊ शकत नाहीत. परंतु फूल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांचे स्मरण करावे, त्यांच्या नावाने तिलोदक सोडावे, पिंडदान करावे, असे आपल्या संस्कृतीत सांगितलेले आहे. परंतु जे लोक हे करीत नाहीत, त्यांचे काय, असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. तर जे लोक असे करीत नाहीत, त्यांना पितृदोष लागतो. त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. घर, नोकरी, व्यवसाय आदी कामांमध्ये अडचणींचा डोंगर उभा राहतो. साधे, सोपे, सरळ काम पण तेही होत नाही. या बाबींमुळे ते त्रस्त होतात. हा दोष दूर करण्यासाठी पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांच्या नावाने काही नाकाही करणे क्रमप्राप्त ठरते.

एखाद्याला पितृदोष आहे की नाही, हे पाहण्यासाठी कुंडली लागते. परंतु कुंडली, पत्रिका नसेल तर पितृदोषाने आपण त्रस्त आहोत, हे कसे ओळखावे, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. पितृदोषाने घरात कोणत्या घटना घडतात ते थोडक्यात पाहू-

१) वडील व मुलगा यांच्यात खटके उडणे. त्यांच्यात मतभेद असणे. विचार बिल्कुलच न जमणे.

२)  अपत्यांचे विवाह जुळण्यात बाधा उत्पन्न होणे. तसेच जुळलेले लग्न मोडणे. कुंडली जुळत असेल तरी काही ना काही कारणास्तव विवाह न जुळणे.

३) विवाह होऊन अनेक वर्षे झाली तरी अपत्यप्राप्ती न होणे. गर्भपात होणे. अपंग मुले जन्माला येणे.

४) कुटुंबातील सदस्य एकामागे एक आजारी पडणे.

५) कर्ज वाढणे. व्यापार-व्यवसायात नुकसान होणे. परिश्रम घेऊनही नोकरीतील प्रगती खुंटणे.

६) कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण होणे. अन्न- धान्याची बरकत नसणे. वायफळ खर्च होणे.

७) वाईट स्वप्न पडणे. वरील सर्व गोष्टी पितृदोषाचे संकेत दाखवतात. श्राध्दपक्षात ब्राह्मण, पंडीत यांच्याकडून पिंडदान केल्याने पितृदोष नाहीसे होऊन मनशांती लाभते. ज्या माणसाच्या घरात भागवत ग्रंथ जेवढा काळ राहील तोपर्यंत त्याचे पूर्वज-पितर दूध, तूप व मधुयुक्त अन्नसेवन करतात व जलप्राशन करतात. भगवान श्रीकृष्णाने आपले सर्व तेज ज्या भागवत ग्रंथात ठेवले तो ग्रंथ म्हणजेच श्रीमद्भागवत. हा ग्रंथ म्हणजे साक्षात श्रीकृष्णाची अक्षरबद्ध प्रतिमाच. गोकर्णाने आपल्या सावत्र भावाची पिशाच्चमुक्ती होण्यासाठी श्राद्ध केले. भागवत सप्ताह केला. तेव्हा कोठे तो उच्च लोकी गेला. भागवताच्यापठण/श्रवणाने पितर संतुष्ट होऊन सद्गतीस जातात. श्रद्धेने श्राद्ध केल्यास कीर्ती, बल, लक्ष्मी, यश, आरोग्य, धन, धान्य, ऐश्वर्य मिळते. त्यामुळे आपला सर्वतोपरी उत्कर्ष होतो. आपणही ऋणमुक्तीच्या भावनेतून कृतज्ञतेने श्राद्ध करावे.

पितृदोषावर हे आहेत उपाय-

१)  पिंडदान : नित्य मासिक, त्रैमासिक, षष्मासिक, सांवत्सरिक पिंडदान करावे.

२) जलतर्पण- नरकयातना सहन करणाºया पितरांचा जलतर्पणामुळे उद्धार होतो. देवतर्पण करताना बोटांच्या पुढच्या भागाकडून जल सोडावे. गुरू, ऋषी यांना रविचे बोट (अनामिका) व करंगळी यांच्या मुळातून जलतर्पण करावे. गुरुचे बोट (तर्जनी) व अंगठा यांच्यावरून पितरांना तर्पण करावे.

३) विविध प्रकारची दाने द्यावीत - गाय, भूमी, तीळ, सोने, तूप, वस्त्र, धान्य, रुपे, गूळ, मीठ ही दशदाने गरजूंना/सत्पात्रीस द्याव्यात.अष्टदाने- शिधा, जलाने भरलेला कुंभ, गाय, वस्त्र, भूमी, शय्या, छत्र, आसन गरजूंना दान द्यावे. उपदाने- अन्न, जलकुंभ, चामडी पादत्राणे, कमंडलू,छत्र, वस्त्र, काठी, लोखंडाचा मोठा दंड, शेगडी, दिवा, तीळ, विडा, चंदन, फुलमाला. पडदाने- आसन, चामडी जोडे, छत्र किंवा छत्री, अंगठी, कमंडलू,जानवे, तूप, वस्त्र, भोजन, भोजन बनविण्यासाठी भांडी इत्यादी दान करा.

४) आपल्या मात्यापित्यांची मनोभावे सेवा करावी.

५) विधिवत श्रेष्ठतेने हवनविधी करावा. हवनविधीच्या वेळी पितरांना आपण जे द्रव्य देतो त्याला कव्य म्हणतात. हवनाच्या सांगतेवेळी पितर आपली समस्याव प्रार्थना स्वीकारतात. अशाप्रकारे अग्नीच्या माध्यमातून यमासहित आपले सर्व ज्ञात-अज्ञात पितर तृप्त होऊन पुढील सद्गतीस मार्गस्थ होतात.

६) हवनयुक्त पितृसुक्ताचे पठण करणे.

- संकलन : सुमंत अयाचित

टॅग्स :spiritualअध्यात्मिक