शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
4
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
5
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
6
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
7
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
8
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
9
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
10
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
11
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
12
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
13
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
14
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
15
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
16
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
17
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
18
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
19
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
20
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग ३०, चांगले बोलण्याचे फायदे चांगलेच होतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 08:00 IST

आपल्याला देवाने वाचा दिलेली आहे,ती इतर प्राण्यांना दिलेली नाही. कुत्र्याला भाकरी दिली की तो कधी थँक्यू म्हणतो का? पण माणसाला काही दिले तर तो म्हणेल आभारी आहे किंवा शुक्रिया किंवा थँक्यू. माणसाला बोलता येते पण त्याचा तो वापर चांगला करतो का?

ठळक मुद्देमाणसाला बोलता येते पण त्याचा तो वापर चांगला करतो का?अगदी तसाच तो बुध्दीचा देखील चांगला वापर करत नाहीबोलताना तो नेहमी वाईटच बोलतो. खरंतर चांगले बोलणे लोकांना माहितच नाही

- सदगुरू श्री वामनराव पैआपल्याला देवाने वाचा दिलेली आहे,ती इतर प्राण्यांना दिलेली नाही. कुत्र्याला भाकरी दिली की तो कधी थँक्यू म्हणतो का? पण माणसाला काही दिले तर तो म्हणेल आभारी आहे किंवा शुक्रिया किंवा थँक्यू. माणसाला बोलता येते पण त्याचा तो वापर चांगला करतो का? अगदी तसाच तो बुध्दीचा देखील चांगला वापर करत नाही. बोलताना तो नेहमी वाईटच बोलतो. खरंतर चांगले बोलणे लोकांना माहितच नाही.याबाबत आमच्या मंडळातील एक ट्रस्टी त्यांच्या ऑफिसामधील घडलेली गोष्ट सांगतो, “मी प्रवचनातून सांगितले होते की बोलताना चांगलेच बोला.कुणाची निंदा करू नका.चांगले बोलण्याचे फायदे चांगलेच होतात. वाईट बोललात तर त्याचे दुष्परिणाम फार होतात. आमच्या या ट्रस्टीच्या ऑफिसमध्ये ऑफिसर चहाला एकत्र जमायचे. त्यांच्या बैठकीला सुरवात व्हायची ती दुस-यांच्या निंदेनेच. आमच्या ट्रस्टींनी त्या मंडळींना सांगितले हे बघा यापूढे आपण जे काही बोलायचे ते चांगलेच बोलायचे वाईट बोलायचे नाही मी असे ठरविले आहे. बाकीचे सर्वही म्हणाले हो हो सद्गुरूंनी हे फार चांगले सांगितले आपण तसेच करूया. सगळ्यांनी एकमताने ठराव पास केला की आजपासून आपण फक्त चांगलेच बोलायचे,वाईट बोलायचे नाही. पण नंतर गप्पा मारताना सगळे जण गप्पच झाले.कारण काय बोलायचे याचा विचार करत ते एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले. काय बोलायचे हा त्यांना एक मोठा गहन प्रश्नच पडला. आतापर्यंत ते नेहमी दुस-यांची चेष्टा करीत असत.लक्षात ठेवा चांगले बोलणे हे जितके सोपे वाटते तितके ते सोपे नाही. माणूस वाईट सहज बोलतो,सहज तो दुस-यांची निंदा-नालस्ती करतो. याबाबत एक गोष्ट आहे की एका गावामध्ये संध्याकाळी वडाच्या झाडाच्या पारावर सगळे गावकरी येवून बसायचे गप्पा मारत रात्र झाली की आपआपल्या घरी जायचे. त्यांत एक माणूस नेहमी सगळ्यांच्या आधी यायचा व सर्वांच्या नंतर जायचा. काही दिवसांनी हे कुणाच्यातरी लक्षांत आले.कुणीतरी त्याला प्रश्न विचारला काय रे बाबा हयाचे कारण काय. तर तो त्यावर म्हणाला याचे गुपीत असे आहे की मी जर इथे हजर नसेन तर सर्वजण माझी निंदा करतील पण मी तिथे हजर असलो तर माझ्याबद्दल कुणी काहीच बोलणार नाही. कारण आपल्यापैकी जो हजर नसतो त्याच्याबद्दल आपण नेहमी निंदा करतो पण जो हजर असतो त्याच्याबद्दल बोलण्याची आपली हिम्मत होत नाही, सांगायचा मुद्दा जगांत हे असेच चाललेले आहे.