शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग ३०, चांगले बोलण्याचे फायदे चांगलेच होतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 08:00 IST

आपल्याला देवाने वाचा दिलेली आहे,ती इतर प्राण्यांना दिलेली नाही. कुत्र्याला भाकरी दिली की तो कधी थँक्यू म्हणतो का? पण माणसाला काही दिले तर तो म्हणेल आभारी आहे किंवा शुक्रिया किंवा थँक्यू. माणसाला बोलता येते पण त्याचा तो वापर चांगला करतो का?

ठळक मुद्देमाणसाला बोलता येते पण त्याचा तो वापर चांगला करतो का?अगदी तसाच तो बुध्दीचा देखील चांगला वापर करत नाहीबोलताना तो नेहमी वाईटच बोलतो. खरंतर चांगले बोलणे लोकांना माहितच नाही

- सदगुरू श्री वामनराव पैआपल्याला देवाने वाचा दिलेली आहे,ती इतर प्राण्यांना दिलेली नाही. कुत्र्याला भाकरी दिली की तो कधी थँक्यू म्हणतो का? पण माणसाला काही दिले तर तो म्हणेल आभारी आहे किंवा शुक्रिया किंवा थँक्यू. माणसाला बोलता येते पण त्याचा तो वापर चांगला करतो का? अगदी तसाच तो बुध्दीचा देखील चांगला वापर करत नाही. बोलताना तो नेहमी वाईटच बोलतो. खरंतर चांगले बोलणे लोकांना माहितच नाही.याबाबत आमच्या मंडळातील एक ट्रस्टी त्यांच्या ऑफिसामधील घडलेली गोष्ट सांगतो, “मी प्रवचनातून सांगितले होते की बोलताना चांगलेच बोला.कुणाची निंदा करू नका.चांगले बोलण्याचे फायदे चांगलेच होतात. वाईट बोललात तर त्याचे दुष्परिणाम फार होतात. आमच्या या ट्रस्टीच्या ऑफिसमध्ये ऑफिसर चहाला एकत्र जमायचे. त्यांच्या बैठकीला सुरवात व्हायची ती दुस-यांच्या निंदेनेच. आमच्या ट्रस्टींनी त्या मंडळींना सांगितले हे बघा यापूढे आपण जे काही बोलायचे ते चांगलेच बोलायचे वाईट बोलायचे नाही मी असे ठरविले आहे. बाकीचे सर्वही म्हणाले हो हो सद्गुरूंनी हे फार चांगले सांगितले आपण तसेच करूया. सगळ्यांनी एकमताने ठराव पास केला की आजपासून आपण फक्त चांगलेच बोलायचे,वाईट बोलायचे नाही. पण नंतर गप्पा मारताना सगळे जण गप्पच झाले.कारण काय बोलायचे याचा विचार करत ते एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले. काय बोलायचे हा त्यांना एक मोठा गहन प्रश्नच पडला. आतापर्यंत ते नेहमी दुस-यांची चेष्टा करीत असत.लक्षात ठेवा चांगले बोलणे हे जितके सोपे वाटते तितके ते सोपे नाही. माणूस वाईट सहज बोलतो,सहज तो दुस-यांची निंदा-नालस्ती करतो. याबाबत एक गोष्ट आहे की एका गावामध्ये संध्याकाळी वडाच्या झाडाच्या पारावर सगळे गावकरी येवून बसायचे गप्पा मारत रात्र झाली की आपआपल्या घरी जायचे. त्यांत एक माणूस नेहमी सगळ्यांच्या आधी यायचा व सर्वांच्या नंतर जायचा. काही दिवसांनी हे कुणाच्यातरी लक्षांत आले.कुणीतरी त्याला प्रश्न विचारला काय रे बाबा हयाचे कारण काय. तर तो त्यावर म्हणाला याचे गुपीत असे आहे की मी जर इथे हजर नसेन तर सर्वजण माझी निंदा करतील पण मी तिथे हजर असलो तर माझ्याबद्दल कुणी काहीच बोलणार नाही. कारण आपल्यापैकी जो हजर नसतो त्याच्याबद्दल आपण नेहमी निंदा करतो पण जो हजर असतो त्याच्याबद्दल बोलण्याची आपली हिम्मत होत नाही, सांगायचा मुद्दा जगांत हे असेच चाललेले आहे.