शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण् - भाग १७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 5:35 PM

जीवनविद्या मिशनमध्ये येणा-यांना जीवन जगणे ही कला आहे हे आम्ही सर्वात आधी शिकवितो.आणि हे आता शिकवितो असे नाही तर गेले कित्येक वर्षे हे आम्ही लोकांना शिकवित आहोत.मी नेहमी सांगतो जीवन जगणे

- सदगुरू श्रीवामनराव पै

जन्मापासूनच प्रवास सुरू आहे.

जीवनविद्या मिशनमध्ये येणा-यांना जीवन जगणे ही कला आहे हे आम्ही सर्वात आधी शिकवितो.आणि हे आता शिकवितो असे नाही तर गेले कित्येक वर्षे हे आम्ही लोकांना शिकवित आहोत.मी नेहमी सांगतो जीवन जगणे ही कला आहे हे तू आधी शिकून घे.कारण जीवन जगणे ही कला आहे हे आज कुणीच सांगत नाही. ना आईवडिल, ना शिक्षक, ना प्रोफेसर, ना धर्ममार्तंड, ना राजकारणी कुणीच असे सांगत नाही.हे फक्त जीवनविद्या मिशनच सांगते.जीवन जगणे ही कला आहे व या कलेत फक्त ध्यान लावणे एवढीच गोष्ट शिकवली जात नाही.लोकांना वाटते की ध्यान लावले, मेडिटेशन केले, डोळे मिटून बसले किंवा मौन धारण केले की जीवनातले सगळे प्रश्न सुटतील.याने तुमच्या जीवनातले प्रश्न सुटणार नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा.जीवनातले प्रश्न सुटण्यासाठी ज्ञानच पाहिजे.हे ज्ञान कसले तर हे ज्ञान व्यवहारिक, पुस्तकी, आत्मज्ञान असे सर्व प्रकारचे ज्ञान पाहिजे.ज्ञान म्हणजे माहिती इतके ते मर्यादित नसू नये.ज्ञान म्हणजे माहिती व ती सर्वांना मिळालीच पाहिजे कारण ही माहिती जितकी अधिक तितके त्याचे जीवन सुसह्य होते.माहितीज्ञान नसेल तर त्या माणसाला परिस्थितीकडून मार मिळण्याची शक्यता अधिक जास्त असते.उदाहरण द्यायचे झाले तर एखादयाला दिल्लीला जायचे असेल व कुठल्या गाडीत बसायची ही जर माहिती त्याला नसेल तर त्याची जी वाट लागते.असे खरंतर आपले झालेले आहे.आपण प्रवासाला निघालेले आहोत व अज्ञानाच्या गाडीत बसलेले आहोत.कुठे जायचे आहे, कसे जायचे आहे, कधी पोहचायचे आहे याचे काहीच ज्ञान नाही आणि आम्ही प्रवास करतो आहोत.लोक म्हणतात एकेक दिवस ढकलतो आहे. कोणाला जर विचारले की  काय गोविंदराव कसे चाललेले आहे?यावर ते काय सांगतात काय सांगू वामनराव एकेक दिवस ढकलतो आहोत.दुसरे रामराव त्यांना विचारले कसे काय रामराव?तर ते म्हणतात मरत नाही म्हणून जगतो आहोत.याला काय जीवन म्हणतात का? आपण जर नीट विचार केला तर माणूस जन्माला येतो तिथून त्याचा प्रवास सुरू होतो.पुर्नजन्म जर मानला तर असा अनेक जन्मापासून प्रवास सुरू आहे.किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित असे म्हटले जाते.पुर्नजन्म जावू दे आपण सध्याच्या जन्माचा विचार केला तरी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याचा प्रवास सुरू असतो.हा प्रवास मी कशासाठी करायचा आहे? मी जन्माला आलोच का? मला जन्माला घातले ते का घातले? इथे परमेश्वराचा संबंध काय?जर त्याने आम्हांला जन्माला घातले तर तो आमची बाकीची सोय का करत नाही ? असे परमेश्ववराला दोष देणारे अनेक लोक आहेत.