शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 20:37 IST

धर्म,वर्ण, प्रांत, राष्ट्र यामुळे मानवजातीची जी विभागणी झाली तिचे परिणाम पाहिले तर उपाय करायला जायचे व तोच अपाय व्हावा असे दिसून येते.सोय म्हणून जे केली ती गैरसोय झाली व ती गैरसोयच आपल्या मानगुटीवर बसलेली आहे.

- सदगुरू श्रीवामनराव पै

माणूस ही जात व माणुसकी हाच धर्म

धर्म,वर्ण, प्रांत, राष्ट्र यामुळे मानवजातीची जी विभागणी झाली तिचे परिणाम पाहिले तर उपाय करायला जायचे व तोच अपाय व्हावा असे दिसून येते.सोय म्हणून जे केली ती गैरसोय झाली व ती गैरसोयच आपल्या मानगुटीवर बसलेली आहे.अखिल मानवजातीच्या दु:खाला हेच अज्ञान कारणीभूत आहे.आपल्याला जर कुणी विचारले तुमची जात कोणती तर माणूस ही जात.धर्म कोणता तर माणुसकी हाच धर्म.देव कोणता माझ्या ह्रदयात नांदणारा ईश्वर व जो सर्व भूतमात्रात नांदतो तो ईश्वर हाच खरा देव.अशा रितीने मानवी संस्कृतीचे संस्कार झाले तर जगात नंदनवन झाल्याशिवाय रहाणार नाही.सांगायचा मुद्दा असा हे अज्ञान सर्व दु:खाचे मूळ आहे व या अज्ञानातून किती गोष्टी निर्माण होतात.अज्ञानातून अहंकार निर्माण होतो,अभिमान निर्माण होतो, असूया निर्माण होते,अंधश्रध्दा निर्माण होते,अविचार निर्माण होतो व अतिरेक निर्माण होतो.अज्ञानातून या सात गोष्टी निर्माण झाल्या.एका अज्ञानातून या इतक्या गोष्टी निर्माण होतात.अज्ञान हे एक आहे असे नव्हे तर या अज्ञानाची ही सर्व पिलावळ आहे व ती एकापेक्षा एक भयानक आहे.यापेक्षा राक्षस परवडले असे म्हणण्याची वेळ येते.जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत मानवजात सुखी होणे शक्य नाही असा जीवनविद्येचा सिध्दांत आहे.कितीही सुधारणा केल्या तरी काहीच उपयोग होत नाही.बघा तुम्ही आज धार्मिक, शैक्षणिक, वैज्ञानिक किती सुधारणा केल्या तरी परिस्थिती अधिकच बिघडत आहे,कधीकधी त्यामुळे पूर्वीचे बरे होते असे देखील म्हणण्याची वेळ येते.ब्रिटीशांच्या काळात आनंदी आनंद होता असे म्हणणारे लोक आहेत.त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे.जरी तो काळ पारतंत्र्याचा होता तरी लोक सुखी होते.लोकांना बाहेर पडताना भिती वाटत नव्हती.गोव्यात पोर्तुगीजांनी पाचशे वर्षे राज्य केले पण तिथेही लोक सुखी होते. त्यावेळी चो-या होत नव्हत्या,खून होत नव्हते.मी पूर्वी बायकोच्या घरी गोव्याला जायचो तेव्हा तिथले लोक आपल्या घराला कुलूप लावत नसत.पण आज बघा अगदी अलिकडे गोव्यात किती खून पडले.हिंदुस्थानातही आज बजबजपुरी माजलेली आहे.कुठल्याही प्रकारची स्थिरता नाही, सर्वत्र अशांतता आहे, कुठलीही सुरक्षितता नाही याला प्रगती म्हणायची का? याला प्रगती म्हणता येणार नाही.याला कोण जबाबदार आहे तर याला आपण सर्वच जबाबदार आहोत.माणसाची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे असेच चालत रहाणार.सुख कमी व दु:ख जास्त हे जे चाललेले आहे हे असेच चालत रहाणार जोपर्यंत माणसाची मानसिकता बदलत नाही म्हणून माणसाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.आम्ही जीवनविद्या मिशनमध्ये माणसांची मानसिकता बदलतो.त्यांना आम्ही ज्ञान देतो व हे ज्ञान वेगवेगळया प्रकारचे असते.