शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

Dhantrayodashi 2019 : धनत्रयोदशीला का खरेदी केले जातात सोन्या-चांदीचे दागिने? काय आहे मान्यता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 16:39 IST

Dhanteras 2019 Importance : दिवाळीचा सण सलग पाच दिवस साजरा केला जातो. यातील पाचही दिवसांचं वेगवेगळं महत्व असतं. कार्तिक महिन्याच्या अमावसेला येणाऱ्या दिवाळी उत्सवाची तिथि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला सुरू होते.

दिवाळीचा सण सलग पाच दिवस साजरा केला जातो. यातील पाचही दिवसांचं वेगवेगळं महत्व असतं. कार्तिक महिन्याच्या अमावसेला येणाऱ्या दिवाळी उत्सवाची तिथि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला सुरू होते. यालाच धनत्रयोदशी असं म्हटलं जातं. दिवाळी सणाला याच दिवसापासून सुरूवात होते. धनत्रयोदशीला खरेदी करण्याची आणि संपत्तीचा देव कुबेराची पूजा करण्याची प्रथा आहे. पण कधी तुम्ही विचार केलाय का की, धनत्रयोदशीला लोक भांडी किंवा सोन्या-चांदीचे दागिने खरेदी का करतात? खरंतर पुराणांमध्ये यामागे एक कथा सांगितली जाते.

(Image Credit : Social Media)

अशी मान्यता आहे की, धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी किंवा तांब्याची भांडी खरेदी करणं शुभ मानलं जातं. असं केलं तर वर्षभर तुमच्या घरात धन-संपत्ती नांदते अशी मान्यता आहे. तसेच या दिवशी खरेदी केल्याने घरातील प्रत्येक सदस्यांवरील आपत्ती टळून ते सुखी राहतात. 

(Image Credit : Social Media)

पौराणिक कथांनुसार, राजा हिमाच्या पुत्रावर मृत्युची भिती होती. अशी भविष्यवाणी झाली होती की, लग्नाच्या चौथ्या दिवशी राजाच्या मुलाचा मृत्यु होईल. लग्नाच्या चौथ्या दिवशी जेव्हा यमराज सापाच्या रूपात राजाच्या पुत्राला घेण्यासाठी गेला, तेव्हा नवविवाहित पत्नीने साहस दाखवत खोलीमध्ये चारही बाजूने दिवे लागले. आणि तिची आभूषणे व भांडी खोलीच्या प्रवेश द्वारावर ठेवली होती. सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चमक पाहून सापाचे डोळे भ्रमित झाले आणि तो राजाचा पुत्राला सोबत न घेताच तेथून निघून गेला.

पौराणिक कथेतील याच मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी किंवा सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याची प्रथा चालत आली आहे. असे म्हणतात की,  भांड्यांची खरेदी करून परिवारातील प्रत्येक सदस्याचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यावरील संकट दूर होतं. तसेच घरात आनंद नांदतो.

टॅग्स :DiwaliदिवाळीIndian Festivalsभारतीय सण