शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

मृत्यू आणि अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 5:42 AM

जेव्हा तुम्ही मृत्यू नाकारता तेव्हा तुम्ही जीवनसुद्धा नाकारता.

जेव्हा तुम्ही मृत्यू नाकारता तेव्हा तुम्ही जीवनसुद्धा नाकारता. मृत्यू ही काही अशी गोष्ट नाहीये जी तुमच्यासोबत भविष्यात घडणार आहे. जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा सोबत अर्धा मृत्यूही झाला. फक्त राहिलेला अर्धा भाग घडणं अजून बाकी आहे एवढंच. नि:शंकपणे एक दिवस ते पूर्ण होणार आहे. जीवन आणि मृत्यू या विभिन्न प्रक्रि या नाहीत. त्या आपसात एकमेकांत खोलवरगुंतल्या आहेत. जीवन आणि मृत्यू या दोन्ही प्रक्रिया तुमच्या आत प्रत्येक क्षणी घडत आहेत. तुमची अवघी श्वसन क्रिया, तुम्ही आत घेत असलेला प्रत्येक श्वास म्हणजे जीवन आहे आणि बाहेर सोडलेला प्रत्येक श्वास हा मृत्यू आहे. जर तुम्ही पुढचा एक श्वास आत घेतला नाही म्हणजे तुम्ही मरण पावलात. जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा सर्वात पहिली गोष्ट तुम्ही केलीत ती म्हणजे प्राणवायू आत घेतलात आणि आयुष्यात तुमच्या हातूनसर्वात शेवटची केली जाणारी गोष्ट म्हणजे तुम्ही शेवटचा श्वास बाहेर सोडणार. आयुष्य निरंतर अनिश्चित आहे. मृत्यू मात्र शंभर टक्के निश्चित आहे, यात अजिबात शंका नाही. जीवनाबद्दल तुम्हाला लाखो शंका असू शकतात. ‘मी श्रीमंत होईन की नाही?’, ‘मी सुशिक्षित होईन की नाही?’, ‘मी आत्मज्ञानी होईन की नाही? वगैरे’. पण मृत्यूबाबत मुळीच कोणतीही शंका नाहीये. तर मग निश्चित, अटळ गोष्ट सोडून अनिश्चित गोष्टींचं ओझं डोक्यावर ठेवून बसण्यात काय अर्थ आहे? आध्यात्मिक प्रक्रिया तेव्हाच सुरू होते जेव्हा तुम्ही मर्त्य आहात याची तुम्हाला जाणीव होते. तुम्ही देवाचा विचार करत आहात म्हणून तुम्ही आध्यात्मिक होत नाही. तुम्ही ईश्वराचा शोध घेता कारण तुम्हाला खूश राहायचं आहे किंवा तुम्हाला तुमचा व्यवसाय नीट चालवायचा असतो किंवा तुम्हाला स्वर्गात जायचं असतं. कारण तुमचं आयुष्य तुम्ही नरक बनवलंय म्हणून. आपण मर्त्य आहोत याची जाणीव झाल्यावरच तुम्ही आध्यात्मिक बनता.- सद््गुरू जग्गी वासुदेव