शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 19:30 IST

वारी.. एक तप !

पंढरीची वारी हे एक तप असून, आनंद प्राप्तीसाठी पत निर्माण करणारे माध्यम आहे. वारीत चालत असताना भाविकांकडून कायिक, वाचिक, मानसिक तीन प्रकारचे तप घडते. पायी चालत राहिल्याने कायिक तप घडते. शिवाय शरीराकडून वेगवेगळी सेवा घडत राहिल्याने ते एक प्रकारचे कायिक तप घडते. हाताने टाळी, मुखाने भजन हे तप घडण्यासाठी सांगितलेला मार्ग म्हणजे वारी आहे.

लागोनिया पाया विनवीतो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम’ या संतवचनाप्रमाणे आपण साधना केली तर आपल्याकडून तप घडेल म्हणून वारीची परंपरा सुरु केली. प्रत्येक व्यक्तीकडून दररोज दहा प्रकारचे पाप घडत असते. कायिक तीन, वाचिक चार, मानसिक तीन असे एकूण दहा प्रकारचे पाप घडत असते . पापाचे फळ दु:ख असून, पुण्याचे फळ सुख आहे. सुखाची प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा असते, परंतु पुण्य करावे वाटत नाही. मला दु:ख व्हावे असे म्हणणारा जगाच्या पाठीवर एकही व्यक्ती भेटत नाही. तरी कोणाचेही दु:ख गेलेले पाहावयास मिळत नाही. कारण दु:खाचे मूळ पाप असून, ते कोणालाही चुकविता येत नाही.

पापाचे डोंगरच्या डोंगर प्रत्येकाच्या कर्मातून पाहावयास मिळतात. पाप दाखविण्यासारखी वस्तू नसून, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्या वेदना होतात त्या पापामुळेच होतात. निषिद्ध कर्म म्हणजे चुकीचे कर्म, कर्तव्य विन्मुख कर्म याला पाप म्हणतात. या सर्व पापातून मुक्त होण्यासाठी तप खूपच गरजेचे आहे. हे तप घडण्यासाठी वारी करावी लागते. ब्रह्मदेवालाही सृष्टी निर्माण करण्याअगोदर तप करावे लागले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहण्यासाठी लागणाºया पुण्याचा विचार मांडत असताना मला तप करावे लागले होते, असे नमूद केले आहे. प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये तपाची खूपच आवश्यकता असते. वारीमध्ये भाविकांकडून सहज तप घडते. तपासाठी वेगळा अट्टाहास करावा लागत नाही. वारी म्हणजेच एक तप आहे. यामध्ये कायिक तपाबरोबर वाचिक तप घडते. मुखाने नामस्मरण करणे हे वाचिक तप ठरते. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ ग्रंथातून संदेश दिला, ‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा’ वारीमध्ये नामस्मरण, भजनासाठी वेगळा अट्टाहास करावा लागत नाही.मनही या सर्व सेवेत रममाण झालेले असते. मनाचा स्पर्श साधनेला असल्यामुळे ते एक प्रकारचे मानसिक तप घडते. मुखाने भजन, कीर्तन सतत घडत राहिल्याने मनाचा स्पर्श साधनेला होतो व त्याचे रूपांतर तपात होते.

तपश्चर्येचे निर्माण झालेले बळ जीवन जगत असताना खूपच उपयोगाचे ठरते. कोणतेही कार्य करत असताना त्याला लागणारी ऊर्जा सात्विक असेल तर कार्य निर्विघ्नपणे पार पडते़ या सात्विक ऊर्जेला वारकरी संप्रदायामध्ये तप असे संबोधले गेले आहे़ असे तप आपल्याकडून घडावे या भावनेतून वारकरी कधीच वारी करत नाहीत. परंतु त्यांच्याकडून वारी केल्यानंतर तशा प्रकारचे तप घडते. आणि त्या तपाचा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये व सेवेमध्ये साधनेलाही उपयोगी ठरतो म्हणून निष्ठेने वारकरी पंढरपूरची आषाढी वारी करतात.- सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा