शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 19:30 IST

वारी.. एक तप !

पंढरीची वारी हे एक तप असून, आनंद प्राप्तीसाठी पत निर्माण करणारे माध्यम आहे. वारीत चालत असताना भाविकांकडून कायिक, वाचिक, मानसिक तीन प्रकारचे तप घडते. पायी चालत राहिल्याने कायिक तप घडते. शिवाय शरीराकडून वेगवेगळी सेवा घडत राहिल्याने ते एक प्रकारचे कायिक तप घडते. हाताने टाळी, मुखाने भजन हे तप घडण्यासाठी सांगितलेला मार्ग म्हणजे वारी आहे.

लागोनिया पाया विनवीतो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम’ या संतवचनाप्रमाणे आपण साधना केली तर आपल्याकडून तप घडेल म्हणून वारीची परंपरा सुरु केली. प्रत्येक व्यक्तीकडून दररोज दहा प्रकारचे पाप घडत असते. कायिक तीन, वाचिक चार, मानसिक तीन असे एकूण दहा प्रकारचे पाप घडत असते . पापाचे फळ दु:ख असून, पुण्याचे फळ सुख आहे. सुखाची प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा असते, परंतु पुण्य करावे वाटत नाही. मला दु:ख व्हावे असे म्हणणारा जगाच्या पाठीवर एकही व्यक्ती भेटत नाही. तरी कोणाचेही दु:ख गेलेले पाहावयास मिळत नाही. कारण दु:खाचे मूळ पाप असून, ते कोणालाही चुकविता येत नाही.

पापाचे डोंगरच्या डोंगर प्रत्येकाच्या कर्मातून पाहावयास मिळतात. पाप दाखविण्यासारखी वस्तू नसून, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्या वेदना होतात त्या पापामुळेच होतात. निषिद्ध कर्म म्हणजे चुकीचे कर्म, कर्तव्य विन्मुख कर्म याला पाप म्हणतात. या सर्व पापातून मुक्त होण्यासाठी तप खूपच गरजेचे आहे. हे तप घडण्यासाठी वारी करावी लागते. ब्रह्मदेवालाही सृष्टी निर्माण करण्याअगोदर तप करावे लागले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहण्यासाठी लागणाºया पुण्याचा विचार मांडत असताना मला तप करावे लागले होते, असे नमूद केले आहे. प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये तपाची खूपच आवश्यकता असते. वारीमध्ये भाविकांकडून सहज तप घडते. तपासाठी वेगळा अट्टाहास करावा लागत नाही. वारी म्हणजेच एक तप आहे. यामध्ये कायिक तपाबरोबर वाचिक तप घडते. मुखाने नामस्मरण करणे हे वाचिक तप ठरते. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ ग्रंथातून संदेश दिला, ‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा’ वारीमध्ये नामस्मरण, भजनासाठी वेगळा अट्टाहास करावा लागत नाही.मनही या सर्व सेवेत रममाण झालेले असते. मनाचा स्पर्श साधनेला असल्यामुळे ते एक प्रकारचे मानसिक तप घडते. मुखाने भजन, कीर्तन सतत घडत राहिल्याने मनाचा स्पर्श साधनेला होतो व त्याचे रूपांतर तपात होते.

तपश्चर्येचे निर्माण झालेले बळ जीवन जगत असताना खूपच उपयोगाचे ठरते. कोणतेही कार्य करत असताना त्याला लागणारी ऊर्जा सात्विक असेल तर कार्य निर्विघ्नपणे पार पडते़ या सात्विक ऊर्जेला वारकरी संप्रदायामध्ये तप असे संबोधले गेले आहे़ असे तप आपल्याकडून घडावे या भावनेतून वारकरी कधीच वारी करत नाहीत. परंतु त्यांच्याकडून वारी केल्यानंतर तशा प्रकारचे तप घडते. आणि त्या तपाचा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये व सेवेमध्ये साधनेलाही उपयोगी ठरतो म्हणून निष्ठेने वारकरी पंढरपूरची आषाढी वारी करतात.- सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा