शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
3
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
4
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
5
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
6
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
7
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
8
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
9
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
10
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
11
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
12
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
13
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
14
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
15
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
16
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
17
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू
18
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
19
खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
20
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये

Buddha Purnima : गौतम बुद्धांचे 10 अनमोल विचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 12:11 IST

वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा

मुंबई - वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. 30 एप्रिलला देशभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. यास गुरू पौर्णिमा असेही म्हटले जाते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे, पहिले कारण म्हणजे याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. दुसरे याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि तिसरे म्हणजे यादिवशी बुद्धांचं महानिर्वाण झालं होतं. गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांचे 10 अनमोल विचार  

1. जीवनात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करा. मग विजय नेहमी तुमचाच होईल, मग हा विजय तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.   

2. कोणत्याही परिस्थितीत तीन गोष्टी लपून राहू शकत नाही, सूर्य, चंद्र आणि सत्य. 

3. जीवनात कोणत्याही उद्देश किंवा लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा तो प्रवास चांगल्या पद्धतीनं करणं हे महत्त्वपूर्ण आहे. 

4. वाईटानं वाईटावर कधीही मात करता येत नाही. तिरस्काराला केवळ प्रेमानं संपवलं जाऊ शकते.

5. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती केवळ दोन चुका करू शकतात, पहिली चूक म्हणजे संपूर्ण मार्ग न निवडणे आणि दुसरी म्हणजे सुरुवातच न करणे.

6. भविष्यातील स्वप्नांमध्ये हरवू नका, भूतकाळात गुंतू नका, फक्त वर्तमान काळावर लक्ष्य केंद्रीत करा. जीवनात खूश राहण्याचा हा एकमेव योग्य मार्ग आहे.  

7. ज्याप्रमाणे एका दिव्याच्या माध्यमातून हजारो दिवे प्रज्वलित करता येतात, तरीही त्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही. त्याचप्रमाणे आनंद वाटल्यानं तो नेहमी वाढतो, कधीही कमी होत नाही. 

8. जीवनात तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, कितीही चांगले शब्द ऐका. मात्र जोपर्यंत हे सर्व काही तुम्ही आचरणात आणत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होत नाही.

9. नेहमी रागात राहणं, म्हणजे जळलेल्या कोळशाला दुसऱ्या व्यक्तीवर फेकण्याच्या इच्छेनं पकडून ठेवण्यासमान आहे. हा राग सर्वात आधी तुम्हालाच भस्मसात करतो.  

10. रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा, मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होते. 

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा