शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

Buddha Purnima : गौतम बुद्धांचे 10 अनमोल विचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 12:11 IST

वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा

मुंबई - वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. 30 एप्रिलला देशभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. यास गुरू पौर्णिमा असेही म्हटले जाते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे, पहिले कारण म्हणजे याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. दुसरे याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि तिसरे म्हणजे यादिवशी बुद्धांचं महानिर्वाण झालं होतं. गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांचे 10 अनमोल विचार  

1. जीवनात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करा. मग विजय नेहमी तुमचाच होईल, मग हा विजय तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.   

2. कोणत्याही परिस्थितीत तीन गोष्टी लपून राहू शकत नाही, सूर्य, चंद्र आणि सत्य. 

3. जीवनात कोणत्याही उद्देश किंवा लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा तो प्रवास चांगल्या पद्धतीनं करणं हे महत्त्वपूर्ण आहे. 

4. वाईटानं वाईटावर कधीही मात करता येत नाही. तिरस्काराला केवळ प्रेमानं संपवलं जाऊ शकते.

5. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती केवळ दोन चुका करू शकतात, पहिली चूक म्हणजे संपूर्ण मार्ग न निवडणे आणि दुसरी म्हणजे सुरुवातच न करणे.

6. भविष्यातील स्वप्नांमध्ये हरवू नका, भूतकाळात गुंतू नका, फक्त वर्तमान काळावर लक्ष्य केंद्रीत करा. जीवनात खूश राहण्याचा हा एकमेव योग्य मार्ग आहे.  

7. ज्याप्रमाणे एका दिव्याच्या माध्यमातून हजारो दिवे प्रज्वलित करता येतात, तरीही त्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही. त्याचप्रमाणे आनंद वाटल्यानं तो नेहमी वाढतो, कधीही कमी होत नाही. 

8. जीवनात तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, कितीही चांगले शब्द ऐका. मात्र जोपर्यंत हे सर्व काही तुम्ही आचरणात आणत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होत नाही.

9. नेहमी रागात राहणं, म्हणजे जळलेल्या कोळशाला दुसऱ्या व्यक्तीवर फेकण्याच्या इच्छेनं पकडून ठेवण्यासमान आहे. हा राग सर्वात आधी तुम्हालाच भस्मसात करतो.  

10. रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा, मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होते. 

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा