शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

महाभारतातील धर्माची घोडचूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 05:19 IST

हट्टीपणा म्हणजेच जुगारीवृत्ती, हट्टीपणा हा केवळ ‘अतिआत्मविश्वासामुळे’ मनात दडून बसलेला असतो, सत्याचा मार्ग कधीही दु:ख निर्माण होऊ देत नाही, माणूस कितीही मोठा असला तरीही त्याच्या हट्टीपणाच्या कुकर्माने निर्माण झालेल्या पापात कुणीही सहभागी होत नाही.

- विजयराज बोधनकरहट्टीपणा म्हणजेच जुगारीवृत्ती, हट्टीपणा हा केवळ ‘अतिआत्मविश्वासामुळे’ मनात दडून बसलेला असतो, सत्याचा मार्ग कधीही दु:ख निर्माण होऊ देत नाही, माणूस कितीही मोठा असला तरीही त्याच्या हट्टीपणाच्या कुकर्माने निर्माण झालेल्या पापात कुणीही सहभागी होत नाही. त्याउलट सत्याच्या मार्गावरून चालता चालता शेकडो हजारो प्रामाणिक हात आपल्या हाताला बळ देऊन जातात. त्याउलट देवत्वाचा मुखवटा घालून त्या खाली कुकर्माचा घाट घालणारे शेवटी तुरुंगाची हवा चाखत बसतात आणि आपल्या आंधळ्या हट्टीपणामुळे लोभात गुरफटून आपलं व सामाजिक स्वस्थतेच्या नुकसानीला जबाबदार ठरतात, अशी अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यापुढे येतील.त्यातलं एक उदाहरण म्हणजे महाभारतातील आंधळा जुगार म्हणजेच द्यूत, पांडव आणि कौरव यांच्यातील प्रेमाचा समन्वय तोडणारा एक क्रूर खेळ, कौरव हे मुळातच कपटी सोबतीला शकुनीसारखा अतिलोभी प्रवृत्तीचा खलनायक असल्यामुळे त्या जुगाराला आणखी तामसी किनार लाभली. त्या उलट पांडव हे सात्विक धर्मपरायण, सुसंस्कारी होते; परंतु जेव्हा ते द्यूत खेळायला बसले आणि शकुनीच्या कपटी फासांमध्ये अडकत गेले तशी पांडवांतील संयमी वृत्ती ढासळत गेली.पांडवांचा प्रमुख ज्येष्ठ बंधू धर्मराजही आंधळा होऊन हट्टाला पेटला. शकुनीच्या जाळ्यात अडकत गेला. सर्व संपत्ती गमावून बसला. शेवटी आपण एक तरी डाव जिंकू या हट्टातून मोहात अडकतच गेला आणि आपल्या धर्मपत्नीला शेवटी जुगारावर लावून सर्वस्व हरवून बसला. शेवटी पांडव बलशाली असूनही पराजयाचे दु:ख पचवीत वनवास भोगत बसले. याला कारण फक्त धर्माची मोठी घोडचूक म्हणजे त्याला जुगारावरून मोठ्या हिमतीने उठता आलं नाही, तो घसरतच गेला आणि संस्काराचा आणि संपूर्ण कुटुंबाचा सर्वनाश ओढवून घेतला.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक