शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 03:39 IST

काला संस्कृत तत्त्वज्ञानामध्ये एक फार महत्त्वपूर्ण म्हण आहे की, ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। म्हणेजच शुभ गोष्टींचा साक्षात्कार अनेक प्रकारच्या विचारधारांनी होत असतो. हेच कारण आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म झालेला आहे.

- डॉ. भूषण कुमार उपाध्याय

काला संस्कृत तत्त्वज्ञानामध्ये एक फार महत्त्वपूर्ण म्हण आहे की, ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। म्हणेजच शुभ गोष्टींचा साक्षात्कार अनेक प्रकारच्या विचारधारांनी होत असतो. हेच कारण आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म झालेला आहे. अनेक प्रकारच्या विचारधारांच्या अस्तित्वामुळे भारतीय संस्कृती संपन्न आणि दृढ बनविलेली आहे. पुढील विधान हे याच गोष्टीचे सूचक आहे-‘एकं सद्म विप्रा बहुधा वदन्ति’।म्हणजे एकाच शुभ गोष्टीस विद्वान मनुष्य निरनिराळ्या प्रकाराने सादर करीत असतो. भारतीय कायदेपंडितांच्या म्हणण्यानुसार, मूळ ऊर्जा ही एकच आहे. परंतु जेव्हा ती व्यक्त होते, तेव्हा ती निरनिराळे रूप धारण करीत असते. तसेच ती एक असूनसुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात प्रदर्शित होत असते. एकच ऊर्जा व्यक्त होऊन अनेक नावे आणि रूपे धारण करीत असते. हेच कारण आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये एकाच तथ्य/खऱ्या गोष्टीला पाहण्याचे विविध दृष्टीकोन निर्माण झालेले आहेत. लोकशाहीचीसुद्धा हीच विशेषता आहे की, येथे अनेक प्रकारच्या विचारांचा आदर केला जातो. लोकशाही ही अशा प्रकारची बाग आहे ज्यामध्ये अनेक प्रकारची फुले उमलली आहेत. तसेच लोकशाहीच्या बागेमध्ये जितकी विविधता राहील ती तितकीच सुंदर दिसेल. भारतीय संस्कृतीमध्ये ईश्वरप्राप्तीकरितासुद्धा विविध मार्ग सांगितले गेलेले आहेत. ज्यामध्ये ज्ञान, भक्ती आणि कर्म हे मुख्य आहेत. प्राचीन काळात ज्ञान, भक्ती आणि कर्म यांना ईश्वरप्राप्तीचे वेगवेगळे मार्ग मानले जात होते. सदर मार्गांना माननारे स्वत:ला अन्य मार्गांच्या तुलनेत श्रेष्ठ असे मानत होते. तसेच या मार्गाला मानणाºया व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष आणि विरोध पाहायला मिळत होता. परंतु श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सुंदर प्रकारे या तीनही मार्गांचा समन्वय केलेला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कथनानंतर या मार्गांमध्ये जी पारंपरिक कटुता आणि वैमनस्य होते ते आता समाप्त झालेले असून एक प्रकारचे समन्वयक वातावरण निर्माण झालेले आहे. याच तºहेने भक्ती मार्गाचा अवलंब करणारे संत तुलसीदास यांनीसुद्धा ‘राम-चरित मानस’ ग्रंथामध्ये एक प्रकारे समन्वयक दृष्टीकोन स्वीकारलेला आहे. हा समन्वयवादी दृष्टीकोन समाज टिकण्याकरिता अतिआवश्यक आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक