शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 03:39 IST

काला संस्कृत तत्त्वज्ञानामध्ये एक फार महत्त्वपूर्ण म्हण आहे की, ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। म्हणेजच शुभ गोष्टींचा साक्षात्कार अनेक प्रकारच्या विचारधारांनी होत असतो. हेच कारण आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म झालेला आहे.

- डॉ. भूषण कुमार उपाध्याय

काला संस्कृत तत्त्वज्ञानामध्ये एक फार महत्त्वपूर्ण म्हण आहे की, ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। म्हणेजच शुभ गोष्टींचा साक्षात्कार अनेक प्रकारच्या विचारधारांनी होत असतो. हेच कारण आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म झालेला आहे. अनेक प्रकारच्या विचारधारांच्या अस्तित्वामुळे भारतीय संस्कृती संपन्न आणि दृढ बनविलेली आहे. पुढील विधान हे याच गोष्टीचे सूचक आहे-‘एकं सद्म विप्रा बहुधा वदन्ति’।म्हणजे एकाच शुभ गोष्टीस विद्वान मनुष्य निरनिराळ्या प्रकाराने सादर करीत असतो. भारतीय कायदेपंडितांच्या म्हणण्यानुसार, मूळ ऊर्जा ही एकच आहे. परंतु जेव्हा ती व्यक्त होते, तेव्हा ती निरनिराळे रूप धारण करीत असते. तसेच ती एक असूनसुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात प्रदर्शित होत असते. एकच ऊर्जा व्यक्त होऊन अनेक नावे आणि रूपे धारण करीत असते. हेच कारण आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये एकाच तथ्य/खऱ्या गोष्टीला पाहण्याचे विविध दृष्टीकोन निर्माण झालेले आहेत. लोकशाहीचीसुद्धा हीच विशेषता आहे की, येथे अनेक प्रकारच्या विचारांचा आदर केला जातो. लोकशाही ही अशा प्रकारची बाग आहे ज्यामध्ये अनेक प्रकारची फुले उमलली आहेत. तसेच लोकशाहीच्या बागेमध्ये जितकी विविधता राहील ती तितकीच सुंदर दिसेल. भारतीय संस्कृतीमध्ये ईश्वरप्राप्तीकरितासुद्धा विविध मार्ग सांगितले गेलेले आहेत. ज्यामध्ये ज्ञान, भक्ती आणि कर्म हे मुख्य आहेत. प्राचीन काळात ज्ञान, भक्ती आणि कर्म यांना ईश्वरप्राप्तीचे वेगवेगळे मार्ग मानले जात होते. सदर मार्गांना माननारे स्वत:ला अन्य मार्गांच्या तुलनेत श्रेष्ठ असे मानत होते. तसेच या मार्गाला मानणाºया व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष आणि विरोध पाहायला मिळत होता. परंतु श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सुंदर प्रकारे या तीनही मार्गांचा समन्वय केलेला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कथनानंतर या मार्गांमध्ये जी पारंपरिक कटुता आणि वैमनस्य होते ते आता समाप्त झालेले असून एक प्रकारचे समन्वयक वातावरण निर्माण झालेले आहे. याच तºहेने भक्ती मार्गाचा अवलंब करणारे संत तुलसीदास यांनीसुद्धा ‘राम-चरित मानस’ ग्रंथामध्ये एक प्रकारे समन्वयक दृष्टीकोन स्वीकारलेला आहे. हा समन्वयवादी दृष्टीकोन समाज टिकण्याकरिता अतिआवश्यक आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक