शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘धर्म मार्गात राहून कर्माचरण करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:29 IST

चातुर्मास विशेष़...

सोलापूर : ‘धर्म मार्गात राहून कर्माचरण करणाºयांचे चित्त स्थिर होऊन मन:शांती मिळते व त्यायोगे सुख प्राप्त होते व शेवटी मोक्ष ही साधतो’ असे प्रतिपादन गौतम मुनीजी यांनी केले.

प. पू. श्री विनय मुनिजी म. सा. यांच्या नेतृत्वाखाली चातुर्मासानिमित्त आयोजित गुरु आनंद कमल कन्हैया धर्मसभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या चार पुरुषार्थात मुख्य पुरुषार्थ धर्मच होय. अधर्माचरणाने सुखप्राप्ती होत नाही तसेच अधर्माने मिळवलेला पैसाही टिकत नाही. अधर्माच्या मार्गाने केलेली कामे फलप्रद होत नाहीत. मानवी जीवनात धर्माचरणाने प्रतिष्ठा प्राप्त होते. 

मानवाची कर्मे त्याच्या मनाच्या शुद्धतेसाठी तसेच अशुद्धतेसाठी कारणीभूत असतात. सदाचाराने मनशुद्धी होते तर  दुष्कर्माने ते अपवित्र होते. व्रत, उपवास, जप, पूजा यामध्ये आनंदी वृत्ती होणे सुरुवातीस जरा कठीण वाटत असले तरी हळूहळू अभ्यासाने ती वृत्ती बळावून मन शक्तिसंपन्न होते. 

अशा सत्कर्माचरणासाठी अनुकूलता प्राप्त करून घेण्यास आळस आड येत नाही. प्रपंचात गुरफटून गेलेल्या मनुष्यास सत्कर्म करण्यास वेळच मिळत नाही हे म्हणणे चुकीचे आहे. सत्कर्माचरणाने विवेक प्राप्त होतो. विवेकाच्या योगाने ज्ञानप्राप्ती होते व ज्ञानाने मोक्षप्राप्ती होते. 

 मनात भक्ती असेल तर फळ मिळतेच हे सांगताना त्यांनी जितेंद्र बलदोटा यांचे उदाहरण दिले. सेवा क्षेत्रात ते सदैव तत्पर असतात. मुनींबरोबर रोज गोचरी म्हणजे भोजन आणण्यासाठी  बलदोटा हे तीन-चार किलोमीटर रोज सोबत चालतात अशा शब्दात त्यांनी बलदोटा यांचे कौतुक केले.  - गौतम मुनीजी, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकJain Templeजैन मंदीर