शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

धीरवीरां होआवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 04:53 IST

काही तरी होण्याचा भाव आपल्या हृदयात नेहमीच असतो. मोठं व्हावं, चमकावं, नाव सर्वत्र झळकावं, ही रास्त अपेक्षा असतेच आणि ती चुकीची नाही.

- बा. भो. शास्त्रीकाही तरी होण्याचा भाव आपल्या हृदयात नेहमीच असतो. मोठं व्हावं, चमकावं, नाव सर्वत्र झळकावं, ही रास्त अपेक्षा असतेच आणि ती चुकीची नाही. कारण जीव हा मुळातच सापेक्ष आहे म्हणून तर गावात तात्या, आप्पा, नाना, काका, जीजा या उपाध्या आपण लावतो. त्यांनाही बरं वाटतं. ही आवड बालपणात अंकुरित झालेली असते. लहान मुलं पाहुणे घरात बसल्यावर मधीच लुडबुड करतात, मस्ती करतात. तेव्हा घरातले नेहमीच म्हणतात एरवी मुलं शांत असतात, पाहा कुणी आलं की मस्ती करतात. असं का होतं? इतरांना वेधून घ्यावं हा त्यांच्यातला भाव असतो. आपल्याला ओळखावं, सन्मान मिळावा हा हेतू असतो. भविष्यात हीच सन्मानाची भूक वाढते. त्यात अडथळा आला की क्रोध येतो. मोह येतो, स्मृतिभ्रंश व पुन्हा मोठं होता होताच माणूस लहान होऊन जातो. नंतर स्वत:च अडचणी निर्माण करून वेगळ्या मार्गाने चमकून जावं असं वाटतं. तेच खलांचं वाकडेपण पसायदानात सरळ करण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरीत केला आहे. सिद्धी नसताना प्रसिद्धीचा लोभ निर्माण होतो. अपयश आलं की रडणं सुरू होतं, याला सर्वस्व जबाबदार स्वत: आपणच असतो. रडण्याची चावी अपेक्षाभंगात असते. जेवढी अपेक्षा मोठी तेवढा आक्रोश पण मोठा असतो. नागदेवाला खूप मोठी आशा होती ती मोक्षाची. पण स्वामी म्हणाले, तो तुला लवकर मिळणार नाही. कारण तुझ्यात अनंत दोष आहेत. त्याची अपेक्षा भंगली. तो उठून गुंफेमागे गेला व रडत बसला. स्वामी मागे गेले. त्याचं सांत्वन करत म्हणाले, ‘‘धीरवीरा होआवे’’ अर्जुनाच्या रडण्यातून गीता, वाल्मीकीच्या शोकातून रामायण, नागदेवाच्या रडण्यातून प्रस्तुत सूत्र जन्माला आलं, जग रडतं याला दोनच कारणं आहेत. धैर्य आणि शौर्य याचा अभाव. विपन्नावस्थेत संघर्षात जे टिकले ते कधीच रडले नाहीत, शूरता लढते व धीरता धीर कमी होऊ देत नाही. दोन शक्ती एक एकाला पूरक आहेत.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक