शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 02:16 IST

अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश आहे. तत्त्वज्ञानाची प्रत्येक पायरी ही मानवी जीवनाची महत्त्व पटवून देणारी चढण आहे. या तत्त्वज्ञानाच्या केंद्रबिंदूतूनच महाभारत रामायणासारखे ग्रंथ निर्माण झाले आहेत.

- विजयराज बोधनकर

अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश आहे. तत्त्वज्ञानाची प्रत्येक पायरी ही मानवी जीवनाची महत्त्व पटवून देणारी चढण आहे. या तत्त्वज्ञानाच्या केंद्रबिंदूतूनच महाभारत रामायणासारखे ग्रंथ निर्माण झाले आहेत. त्यात कथासार आहे. कथा ऐकणे हा मानवाचा स्वभाव आहे आणि म्हणून कथेतून मूळ तत्त्व प्रणालीची पेरणी करत, भारतीय महामुनींनी ही दोन महाकाव्ये जन्माला घातली, पण त्यातली जगली ती फक्त कथा आणि त्यात या तत्त्वज्ञानाचा खरा शोध आणि कथेतले विविध अंदाज हे बाजूला पडत गेले व उरला तो निव्वळ कथेचा सांगाडा.विचार करण्याची संधी फक्त मानवालाच निसर्गाने बहाल केली. आर्य चाणक्यासारख्या एका शिक्षकाने चंद्रगुप्त मौर्यसारख्या अत्यंत गरीब घरातल्या मुलाला राजपदापर्यंत नेले. याचा हाच अर्थ निघतो की, निसर्ग क्षमतेचा वाटत करताना गरीब व श्रीमंत हा भेद करीत नाही. प्रत्येकाला बुद्धिमत्ता सारखीच प्रदान करतो. जो इथल्या मोहमायेपासून स्वत:च संरक्षण करतो, तो प्रगतीच्या मार्गावरून भ्रमण करीत राजयोगापर्यंत पोहोचतो आणि जो मोहमायेच्या गराड्यात सापडतो, शेवटी त्याचा दुर्योधन किंवा रावण होतो.रायायण, महाभारत या कथा प्रत्यक्ष घडल्यात की नाहीत, हा अजिबात महत्त्वाचा विषय नाही, परंतु त्या काव्यग्रंथातून नेमका कुठला अभ्यास मानवाने करावयाचा आहे, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. निसर्गशक्तीचा अभ्यास करून ज्याला अनुभूती झाली, त्याला खऱ्या अर्थाने भारतीय तत्त्वज्ञान समजू शकते. पंचमहाभूतांवरच आधारित हे तत्त्वज्ञान रचलेले आहे. एका सूक्ष्म शुक्राणूपासून इथला मानव शरीर धारण करतो. या शुक्राणूचा निर्माता कोण असेल, याचा शोध घेणेसुद्धा एक अभ्यासच होऊ शकतो. याच मूळ अभ्यासामुळे मानवाच्या मूळ प्रवृत्तीचा अभ्यास होऊ शकतो आणि याच मानवी प्रवृत्तीतून ही दोन महाकाव्य रचली गेलीत, याचा पूर्णपणे अंदाज येऊ शकतो. मानवी जीवन ही शक्यतांची मांदियाळी आहे. मग त्या महाकाव्याची फक्त पूजाच करायची की, महाकाव्याचा शोध घेऊन उत्तरे शोधायची याचा प्रत्येकाने जर विचार केला, तरच ही ग्रंथ सफल ग्रंथ ठरू शकतात अन्यथा तो फक्त कथानकाचाच भाग राहू शकतो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक