शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 02:16 IST

अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश आहे. तत्त्वज्ञानाची प्रत्येक पायरी ही मानवी जीवनाची महत्त्व पटवून देणारी चढण आहे. या तत्त्वज्ञानाच्या केंद्रबिंदूतूनच महाभारत रामायणासारखे ग्रंथ निर्माण झाले आहेत.

- विजयराज बोधनकर

अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश आहे. तत्त्वज्ञानाची प्रत्येक पायरी ही मानवी जीवनाची महत्त्व पटवून देणारी चढण आहे. या तत्त्वज्ञानाच्या केंद्रबिंदूतूनच महाभारत रामायणासारखे ग्रंथ निर्माण झाले आहेत. त्यात कथासार आहे. कथा ऐकणे हा मानवाचा स्वभाव आहे आणि म्हणून कथेतून मूळ तत्त्व प्रणालीची पेरणी करत, भारतीय महामुनींनी ही दोन महाकाव्ये जन्माला घातली, पण त्यातली जगली ती फक्त कथा आणि त्यात या तत्त्वज्ञानाचा खरा शोध आणि कथेतले विविध अंदाज हे बाजूला पडत गेले व उरला तो निव्वळ कथेचा सांगाडा.विचार करण्याची संधी फक्त मानवालाच निसर्गाने बहाल केली. आर्य चाणक्यासारख्या एका शिक्षकाने चंद्रगुप्त मौर्यसारख्या अत्यंत गरीब घरातल्या मुलाला राजपदापर्यंत नेले. याचा हाच अर्थ निघतो की, निसर्ग क्षमतेचा वाटत करताना गरीब व श्रीमंत हा भेद करीत नाही. प्रत्येकाला बुद्धिमत्ता सारखीच प्रदान करतो. जो इथल्या मोहमायेपासून स्वत:च संरक्षण करतो, तो प्रगतीच्या मार्गावरून भ्रमण करीत राजयोगापर्यंत पोहोचतो आणि जो मोहमायेच्या गराड्यात सापडतो, शेवटी त्याचा दुर्योधन किंवा रावण होतो.रायायण, महाभारत या कथा प्रत्यक्ष घडल्यात की नाहीत, हा अजिबात महत्त्वाचा विषय नाही, परंतु त्या काव्यग्रंथातून नेमका कुठला अभ्यास मानवाने करावयाचा आहे, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. निसर्गशक्तीचा अभ्यास करून ज्याला अनुभूती झाली, त्याला खऱ्या अर्थाने भारतीय तत्त्वज्ञान समजू शकते. पंचमहाभूतांवरच आधारित हे तत्त्वज्ञान रचलेले आहे. एका सूक्ष्म शुक्राणूपासून इथला मानव शरीर धारण करतो. या शुक्राणूचा निर्माता कोण असेल, याचा शोध घेणेसुद्धा एक अभ्यासच होऊ शकतो. याच मूळ अभ्यासामुळे मानवाच्या मूळ प्रवृत्तीचा अभ्यास होऊ शकतो आणि याच मानवी प्रवृत्तीतून ही दोन महाकाव्य रचली गेलीत, याचा पूर्णपणे अंदाज येऊ शकतो. मानवी जीवन ही शक्यतांची मांदियाळी आहे. मग त्या महाकाव्याची फक्त पूजाच करायची की, महाकाव्याचा शोध घेऊन उत्तरे शोधायची याचा प्रत्येकाने जर विचार केला, तरच ही ग्रंथ सफल ग्रंथ ठरू शकतात अन्यथा तो फक्त कथानकाचाच भाग राहू शकतो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक