शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 02:16 IST

अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश आहे. तत्त्वज्ञानाची प्रत्येक पायरी ही मानवी जीवनाची महत्त्व पटवून देणारी चढण आहे. या तत्त्वज्ञानाच्या केंद्रबिंदूतूनच महाभारत रामायणासारखे ग्रंथ निर्माण झाले आहेत.

- विजयराज बोधनकर

अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश आहे. तत्त्वज्ञानाची प्रत्येक पायरी ही मानवी जीवनाची महत्त्व पटवून देणारी चढण आहे. या तत्त्वज्ञानाच्या केंद्रबिंदूतूनच महाभारत रामायणासारखे ग्रंथ निर्माण झाले आहेत. त्यात कथासार आहे. कथा ऐकणे हा मानवाचा स्वभाव आहे आणि म्हणून कथेतून मूळ तत्त्व प्रणालीची पेरणी करत, भारतीय महामुनींनी ही दोन महाकाव्ये जन्माला घातली, पण त्यातली जगली ती फक्त कथा आणि त्यात या तत्त्वज्ञानाचा खरा शोध आणि कथेतले विविध अंदाज हे बाजूला पडत गेले व उरला तो निव्वळ कथेचा सांगाडा.विचार करण्याची संधी फक्त मानवालाच निसर्गाने बहाल केली. आर्य चाणक्यासारख्या एका शिक्षकाने चंद्रगुप्त मौर्यसारख्या अत्यंत गरीब घरातल्या मुलाला राजपदापर्यंत नेले. याचा हाच अर्थ निघतो की, निसर्ग क्षमतेचा वाटत करताना गरीब व श्रीमंत हा भेद करीत नाही. प्रत्येकाला बुद्धिमत्ता सारखीच प्रदान करतो. जो इथल्या मोहमायेपासून स्वत:च संरक्षण करतो, तो प्रगतीच्या मार्गावरून भ्रमण करीत राजयोगापर्यंत पोहोचतो आणि जो मोहमायेच्या गराड्यात सापडतो, शेवटी त्याचा दुर्योधन किंवा रावण होतो.रायायण, महाभारत या कथा प्रत्यक्ष घडल्यात की नाहीत, हा अजिबात महत्त्वाचा विषय नाही, परंतु त्या काव्यग्रंथातून नेमका कुठला अभ्यास मानवाने करावयाचा आहे, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. निसर्गशक्तीचा अभ्यास करून ज्याला अनुभूती झाली, त्याला खऱ्या अर्थाने भारतीय तत्त्वज्ञान समजू शकते. पंचमहाभूतांवरच आधारित हे तत्त्वज्ञान रचलेले आहे. एका सूक्ष्म शुक्राणूपासून इथला मानव शरीर धारण करतो. या शुक्राणूचा निर्माता कोण असेल, याचा शोध घेणेसुद्धा एक अभ्यासच होऊ शकतो. याच मूळ अभ्यासामुळे मानवाच्या मूळ प्रवृत्तीचा अभ्यास होऊ शकतो आणि याच मानवी प्रवृत्तीतून ही दोन महाकाव्य रचली गेलीत, याचा पूर्णपणे अंदाज येऊ शकतो. मानवी जीवन ही शक्यतांची मांदियाळी आहे. मग त्या महाकाव्याची फक्त पूजाच करायची की, महाकाव्याचा शोध घेऊन उत्तरे शोधायची याचा प्रत्येकाने जर विचार केला, तरच ही ग्रंथ सफल ग्रंथ ठरू शकतात अन्यथा तो फक्त कथानकाचाच भाग राहू शकतो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक